14-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांना, तुम्ही खरेखुरे राजॠषी आहात, तुमचे कर्तव्य आहे तपास्या करणे, तपस्या
द्वारेच पूजन लायक बनाल"
प्रश्न:-
कोणता प्रयत्न
नेहमीसाठी पूजन लायक बनवतो?
उत्तर:-
आत्म्याची ज्योती जागृत करणे किंवा तमोप्रधान आत्म्याला सतोप्रधान बनवण्याचा
पुरुषार्थ करा, तर नेहमीसाठी पूजन लायक बनाल. जे आत्ता गफलत करतात ते खूप रडतील. जर
पुरुषार्थ करून पास झाले नाही, धर्मराजाची सजा खाल्ली, तर सजा खाणारे पुज्य बनणार
नाहीत, त्यांचे तोंड पिवळे पडेल.
ओम शांती।
आत्मिक मुलांप्रति आत्मिक पिता समजावत आहेत. प्रथम तर मुलांना समजवतात की, स्वतःला
आत्मा निश्चय करा, प्रथम मी आत्मा आहे, नंतर शरीर आहे. येथे प्रदर्शनी किंवा
संग्रहालया मध्ये, मुरलीच्या वर्गामध्ये, प्रथम ही सावधानी द्यायची आहे की, स्वतःला
आत्मा समजून आठवण करा. मुलं जेव्हा इथे बसतात, तर सर्व देही अभिमानी होऊन बसत नाहीत.
येथे बसताना पण कुठे कुठे विचार चालले जातात. सत्संगा मध्ये जोपर्यंत कोणी साधू
इत्यादी येत नाहीत, तोपर्यंत बसून काय करतात, कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये
बसतात. परत साधु आले तर कथा इत्यादी ऐकतात. बाबांनी समजवले आहे, हे सर्व भक्ती
मार्गा मध्ये, ऐकणे आणि ऐकवणे आहे. यामध्ये रस काहीच नाही. दिवाळी पण कृत्रिम साजरी
करतात. बाबांनी समजवले आहे, ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला पाहिजे, तर घराघरांमध्ये
ज्ञान प्रकाश होईल. आता तर घराघरांमध्ये अंधार आहे. हा सर्व तर बाहेरचा प्रकाश आहे.
तुम्ही आपली ज्योती जागृत करण्यासाठी अगदी शांती मध्ये बसतात. मुलं जाणतात
स्वधर्मामध्ये राहिल्यामुळेच पाप नष्ट होतात. जन्म जन्मांतरचे पाप या आठवणीच्या
यात्रे द्वारेच नष्ट होतात. आत्म्याची ज्योत विझलेली आहे ना. शक्तीरुपी पेट्रोल
सर्व नष्ट झाले आहे, ते परत भरेल कारण आत्मा पवित्र बनते. रात्रंदिवसा चा फरक आहे.
आता लक्ष्मीची खूप पूजा होते. काही मुलं लिहतात, लक्ष्मी मोठी की, सरस्वती माता
मोठी?लक्ष्मी तर एकच असते, श्री नारायणाची. जर महालक्ष्मीची पूजा करतात, त्यांना
चार भुजा दाखवतात. त्यामध्ये दोन्ही येतात. वास्तव मध्ये त्यांना लक्ष्मी नारायणाची
पूजा म्हटले जाते. चतुर्भुज आहेत ना, दोन्ही एकत्र आहेत, परंतु मनुष्य काहीच समजत
नाहीत. बेहदचे पिता समजवतात की, सर्व बेसमज बनले आहेत. लौकिक पिता साऱ्या दुनियातील
मुलांना कधी म्हणतील का, बेसमज आहेत. आता तुम्ही मुलं जाणतात, विश्वाचे पिता कोण
आहेत? स्वतः म्हणतात मी सर्वांचा पिता आहे, तुम्ही सर्व माझे आहात. ते साधू लोक तर
म्हणतात सर्व भगवानच भगवान आहेत. आत्ता तुम्ही जाणता, आम्हा आत्म्यांना बेहद्दचे
पिता, बेहद्दचे ज्ञान समजावत आहेत. मनुष्यांना तर देह अभिमान राहतो, मी अमका आहे.
