26-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, आपल्या संस्कारांना सुधरवण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे,
बाबांची आठवण तुम्हाला सदैव सौभाग्यशाली बनवेल. "
प्रश्न:-
अवस्थेची पारख
कोणत्या वेळी होते?चांगली अवस्था कोणाची म्हणायचे?
उत्तर:-
अवस्थेची पारख आजारी असल्यावर होते. आजारी असताना ही खुश राहायला पाहिजे आणि हर्षित
चेहऱ्याने सर्वांना बाबांची आठवण करून देत रहा, ही आहे चांगली अवस्था. जर स्वतः रडले,
उदास झाले तर दुसऱ्यांना हर्षित मुख कसे बनवणार?काहीही झाले तरी- रडायचे नाही.
ओम शांती।
दुर्भाग्यशाली आणि सौभाग्यशाली या दोन अक्षरांचे गायन आहे. सौभाग्य निघून
गेल्यानंतर दुर्भाग्य असे म्हटले जाते. स्त्रीचा पती मेल्यानंतरही दुर्भाग्य म्हटले
जाते. ती एकटी पडते. आता तुम्ही जाणत आहात आम्ही सदाकाळासाठी सौभाग्यशाली बनत आहोत.
तिथे दुःखाची गोष्टच नाही. मृत्यूचे नाव ही नसते. विधवा नावही तिथे नसते. विधवेला
दुःख होते, रडत राहते. जरी साधुसंत आहेत, असे नाही की त्यांना कोणतेही दुःख होत नाही.
कुणी वेडे होतात, कोणी आजारी रोगी ही होतात. ही आहेच रोगी दुनिया. सतयुग आहे निरोगी
दुनिया. तुम्ही मुले समजत आहात आम्ही भारताला पुन्हा एकदा निरोगी बनवत आहोत. यावेळी
मनुष्यांचे संस्कार खूप खराब आहेत. संस्कार सुधारणारे विभागही आहेत. शाळेमध्ये ही
विद्यार्थ्यांचे रजिस्टर ठेवले जाते. त्यामुळे त्यांच्या संस्कारां बद्दल माहिती
पडते म्हणून बाबांनी ही रजिस्टर ठेवले होते. प्रत्येकाने आपले रजिस्टर ठेवायला
पाहिजे. आपले संस्कार पाहायला पाहिजेत आम्ही कोणती चुक तर करत नाही. पहिली गोष्ट तर
बाबांची आठवण करायची आहे. त्यामुळेच तुमचे संस्कार सुधारतात. एकाच्या आठवणी मुळे
तुमचे आयुष्य ही वाढते. हे तर ज्ञान रत्न आहेत. आठवणीला रत्न म्हटले जात नाही.
आठवणीने तुमचे संस्कार सुधारतात. हे 84 जन्मांचे चक्र तुमच्या शिवाय दुसरे कोणी
समजावून सांगू शकत नाही. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर ही समजवायचे आहे. शंकराचे तर
कोणतेही चरित्र नाही. तुम्ही मुले जाणता ब्रह्मा आणि विष्णू चा आपसामधे काय संबंध
आहे. हे लक्ष्मी-नारायण विष्णूचे दोन रूप आहेत. तेच नंतर ८४ जन्म घेतात. ८४
जन्मामध्ये स्वतःच पूज्य आणि स्वतःच पुजारी बनतात. प्रजापिता ब्रह्मा तर अवश्य इथेच
असायला पाहिजेत ना. साधारण शरीर पाहिजे. जास्त करुन इथेच गोंधळून जातात. ब्रह्मा तर
आहे पतित-पावन बाबांचा रथ. म्हणतात ही-दूर देशाचा राहणारा परक्या देशामध्ये आला. .
. . . पावन दुनिया बनवणारा पतित-पावन पिता पतित दुनियेमध्ये आले. पतित दुनियेमध्ये
एकही पावन असू शकत नाही. आता तुम्हा मुलांना आम्ही ८४ जन्म कसे घेतो हे समजले आहे.
