07-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, सर्वांना ही खुशखबर ऐकवा की, आता दैवी राज्याची स्थापना होत आहे, जेव्हा
निर्विकारी दुनिया असेल, तेव्हा बाकी सर्व विनाश होतील"
प्रश्न:-
रावणाचा श्राप
कधी मिळतो, श्रापित होण्याची लक्षणे कोणती आहेत?
उत्तर:-
जेव्हा तुम्ही देह अभिमानी बनतात, तेव्हा रावणाचा श्राप मिळतो. श्रापित आत्मे कंगाल
विकारी बनतात, त्यांची अधोगती होते. आत्ता बाबा पासून वारसा घेण्यासाठी, देही
अभिमानी बनायचे आहे. आपल्या दृष्टी वृत्तीला पावन बनवायचे आहे.
ओम शांती।
आत्मिक पिता, आत्मिक मुलांना, सन्मुख ८४ जन्माची कहाणी ऐकवत आहेत. हे तर समजतात
सर्व ८४ जन्म घेऊ शकत नाहीत. तुम्हीच प्रथम सतयुगा च्या सुरुवातीला देवी-देवता होते.
भारतामध्ये प्रथम पूज्य देवी-देवता धर्माचे राज्य होते. लक्ष्मीनारायणाचे राज्य होते,
तर जरूर त्यांची राजाई पण असेल ना. राजाई घराण्याचे मित्र संबंधी पण असतील, प्रजा
पण असेल. ही जसे कहानी आहे. पाच हजार वर्षापूर्वी पण यांचे राज्य होते, हे स्मृती
मध्ये ठेवायचे आहे. भारतामध्ये आदी सनातन देवी-देवता धर्माचे राज्य होते. हे बेहदचे
बाबा सन्मुख समजावत आहेत, त्यांनाच ज्ञानाचे सागर म्हटले जाते. हे ज्ञान कोणत्या
गोष्टीचे आहे. मनुष्य समजतात, ते तर सर्वांच्या मनामधील, कर्म विकर्माची गती जाणारे
आहेत, परंतू आता बाबा समजवतात, प्रत्येक आत्म्याला आपापली भूमिका मिळालेली आहे.
सर्व आत्मे आपल्या परमधाम मध्ये राहतात, त्यांच्या मध्ये सर्व भूमिका नोंदलेली आहे.
ते कर्म क्षेत्रावर आपली भूमिका वठवण्यासाठी तयार होऊन बसलेले असतात. हे पण तुम्ही
समजतात, आम्ही आत्माच सर्व काही करतो. आत्माच म्हणते, ही गोष्ट आंबट आहे, ही खारट
आहे. आत्मा समजते आता आम्ही विकारी पाप आत्मा आहोत, आसुरी स्वभाव आहे. आत्माच येथे
कर्मक्षेत्रा वरती शरीर घेऊन सर्व भूमिका वठवते. तर हा निश्चय करायला पाहिजे ना.
आम्ही आत्माच सर्व काही करतो. आता बाबांना भेटलो आहोत, परत पाच हजार वर्षानंतर भेटू.
हे पण समजतात पुज्य आणि पुजारी, पावन आणि पतित बनत आलो आहोत. जेव्हा पूज्य आहेत तर
पतित कोणी होऊ शकत नाहीत. जेव्हा पुजारी आहेत, तर पावन कोणी होऊ शकत नाहीत. सतयुगा
मध्ये पावन राज्य आहे. जेव्हा द्वापर युगापासुन रावण राज्य सुरू होते, तेव्हा सर्व
पतित पुजारी बनतात. शिवबाबा म्हणतात हे पहा, शंकराचार्य पण माझे पुजारी आहेत, माझी
पूजा करतात ना. शिवाचे चित्र, कोणाजवळ हिऱ्यांचे, कोणाजवळ सोन्याचे, तर कोणाजवळ
चांदीचे पण असते. आता जे पूजा करतात, त्या पुजारींना पूज्य तर म्हणू शकत नाहीत.