शरीरावरती जे नाव पडले, ते चालत येतात. आता शिवबाबा तर निराकार, सर्वोच्च आहेत. त्या
आत्म्या वरती नाव शिव आहे. आत्म्या वरती नाव एकच शिवबाबाचे आहे. बस ते परम आत्मा,
परमात्मा आहेत, त्यांचे नाव शिव आहे. बाकी जे पण असंख्य आत्मे आहेत, त्या सर्वांचे
शरीरावरती नाव पडते. शिवबाबा येथे राहत नाहीत. ते परमधाम वरून येतात. शिव अतरण पण
आहे. आता बाबांनी तुम्हाला समजवले आहे, सर्व आत्मे येथे भूमिका वठवण्यासाठी येतात.
बाबांची पण भूमिका आहे. बाबा तर येथे खूप मोठे काम करतात. अवतार मानतात परंतु
त्यांची सर्वजनिक सुट्टी आणि पोस्टाची तिकिटे पण असायला पाहिजेत. सर्व देशांमध्ये
सार्वजनिक सुट्टी द्यायला पाहिजे, कारण बाबा तर सर्वांचे सद्गती दाता आहेत ना.
त्यांचा जन्मदिवस, इत्यादीच्या तारखेची पण माहिती नाही, कारण हे तर वेगळे आहेत ना,
म्हणून फक्त शिवरात्री म्हणतात. हे तर तुम्ही मुलं जाणतात, अर्धा कल्पा बेहद्द चा
दिवस, तर अर्धाकल्प बेहद्द ची रात्र आहे. रात्र पूर्ण होऊन, परत दिवस होतो.
त्यांच्या मध्ये बाबा येतात. ही तर अचूक वेळ आहे. मनुष्य जन्मतात तर, नगरपालिके
मध्ये नोंद करतात ना, परत सहा दिवसानंतर त्याचे नाव ठेवतात, त्याला नामकरण म्हणतात,
कोणी छटी पण म्हणतात. भाषा तर अनेक आहेत. काहीजण लक्ष्मीची पूजा करतात, तर खूप फटाके
इत्यादी उडवतात. तुम्ही विचारु शकता, हा जो लक्ष्मीचा सण आहे, जे तुम्ही साजरा
करतात, ही कधी सिंहासन वरती बसली होती?सिंहासन आरुढ होण्याचा राज्याभिषेक सोहळा
साजरा करतात, त्यांचा जन्मदिवस साजरा करत नाहीत. लक्ष्मीचे चित्र थाळीमध्ये ठेवून
तिच्याकडून धन मागतात, बस दुसरे काहीच नाही. मंदिरांमध्ये जाऊन दुसरे काही मागतील,
परंतु दिवाळीच्या दिवशी फक्त पैसेच मागतात. ती थोडेच पैसे देते, ही तर जशी भावना आहे.
. . जर कोणी खऱ्या भावना द्वारे पूजा करतात, तर अल्पकाळासाठी धन मिळते. हे
अल्पकाळासाठी सुख आहे. कुठे तर कायमस्वरूपी पण सुख असेल ना. स्वर्गाची तर त्यांना
माहितीच नाही. येथे स्वर्गाची भेट कोणाबरोबर होऊ शकत नाही. तुम्ही जाणता अर्धाकल्प
ज्ञान आणि अर्धा कल्प भक्ती आहे, परत वैराग्य येते. असे समजवले जाते, ही जुनी छी छी
दुनिया आहे म्हणून नवीन दूनिया पण पाहिजे. नवीन दुनियेला वैकुंठ म्हणतात. त्याला
स्वर्ग पॅराडाइज पण म्हणतात. या वैश्विक नाटकांमध्ये कलाकार पण अविनाशी आहेत. तुम्हा
मुलांना माहिती झाले आहे की, आम्ही आत्मे कशी भूमिका वठवतो. बाबांनी समजवले आहे,
कुणालाही प्रदर्शनी इत्यादी दाखवायची असेल तर, प्रथम मुख्य लक्ष्य समजायचे आहे.