कोणीतरी घेत असेल ना. जे सुरुवातीला येतात त्यांचे ८४ जन्म होतात. सतयुगामध्ये देवी
देवताच येतात. 84 जन्म कोण घेतात याविषयी मनुष्यांच्या मनात थोडाही विचार चालत नाही.
या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. पुनर्जन्माला तर सर्वजण मानतात. ८४ पुनर्जन्म झाले
आहेत, हे खूप युक्तीने समजवायचे आहे. ८४जन्म तर सर्वजण घेणार नाहीत. एकाच वेळी
सर्वजण थोडीच येतील आणि शरीर सोडतील. भगवानुवाच आहे की तुम्ही आपल्या जन्माला जाणत
नाहीत, भगवानच सन्मुख समजावत आहेत. तुम्ही आत्मे ८४ जन्म घेता. ही ८४ जन्मांची कहाणी,
बाबा तुम्हा मुलांना बसून सांगत आहेत. हे सुद्धा एक शिक्षण आहे. ८४च्या चक्राला
जाणणे खूप सोपे आहे. दुसऱ्या धर्माचे या सर्व गोष्टींना समजू शकणार नाहीत. तुमच्या
मध्येही सर्वजण ८४ जन्म घेत नाहीत. सर्वांचे ८४ जन्म झाले तर सर्वच एकत्र येतील.
हेही होऊ शकत नाही. सर्व काही शिक्षण आणि आठवणीवर अवलंबून आहे. त्यामध्ये सुद्धा
आठवणीचा प्रथम क्रमांक आहे. अवघड विषयाचे मार्क जास्त मिळतात. त्यांचा प्रभावही असतो.
उत्तम, मध्यम, कनिष्ठ विषयही असतात ना. इथे दोन मुख्य विषय आहेत. बाबा म्हणतात माझी
आठवण करा तर संपूर्ण निर्विकारी बनाल आणि नंतर विजय माळेमध्ये गुंफले जाल. ही शर्यत
आहे. प्रथम स्वतःला पाहायचे आहे की मी किती धारणा करतो?किती आठवण करतो?माझे संस्कार
कसे आहेत?जर मलाच रडायची सवय असेल तर दुसऱ्यांना हर्षित मुख कसे बनवू शकतो?बाबा
म्हणतात जे रडतात ते हरतात. काही झाले तरीही रडण्याची गरज नाही. आजारी असाल तरी
खुशीने एवढे तर म्हणू शकता की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आजारी असल्या
वरच अवस्थेची पारख होते. त्रास होत असल्यावर कण्हत असल्याचा आवाज थोडा निघतो परंतु
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. बाबांनी संदेश दिला आहे.
पैगंबर-मेसेंजर एक शिवबाबा आहे दुसरे कोणीही नाही. बाकी सर्वजण भक्तीमार्गाच्या
गोष्टी सांगतात. या दुनियेमध्ये ज्या पण वस्तू आहेत सर्व विनाशी आहेत, आता तुम्हाला
जिथे तोडफोड नाही अशा ठिकाणी घेऊन जात आहे. तिथे तर वस्तूच अशा चांगल्या बनतील
तुटण्याचे नाव ही नसेल. इथे विज्ञानाने किती वस्तू बनवतात, तुमच्यासाठी खूप सुख
पाहिजे म्हणून तिथे ही विज्ञान अवश्य असेल. बाबा म्हणतात तुम्हा मुलांना काहीही
माहीत नव्हते. भक्तिमार्ग केव्हा सुरू झाला, तुम्ही किती दुःख पाहिले- या सर्व
गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. देवतांना म्हटले जाते-सर्वगुण संपन्न. . . .
नंतर त्या कला कशा कमी झाल्या?आता तर कोणतीही कला राहिलेली नाही. चंद्राच्या ही
हळूहळू कला कमी होतात ना.