सर्व दुनिये मध्ये या वेळेत एक पण पूज्य होऊ शकत नाहीत. पवित्र पुज्य असतात, तेच
परत अपवित्र बनतात. नवीन दुनिया मध्ये पवित्र असतात. पवित्र आत्म्याची पूजा होते,
जसे कुमारी जेव्हा पवित्र आहे, तर पूजा करणे योग्य आहे. अपवित्र बनते तर सर्वांच्या
पुढे डोके ठेवायला लागते. पूजा करण्याची खूप सामग्री आहे. कुठेपण प्रदर्शनी,
संग्रहालय इत्यादी सुरू करतात तर, वरती त्रिमूर्ती शिव जरूर पाहिजे. खाली हे
लक्ष्मीनारायण चे मुख्य लक्ष आहे. आम्ही पूज्य देवी-देवता धर्माची स्थापना करत आहोत.
तेथे दुसरा कोणता धर्म नसतो. तुम्ही समजावू शकतात, प्रदर्शनी मध्ये भाषण इत्यादी करू
शकत नाहीत. समजण्यासाठी परत वेगळा प्रबंध करायला पाहिजे. मुख्य गोष्ट हीच आहे की,
आम्ही भारतवासींना खुशखबर ऐकवत आहोत, आम्ही दैवी राज्याची स्थापना करत आहोत. हे दैवी
घराणे होते, आता नाही, परत याची स्थापना होत आहे, बाकी सर्व विनाश होतील. सतयुगा
मध्ये जेव्हा एक धर्म होता, तर अनेक धर्म नव्हते. आता अनेक धर्म मिळून एक होतील, असे
होऊ शकत नाही. ते एक दोघांच्या नंतर येतात आणि वृद्धी होत राहते. प्रथम देवी देवता
धर्म जो होता, तो आता प्रायलोप झाला आहे. कोणीही नाही जे स्वतःला देवी-देवता धर्माचे
समजतील. यास विकारी दुनिया म्हटले जाते. तुम्ही म्हणू शकता आम्ही आपल्याला खुशखबर
ऐकवत आहोत, शिवबाबा निर्विकारी दुनिया स्थापन करत आहेत. आम्ही प्रजापिता ब्रह्माचे
संतान ब्रह्मकुमार कुमारी आहोत ना. प्रथम तर आम्ही भाऊ भाऊ आहोत परत रचना होते, तर
जरूर भाऊ बहीण बनतील. सर्वजण म्हणतात बाबा आम्ही आपले बनलो आहोत, तर भाऊ बहिणीची
विकारी दृष्टी जाऊ शकत नाही. हा अंतिम जन्म पवित्र बनायचे आहे, तेव्हाच पवित्र
विश्वाचे मालक बनू शकाल. तुम्ही जाणतात, गती सद्गती दाता एक पिताच आहेत. जुनी दुनिया
बदलून जरूर नवीन दुनियेची स्थापना होईल. ते तर भगवानच करू शकतात. आता ते नवीन दुनिया
कशी स्थापन करतात, हे तुम्ही मुलंच जाणतात. आता जुनी दुनिया आहे, आणखी नष्ट झालेली
नाही. ब्रह्मा द्वारा स्थापना असे चित्र पण आहे. यांच्या अनेक जन्माच्या अंतकाळातील
हा जन्म आहे. ब्रह्माची जोडी नाही, ब्रह्माची तर रचना आहे. हे ज्ञान समजून
सांगण्यासाठी युक्ती पाहिजे. शिवबाबा ब्रह्मामध्ये प्रवेश करून, आम्हाला आपले बनवत
आहेत. जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतील, तेव्हाच म्हणू शकतील हे आत्म्यांनो, तुम्ही
माझी मुलं आहात. आत्मे तर आहेतच परत ब्रह्मा द्वारा सृष्टीची स्थापना होईल, तर जरूर
ब्रह्मकुमार कुमारी असतील ना. तर बहीण भाऊ झाले ना. विकारी दृष्टी नष्ट होते. आम्ही
शिवबाबा पासून पावन बनण्याचा वारसा घेत आहोत. रावणा द्वारे आम्हाला श्राप मिळतो. आता
आम्ही देही अभिमानी बनत आहोत, तर बाबा पासून वारसा मिळतो. देह अभिमानी बनल्यामुळे
रावणाचा श्राप मिळतो. श्राप मिळाल्याने विकारी बनत जातात. आता भारत श्रापित आहे ना.