सेकंदांमध्ये जीवन मुक्ती कशी मिळते, जन्म मृत्यू मध्ये तर जरूर यायचे आहे. तुम्ही
शिडीच्या चित्रावरती खूप चांगल्या प्रकारे समजावू शकता. रावण राज्यांमध्येच भक्ती
सुरू होते. सतयुगामध्ये भक्तीचे नाव रूप राहत नाही. ज्ञान आणि भक्ती दोन वेगवेगळे
आहेत ना. आता तुम्हाला जुन्या दुनिये पासून वैराग्य आहे. तुम्ही जाणतात ही जुनी
दुनिया आता नष्ट होणार आहे. पिता नेहमी मुलांसाठी सुखदायी असतात. मुलांसाठी खूप
कष्ट करतात. मुलगा होण्यासाठी गुरूंच्या जवळ जातात, साधूंच्या जवळ जातात, कसेही
करून मुलगा व्हावा, कारण समजतात मुलगा झाला तर त्यांना मिळकत देऊ. मुलगा असेल तर
त्यांना वारस बनवू. तर पिता कधी मुलांना दुःख थोडेच देतील. हे तर अशक्य आहे. तुम्ही
मात पिता म्हणून खूप बोलवत राहतात. तर मुलांचे आत्मिक पिता, सर्वांना सुखाचा रस्ता
दाखवतात. सुख देणारे एकच शिव पिता आहेत. दुखहर्ता सुखकर्ता एकच आत्मिक पिता आहेत.
हा विनाश पण सुखासाठीच आहे, नाही तर मुक्ती जीवनमुक्ती कसे मिळवू शकतील. परंतु हे
पण कोणी समजत नाहीत. येथे तर गरीब, अबला आहेत, जे स्वत:ला आत्मा निश्चय करतात. बाकी
मोठ्या लोकांना खूप अभिमान असतो, काही विचारू नका. बाबा नेहमी समजवतात, तुम्ही
राजॠषी आहात. ऋषी नेहमी तपस्या करतात. ते तर ब्रह्म तत्वाची आठवण करतात किंवा कोणी
काली इत्यादीची पण आठवण करतात. माॅ काली म्हणून बोलवत राहतात. बाबा म्हणतात या
वेळेत सर्व विकारी आहेत. कामचिते वरती बसून काळे बनले आहेत. मात-पिता मुलं सर्व काळे
आहेत. ही बेहद्दची गोष्ट आहे. सतयुगामध्ये काळे म्हणजे विकारी नसतात, सर्व गोरे
म्हणजे पवित्र असतात. कधीच काळे बनत नाहीत. हे तुम्हा मुलांना बाबांनी समजावले आहे.
थोडे थोडे पतीत बनत-बनत बिल्कुल च काळे बनतात. बाबा म्हणतात, रावणाने कामचिते वरती
चढवून बिल्कुल काळे बनवले आहे, आता परत तुम्हाला ज्ञानचिते वरती बसवतो. आत्म्यालाच
पवित्र बनवायचे आहे. आता पतित-पावन बाबा येऊन पावन बनवण्याची युक्ती सांगतात. पाणी
काय युक्ती सांगेल. तुम्ही कोणालाही समजून सांगा तर करोडो मधून काही लोकच समजून
उच्चपद प्राप्त करतील. आता तुम्ही बाबा पासून २१ जन्मासाठी वारसा घेण्यासाठी आले
आहात. तुम्हाला पुढे चालून खूप साक्षात्कार होतील. तुम्हाला आपल्या अभ्यासाचा
परिणाम माहित होईल. आत्ता जे गफलत करतात, तर परत खूप रडतील. सजा पण खूप आहेत ना.