तुम्ही जाणता की ही दुनिया सुरुवातीला जेव्हा नवी होती तेव्हा प्रत्येक वस्तू
सतोप्रधान नंबर एक होती. नंतर जुनी होत- होतं कला कमी होतात. हे लक्ष्मी-नारायण
सर्वगुणसंपन्न आहेत ना. आता बाबा तुम्हाला खरी-खरी सत्यनारायणाची कथा ऐकवत आहेत. आता
रात्र आहे नंतर दिवस होतो. तुम्ही संपूर्ण बनता तर तुमच्यासाठी सृष्टी सुद्धा अशीच
पाहिजे. ५ तत्व सुद्धा सतोप्रधान (१६ कला संपूर्ण) बनतात त्यामुळे तुमचे शरीर सुद्धा
नैसर्गिक सुंदर असते सतोप्रधान असते. ही सारी दुनिया १६ कला संपूर्ण बनते. आता तर
कोणतीही कला नाही, जे पण मोठे-मोठे लोक आहेत किंवा महात्मा इ. आहेत हे बाबांचे
ज्ञान त्यांच्या भाग्यामध्ये नाही. त्यांना स्वतःचा खूप अभिमान आहे. जास्त करून
गरिबांच्या भाग्यामध्येच आहे. काहीजण म्हणतात एवढा उच्च पिता आहे, त्यांनी तर
एखाद्या मोठ्या राजा किंवा पवित्र ऋषी इ. च्या शरीरामध्ये यायला पाहिजे. संन्यासी
पवित्र असतात. पवित्र कन्येच्या शरीरामध्ये यावे. मी कोणा मध्ये येतो हे बाबा बसून
समजावतात. जो पूर्ण ८४ जन्म घेतो त्याच्यामध्येच मी येतो. एक दिवसही कमी नाही.
कृष्ण जन्माला आला त्या वेळेपासून 16 कला संपूर्ण होता. नंतर सतो, रजो, तमो मध्ये
येतो. प्रत्येक वस्तू सुरुवातीला सतोप्रधान नंतर सतो, रजो, तमो मध्ये येते.
सतयुगामध्ये ही असे होते. मुलगा सतोप्रधान आहे नंतर मोठे झाल्यावर म्हणतो, आता मी
हे शरीर सोडून सतोप्रधान मुलगा बनतो. तुम्हा मुलांना एवढा नशा नाही. खुशीचा पारा
चढत नाही. जे चांगली मेहनत करतात त्यांचा खुशीचा पारा चढत राहतो. चेहरा सुद्धा
हर्षित मूख राहतो. पुढे जाऊन तुम्हाला साक्षात्कार होत राहतील. ज्याप्रमाणे घर जवळ
आल्यानंतर ते घरदार इ. आठवणी मध्ये येते ना. इथे सुद्धा असेच आहे. पुरुषार्थ
करता-करता तुमची प्रारब्ध जेव्हा जवळ येईल तेव्हा खूप साक्षात्कार होत राहतील. खुशी
मध्ये रहाल. जे नापास होतात ते लाज वाटून बुडून मरतात. तुम्हालाही बाबा सांगतात
नंतर खूप पश्चाताप करावा लागेल. आपल्या भविष्याचा साक्षात्कार कराल, आम्ही काय
बनणार आहोत?बाबा दाखवतील हे-हे विकर्म इ. केले आहेत. पूर्ण शिकले नाहीत, निंदा केली,
म्हणून ही सजा मिळत आहे. सर्व साक्षात्कार होईल. साक्षात्कारा शिवाय सजा कशी देणार.
कोर्टामध्ये ही सांगतात-तू हे-हे केले आहे, त्याची ही सजा आहे. जोपर्यंत कर्मातीत
अवस्था होत नाही तोपर्यंत काही ना काही निशाणी राहील. आत्मा पवित्र झाल्यानंतर शरीर
सोडावे लागेल. इथे राहू शकत नाही. ती अवस्था तुम्हाला धारण करायची आहे. आता तुम्ही
परत जाऊन नव्या दुनियेमध्ये येण्यासाठी तयारी करत आहात. तुमचा पुरुषार्थ हा आहे की,
आम्ही लवकर-लवकर जाऊ नंतर लवकर-लवकर येऊ. ज्याप्रमाणे मुलांना खेळामध्ये पळवतात
ना. एखाद्या लक्ष्या पर्यंत जाऊन परत यायचे आहे. तुम्हाला ही लवकर-लवकर जायचे आहे,
नंतर प्रथम क्रमांकावर नव्या दुनियेमध्ये यायचे आहे. तर तुमची ही शर्यत आहे.