भारताला इतके कंगाल, विकारी कोणी बनवले? कोणाचा तर श्राप लागला ना. हा रावण रुपी
मायेचा श्राप आहे. प्रत्येक वर्षे रावणाला जाळतात, तर जरूर दुश्मन आहे ना. धर्मा
मध्येच शक्ती असते. आता आम्ही देवता धर्माचे बनत आहोत. बाबा नवीन धर्माची स्थापना
करण्यासाठी निमित्त आहेत. शक्तिशाली धर्माची स्थापना करतात. आम्ही बाबा पासून शक्ती
घेतो, तर विश्वावरती विजय मिळवतो. आठवणीच्या यात्रे द्वारे शक्ती मिळते आणि विकर्म
विनाश होतात, तर ही पण एक प्राप्ती लिहायला पाहिजे. आम्ही खुशखबर ऐकवत आहोत, आता या
धर्माची स्थापना होत आहे, ज्यालाच हेवन, स्वर्ग म्हणतात. असे मोठ मोठ्या
अक्षरांमध्ये लिहा. बाबा मत देतात, सर्वात मुख्य हे आहे. आता आदी सनातन देवी देवता
धर्माची स्थापना होत आहे. प्रजापिता ब्रह्मा पण सन्मुख आहेत. आम्ही प्रजापिता
ब्रह्माकुमार कुमारी श्रीमतावर हे कार्य करत आहोत. हे ब्रह्माचे मत नाही परंतु
परमपिता परमात्मा शिवाची श्रीमत आहे. जे सर्वांचे पिता आहेत. बाबा एक धर्माची
स्थापना आणि अनेक धर्माचा विनाश करतात. राजयोग शिकून आम्ही श्रेष्ठ बनत आहोत. आम्ही
पण असेच लक्ष्मीनारायण सारखे बनत आहोत. आम्ही बेहदचा संन्यास केला आहे, कारण ही जुनी
दुनिया नष्ट होणार आहे, हे जाणत आहोत. जसे नवीन घर बनवतात तर जुन्या घरापासून ममत्व
नष्ट होते. शिवपिता पण म्हणतात ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. आता तुमच्यासाठी
नवीन दुनियेची स्थापना करत आहे. तुम्ही नवीन दुनियेसाठी शिकत आहात. अनेक धर्माचा
विनाश, एका धर्माची स्थापना संगमयुगा मध्येच होते. लढाई लागेल, नैसर्गिक आपत्ती पण
होतील. यामध्ये जेव्हा यांचे राज्य होते, तर दुसरा कोणता धर्म नव्हता. बाकी सर्व
कोठे होते? हे ज्ञान बुद्धी मध्ये ठेवायचे आहे. असे नाही, हे ज्ञान बुद्धी मध्ये
ठेवत, दुसरे काम करू शकत नाही. खूप विचार चालतात, पत्र लिहिणे, वाचणे, नवीन घर बनवणे,
तरीही बाबांची आठवण करत राहतो. बाबांची आठवण केली नाहीतर विकर्म कसे विनाश होतील. .
. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे, तुम्ही अर्ध्या कल्पा साठी पुज्य बनत आहात.
अर्धा कल्प पुजारी तमोप्रधान, परत अर्धा कल्प पुज्य सतोप्रधान बनतात. आत्माच परमपिता
परमात्म्याशी योग लावल्या मुळेच पारस बनते. आठवण करत करत लोहयुगा पासुन सुवर्ण युगा
पर्यंत जाते. पतित पावन तर एकालाच म्हटले जाते. पुढे चालून तुमच्या ज्ञानाची
प्रसिद्धी होईल. हे तर सर्व धर्मासाठी आहे. तुम्ही सांगतात की, बाबा म्हणतात मीच
पतित-पावन आहे, माझी आठवण करा, तर तुम्ही पावन बनाल. बाकी सर्व कर्मभोग चुक्त करून
जातील. कुठे पण संभ्रमित होता तर तुम्ही विचारू शकता. सतयुगा मध्ये थोडीच लोकसंख्या
असते. आता अनेक धर्म आहेत, जरूर कर्मभोग चुक्तू करून परत असे बनतील, जसे होते.