परत पद पण भ्रष्ट होते, म्हणून बाबा म्हणतात, गोड मुलांनो पुरुषार्थ करून पास व्हा,
नंतर काहीच सजा खावी लागणार नाही. सजा खाल्ली तर थोडेच पुज्य लायक बनू शकता. तुम्हा
मुलांना खूप पुरुषार्थ करायला पाहिजे. आपल्या आत्म्याची ज्योती जागृत करायची आहे.
आत्ता आत्मा तमोप्रधान बनली आहे, त्यांनाच सतोप्रधान बनवायचे आहे. आत्मा एक बिंदू
आहे, एक तारा आहे. त्यांचे दुसरे कोणते नाव ठेवू शकत नाही. मुलांना समजवले आहे,
त्यांचा साक्षात्कार झाला आहे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस चे उदाहरण
सांगतात. स्वामी विवेकानंदांनी पाहिले, गुरुद्वारे लाईट निघाली, ती शरीरा मधून निघते.
त्यांनी समजले, ती लाईट माझ्या मध्ये सामावली. आत्ता आत्मा काही सामावत नाही. ती
आत्मा तर जाऊन दुसरे शरीर घेते. तुम्ही खूप साक्षात्कार कराल. शेवटी तुम्ही फार
साक्षात्कार कराल. नाव आणि रूपापेक्षा वेगळे कोणती गोष्ट असत नाही. आकाश पोलार आहे,
त्याचे पण नाव आहे. आता हे तर मुलं समजतात, कल्प कल्प जी स्थापना होत आली आहे, ती
तर होणारच आहे. आम्ही ब्राह्मण क्रमानुसार पुरुषार्थ करत राहतो. जो जो सेकंद पास
होतो, त्याला वैश्विक नाटकच म्हणणार ना. साऱ्या दुनियाचे चक्र फिरत राहते, हे पाच
हजार वर्षांचे चक्र आहे, जूॅ सारखे फिरत राहते, टिकटिक होत राहते. आता तुम्हा गोड
गोड मुलांना, फक्त बाबांचीच आठवण करायची आहे. चालता-फिरता, काम करता बाबाची आठवण
करणे, यामधेच कल्याण आहे. परत माया चापट लगावते. तुम्ही ब्राह्मण आहात. भ्रमरी सारखे
किड्यांना, आपल्यासारखे ब्राह्मण बनवायचे आहे. ते भ्रमरीचे एक उदाहरण देतात. तुम्ही
खरेखुरे ब्राह्मण आहात. ब्राह्मणाला च परत देवता बनायचे आहे, म्हणून पुरुषोत्तम
बनण्यासाठी हे संगमयुग आहे. येथे तुम्ही पुरुषोत्तम बनण्यासाठी येतात. प्रथम तर
ब्राह्मण जरूर बनावे लागेल. ब्राह्मणांची शेंडी आहे ना. तुम्ही ब्राह्मणांना समजावू
शकता. तुम्ही सांगा, तुम्ही ब्राह्मण कुळाचे आहात. ब्राह्मणांची राजधानी नाही. तुमचे
हे कुळ कोणी स्थापन केले? तुमच्या मध्ये मोठे कोण आहेत?परत तुम्ही जेव्हा समजून
सांगाल, तर खूप खुश होतील. ब्राह्मणांना खूप मान देतात कारण ते ग्रंथ इत्यादी
ऐकवतात. अगोदर राखी बांधण्यासाठी पण ब्राह्मण येत होते. आजकाल तर तुम्ही मुली जातात.
तुम्ही त्यांनाच राखी बांधायची आहे, जे पवित्रतेची प्रतिज्ञा करतील. प्रतिज्ञा जरूर
करावी लागेल. भारताला परत पावन बनवण्यासाठी आम्ही ही प्रतिज्ञा करत आहोत. तुम्हीपण
पावन आणि दुसर्यांना पण पावन बनवा. दुसर्या कोणाची ताकत नाही, जे असे म्हणू शकतील.