शाळेमध्ये ही शर्यत लावतात ना. तुमचा हा प्रवृत्ती मार्ग आहे. तुमचा सुरुवातीला
पवित्र ग्रहस्थ धर्म होता. आता आहे अपवित्र नंतर पवित्र दुनिया बनेल. तुम्ही या
गोष्टींचे स्मरण करत रहीले तरीही खूप खुशी राहील. आम्हीच राज्य घेतो नंतर गमावतो.
अभिनेता अभिनेत्री म्हणतात ना. हिर्या सारखा जन्म घेऊन नंतर कवडी सारख्या जन्माला
येता.
आता बाबा म्हणतात-तुम्ही कवडींच्या पाठीमागे आपला वेळ वाया घालवू नका. हे म्हणतात
आम्ही सुद्धा वेळ वाया घालवत होतो. तर आम्हालाही सांगितले आता तर तुम्ही माझे बनून
हा आत्मिक धंदा करा. तर पटकन सर्व काही सोडून दिले. पैसे कुणी फेकून तर देणार नाही.
पैसे तर कामी येतात. पैशाशिवाय घर इ. थोडीच मिळू शकते. पुढे चालून मोठे-मोठे धनवान
येतील. तुम्हाला मदत करत राहतील. एक दिवस तुम्हाला मोठ्या- मोठ्या कॉलेज
विद्यापीठामध्ये जाऊन भाषण करावे लागेल की हे सृष्टीचे चक्र कसे फिरत असते.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतिहास पुनरावृत्त होतो. स्वर्णिम युगापासून लोह
युगापर्यंतचा सृष्टीचा इतिहास-भूगोल आम्ही सांगू शकतो. संस्कारांवरती तर तुम्ही खूप
समजावू शकता. या लक्ष्मी-नारायणाची महिमा करा. भारत किती पावन होता, दैवी संस्कार
होते. आता तर आसुरी संस्कार आहेत. अवश्य नंतर चक्राची पुनरावृत्ती होईल. आम्ही
दुनियेचा इतिहास-भूगोल ऐकवू शकतो. तिथे चांगल्या-चांगल्यानी जायला पाहिजे. जिथे
अंतरराष्ट्रीय अध्यात्मिक संस्था आहेत, तिथे तुम्ही भाषण करा. कृष्ण तर देवता होता,
सतयुगामध्ये होता. प्रथम श्रीकृष्ण आहे जो नंतर नारायण बनतो. आम्ही तुम्हाला
श्रीकृष्णाच्या ८४ जन्माची कहाणी ऐकवतो, जे दुसरे कोणी ऐकवू शकत नाहीत. हा विषय किती
मोठा आहे. जो हुशार आहे त्यांने भाषण करायला पाहिजे. आता तुमच्या मनामध्ये येते,
आम्ही विश्वाचे मालक बनणार, किती खुशी व्हायला पाहिजे. आत बसून हा जप जपा, नंतर
तुम्हाला ही दुनिया आकर्षित करणार नाही. इथे तुम्ही आले आहात-परमपिता परमात्म्या
द्वारे-विश्वाचे मालक बनण्यासाठी. विश्व तर या दुनियेलाच म्हटले जाते. ब्रह्मलोक
किंवा सूक्ष्मवतनला विश्व म्हणू शकत नाही. बाबा म्हणतात मी विश्वाचा मालक बनत नाही.