विस्तार मध्ये जायचे नाही. तुम्ही जाणतात, प्रत्येक जण आपपली भूमिका वठवतील. आता
सर्वांना परत जायचे आहे कारण हे सर्व सतयुगामध्ये नव्हते. बाबा एक धर्माची स्थापना
आणि अनेक धर्माचा विनाश करण्यासाठीच येतात. आता नवीन दुनियेची स्थापना होत आहे, परत
सतयुग जरूर येईल. चक्र जरूर फिरत राहील. जास्त विचारांमध्ये जायचे नाही. मुख्य एकच
गोष्ट आहे, आम्ही सतोप्रधान बनू तर उच्चपद मिळेल. कुमारींना तर सेवेमध्ये तत्पर
राहयचे आहे. कुमारींची कमाई मात-पिता खाऊ शकत नाहीत परंतु आजकाल कुमारी ना पण कमाई
करावी लागते. तुम्ही समजता पवित्र बनून पवित्र दुनिया चे मालक बनायचे आहे. आम्ही
राजयोगी आहोत, बाबा पासून वारसा जरूर घ्यायचा आहे.
आता तुम्ही पांडव सेनाचे बनले आहात. आपली सेवा करत, हे विचार करायचे आहेत. आम्ही
जाऊन सर्वांना रस्ता सांगू, जितके कराल तेवढे उच्चपद मिळेल. बाबांना विचारू शकता,
या परिस्थितीमध्ये मृत्यू झाला तर आम्हाला कोणते पद मिळेल. बाबा लगेच सांगतील, सेवा
करत नाही तर साधारण घरांमध्ये जन्म मिळेल, परत हे ज्ञान घेणे तर कठीण आहे, कारण
लहान मुलगा इतके ज्ञान तर घेऊ शकणार नाही. तुम्ही समजाल, बाकी दोन-तीन वर्षे राहतात,
तर काय शिकू शकतील. बाबा सांगतील, तुम्ही क्षत्रिय कुळामध्ये जाऊन जन्म घ्याल.
अंतकाळामध्ये दुहेरी मुकुट मिळू शकेल. स्वर्गाचे पूर्ण सुख तर मिळू शकणार नाही. जे
खूप सेवा करतील, राज योगाचा अभ्यास करतील, तेच पूर्ण सुख मिळवू शकतील. क्रमानुसार
पुरुषार्थ नुसार तर आहेतच. हाच विचार करायचा आहे की, आता नाही बनणार तर, कल्प कल्प
बनू शकणार नाहीत. प्रत्येकजण स्वतःला जाणू शकतात, आम्ही कोणत्या मार्गाने पास होऊ.
सर्व जाणतील, परत म्हटले जाईल भावी. अंतकाळात दुःख होईल. बसल्या बसल्या आम्हाला काय
झाले. बरेच मनुष्य बसल्या बसल्या मरतात, म्हणून बाबा म्हणतात आळस करू नका.
पुरुषार्थ करुन पतिता पासून पावन बनत रहा. अनेकांना मार्ग दाखवत रहा, कोणी मित्र
संबंधी इत्यादी आहेत, त्यांच्यावर ती दया येते ना. असे पाहतात, जे विकारा शिवाय राहू
शकत नाहीत, खराब गोष्टी खाण्याशिवाय राहू शकत नाहीत, तरीही त्यांना समजावत राहायला
पाहिजे. ते मानत नाहीत तर समजा आमच्या कुळाचे नाहीत. प्रयत्न करून माहेर आणि सासर
चे कल्याण करायचे आहे. अशी पण चलन नको, जे म्हणतील हे तर आमच्याशी बोलत पण नाहीत.
तोंड फिरवले आहे, नाही. सर्वांशी गोष्टी करायच्या आहेत. आम्हाला त्यांचे पण कल्याण
करायचे आहे. खूप दयाळू बनवायचे आहे. आम्ही सुखाकडे जातो, तर दुसऱ्याला पण रस्ता
सांगायचा आहे. अंधाची काठी तुम्ही आहात ना. असे गायन पण आहे. आनंदाची काठी तुम्ही.
हे डोळे तर सर्वांना आहेत, तरीही बोलवतात कारण ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही. शांती
सुखाचा रस्ता दाखवणारे तर एक बाबाच आहेत. हे तुम्हा मुलांच्या बुद्धि मध्ये आहे.