तुम्ही जाणतात, या अंतीम जन्मांमध्ये पावन बनल्यामुळे आम्ही पावन दुनियाचे मालक बनू.
तुमचा धंदाच हा आहे. असे मनुष्य दुसरे कोणी असत नाहीत. तुम्ही जाऊन त्यांना
पवित्रतेची प्रतिज्ञा करावयाची आहे.
बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे, यालाच जिंकायचे आहे. याला जिंकल्यामुळे तुम्ही
जगजीत बनू शकाल. या लक्ष्मीनारायणने जरूर अगोदरच्या जन्मांमध्ये तीव्र पुरुषांर्थ
केला असेल, तेव्हाच असे बनले आहेत. आता तुम्ही स्पष्ट करू शकता. कोणत्या कर्माद्वारे
असे श्रेष्ठ पद मिळाले आहे. यामध्ये संभ्रमित होण्याची कोणतीच गोष्ट नाही. तुम्हाला
दिवाळी इत्यादीची खुशी नाही. तुम्हाला तर खुशी आहे आम्ही बाबाचे बनलो आहोत,
त्यांच्याद्वारे वारसा घेत आहोत. भक्तिमार्ग मध्ये मनुष्य खूप खर्च करतात, नुकसान
पण होत राहते, आग लागते, परंतु समजत नाहीत.
तुम्ही जाणतात आम्ही परत आपल्या नवीन घरी जाणार आहोत. चक्राची हुबेहूब पुनरावृत्ती
होते. हा बेहद्दचा चांगला सिनेमा आहे. बेहद्दची रीळ आहे. बेहद्द बाबांचे बनलो आहोत,
तर कापरी खुशी राहायला पाहिजे. आम्ही बाबा पासून स्वर्गाचा वारसा जरूर घेऊ. बाबा
म्हणतात पुरूषार्थ द्वारे, पाहिजे ते घेऊ शकता. पुरुषार्थ तुम्हाला जरूर करायचा आहे.
तुम्ही उच्च बनू शकता. हे ब्रह्मा बाबा वृद्ध असतानी पण किती उच्च बनू शकतात, तर
तुम्ही का नाही बनू शकतात, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) जसे बाबा
नेहमी मुलां प्रति सुखदायी आहेत, असेच सुखदाई बनायचे आहे. सर्वांना मुक्ती
जीवनमुक्तीचा रस्ता दाखवायचा आहे.
(२) देही अभिमानी
बनण्याची तपस्या करायची आहे. या जुन्या छी छी खराब दुनिये पासून बेहद्दचे वैरागी
बनायचे आहे.
वरदान:-
दिव्य
गुणांच्या आव्हाना द्वारे सर्व अवगुणांची आहुती देणारे संतुष्ट आत्मा भव.
जसे दिवाळी
वरती विशेष स्वच्छता आणि कमाईचे ध्यान ठेवतात. तसेच तुम्ही पण सर्व प्रकारची
स्वच्छता आणि कमाईचे लक्ष ठेवून संतुष्ठ आत्मा बना. संतुष्ठता द्वारेच सर्व दिव्य
गुणांचे आव्हान करू शकाल, परत अवगुणांची आहूती स्वतः होईल. आत्म्या मध्ये ज्या
कमजोरी, अवगुण, निर्बलता, कोमलता राहिली आहे, त्यांना नष्ट करुन आता नवीन खाते सुरू
करा. आणि नवीन संस्काराचे नवीन वस्त्र धारण करून, खरी दिवाळी साजरी करा.
बोधवाक्य:-
जर स्वमानच्या
आसनावरती नेहमी स्थिर राहायचे आहे, तर दृढ संकल्प चा पट्टा चांगल्या प्रकारे बांधा.