या विश्वाचे मालक तुम्हा मुलांना बनवतो. किती गुह्य गोष्टी आहेत. तुम्हाला विश्वाचे
मालक बनवतो. नंतर तुम्ही मायेचे दास बनता. इथे जेव्हा समोर योगामध्ये बसवता तेव्हाही
आठवण करून द्यायची आहे-आत्म अभिमानी होऊन बसा, बाबांची आठवण करा. 5 मिनिटांनंतर
पुन्हा बोला. तुमचे योगाचे कार्यक्रम चालतात ना. अनेकांची बुद्धी बाहेर निघून जाते
म्हणून ५-१० मिनिटानंतर पुन्हा सावधान करायला पाहिजे. स्वतःला आत्मा समजून बसले
आहात?बाबांची आठवण करत आहात? तर स्वतःचेही लक्ष राहील. बाबा या सर्व युक्त्या सांगत
आहेत. वेळोवेळी सावधान करा. स्वतःला आत्मा समजून शिवबाबांच्या आठवणीत बसले आहात
का?तर ज्यांचा बुद्धी योग भटकत असेल ते उभे राहतील. वेळोवेळी हे आठवण करून द्यायला
पाहिजे. बाबांच्या आठवणीने तुम्ही पलीकडच्या तीरावर पोहोचणार आहात. गातही राहतात
खिवैया, माझी नौका पार कर. परंतु अर्थ समजत नाहीत. मुक्तिधाम मध्ये जाण्यासाठी
अर्धाकल्प भक्ती केली आहे. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा तर मुक्तिधाम मध्ये
निघून जाल. तुम्ही इथे पाप नष्ट करण्यासाठी बसले आहात तर नंतर पाप थोडीच करायला
पाहिजे. नाहीतर नंतर पाप राहून जातील. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे-हा
नंबर एकचा पुरुषार्थ आहे. अशाप्रकारे सावधान करत राहिल्याने लक्ष राहील. स्वतःलाही
सावधान करायचे आहे. स्वतः आठवणी मध्ये बसले तरच इतरांना बसवू शकतील. मी आत्मा आहे,
आपल्या घरी जात आहे. नंतर येऊन राज्य करणार आहे. स्वतःला शरीर समजणे-हा सुद्धा एक
खूप मोठा आजार आहे म्हणूनच सर्वजण रसातळाला मध्ये गेले आहेत. नंतर त्यांची मदत
करायची आहे. अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. आपला वेळ
आत्मिक धंद्यामध्ये सफल करायचा आहे. हिऱ्या सारखे जीवन बनवायचे आहे. स्वतःला सावधान
करत राहायचे आहे. शरीर समजण्याच्या मोठ्या आजारापासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा
आहे.
2. कधीही मायेचे दास बनायचे नाही. आत मध्ये बसून जप जपायचा आहे की मी आत्मा आहे.
आम्ही गरीबा पासून राजकुमार बनत आहोत ही खुशी राहायला हवी.
वरदान:-
पवित्रतेच्या(वाइसलेस) शक्तीद्वारे सूक्ष्मवतन किंवा तिन्ही लोकांचा अनुभव करणारे
श्रेष्ठ भाग्यवान भव
जा मुलांजवळ
पवित्रतेची शक्ती आहे, बुद्धीयोग बिलकुल शुद्ध आहे-अशी भाग्यवान मुले सहजच तिन्ही
लोकांची सहल करू शकतात. सूक्ष्मवतन पर्यंत आपले संकल्प पोहोचवण्यासाठी सर्व
संबंधांची महीन(गुह्य)आठवण पाहिजे. हीच सर्वात शक्तिशाली तार आहे, यामध्ये माया
हस्तक्षेप करू शकत नाही. तर सूक्ष्मवतनच्या दृश्याचा अनुभव करण्यासाठी स्वतःला
पवित्रतेच्या शक्तींनी संपन्न बनवा.
बोधवाक्य:-
कोणत्याही
व्यक्ती, वस्तू व वैभवा प्रति आकर्षित होणे म्हणजेच सोबती बाबांना संकल्पा द्वारे
घटस्फोट देणे आहे.