अगोदर थोडेच समजत होते. भक्तिमार्गा मध्ये खूप मंत्र जप करत राहतात. राम राम म्हणून
माशांना खाऊ घालत होते, मुंग्यांना पण खाऊ घालत होते. आता ज्ञान मार्गामध्ये तर, तसे
काही करण्याची आवश्यकता नाही. पक्षी इ. तर अनेक मरून जातात, एकाच वादळामध्ये अनेक
मारतात. नैसर्गिक आपत्ती तर खूप जोरात येईल, त्याची रंगीत तालीम होत राहते. हे सर्व
विनाश तर होणारच आहे. मनामध्ये येते आता आम्ही स्वर्गा मध्ये जाऊ. तेथे आम्ही खूप
सुंदर महल बनवू, जसे कल्पा पूर्वी बनवले होते. तसेच बनतील, जसे कल्पापुर्वी बनवले
होते. त्यावेळेस तेच बुद्धीमध्ये येईल, त्याचा विचार आत्ताच का करायचा? यापेक्षा तर
बाबाच्या आठवणीमध्ये रहा. आठवणीच्या यात्रेला विसरू नका. कल्पा पूर्वीसारखेच महल
बनतील. परंतु आत्ता आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. खूप खुशी मध्ये राहायचे आहे
की आम्हाला शिव पिता, शिक्षक, सद्गुरु मिळाले आहेत. ह्या आनंदामध्ये अंगावर शहारे
यायला पाहिजेत. तुम्ही जाणतात आम्ही अमरपुरी चे मालक बनण्यासाठी आलो आहोत. आनंद
कायमस्वरूपी राहायला पाहिजे. येथे राहाल, तेव्हाच २१ जन्म स्वर्गात पण राहू शकाल.
अनेकांना बाबांची आठवण करून देत राहाल, तर स्वतःची पण आठवण वाढेल, परत सवय लागेल.
तुम्ही जाणतात या अपवित्र दुनियेला आग लागणार आहे. तुम्ही ब्राह्मणच आहात, ज्यांना
हा विचार आहे की, इतकी मोठी दुनिया नष्ट होईल. सतयुगामध्ये हे काहीच माहिती होणार
नाही. आता अंत आहे, तुम्ही आठवणीसाठी पुरुषार्थ करत आहात. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती, मातपिता बापदादाची प्रेम पूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आतापासून
पावन बनण्यासाठी पुरुषार्थ मध्ये आळस करायचा नाही. कोणीही मित्र संबंधित इत्यादी
आहेत तर, त्यांच्यावरती दया करून समजावयाचे आहे, सोडायचे नाही.
(२) अशी चलन ठेवायची नाही, जे कोणी म्हणतील, हे तर आमच्याशी बोलत पण नाहीत. दयाळू
बनून सर्वांचे कल्याण करायचे आहे. बाकी सर्व विचार सोडून एक बाबांच्या आठवणी मध्ये
राहायचे आहे
वरदान:-
सामवण्याच्या
शक्तीद्वारे चुकीच्या गोष्टीला पण बरोबर बनवणारे विश्व परिवर्तक भव.
दुसऱ्यांची
चूक पाहून स्वतः चूक करू नका. जर कोणी चूक करतात तर आम्हाला श्रीमतावर चालायचे आहे.
त्याच्या संगतीच्या प्रभावा मध्ये यायचे नाही. जे प्रभावामध्ये येतात, ते आळशी
बनतात. प्रत्येकाने ही जिम्मेवारी घ्या की, मी सत्य मार्गावर चालत राहील. जर दुसरे
कोणी चुकीचे करतात, त्यावेळेस सामवण्याच्या शक्तीचा वापर करा. कोणाच्या चुकीला
नोंद करण्याच्या ऐवजी त्याला सहयोगाचा हात देऊन, सहयोगाने भरपूर करा. तर विश्व
परिवर्तनाचे कार्य सहज होईल.
बोधवाक्य:-
निरंतर योगी
बनवायचे आहे तर, हदचे मी आणि माझ्या पणाला बेहदमध्ये परिवर्तन करा.