24-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही दुःख सहन करण्या मध्ये फार वेळ वाया घालवला आहे, आता दुनिया बदलत आहे, तुम्ही बाबाची आठवण करा, सतोप्रधान बना, तर वेळ सफल होईल."

प्रश्न:-
21 जन्मासाठी लॉटरी प्राप्त करण्याचा पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
21 जन्माची लॉटरी घ्यायची असेल, तर मोहजीत बना. एका बाबा वर पूर्णपणे समर्पित व्हा.नेहमी हे स्मृतीत ठेवा कि, आता ही जुनी दुनिया बदलत आहे, आम्ही नवीन दुनिये मध्ये जात आहोत. या जुन्या दुनियेला पाहून पण पाहायचे नाही. सुदामा सारखे मुठभर तांदूळ सफल करून, सतयुगी बादशाही घ्यायची आहे.

ओम शांती।
आत्मिक मुलांना, आत्मिक पिता समजावत आहेत, हे तर मुले समजत आहेत. आत्मिक मुले म्हणजे आत्मे. आत्मिक पिता म्हणजे आत्म्यांचा पिता. याला म्हटले जाते, आत्मा आणि परमात्मा चे मिलन. हे मिलन एकाच वेळी होत आहे. या सर्व गोष्टी तुम्हीं मुले जाणत आहात. ही विचित्र गोष्ट आहे. विचित्र पिता, विचित्र आत्म्यांना समजावत आहेत. खरेंतर आत्मा विचित्र आहे, येथे येऊन चित्रधारी बनत आहे. चित्र घेऊन अभिनय करत आहे. आत्मा तर सर्वां मध्ये आहे ना. जनावरा मध्ये पण आत्मा आहे. 84 लाख म्हणतात, त्यामध्ये तर सर्व जानवर येत आहेत ना. अनेक जनावरे इत्यादी आहेत ना. बाबा समजावत आहेत, या गोष्टीं मध्ये वेळ वाया घालवू नका. या ज्ञाना शिवाय मनुष्यांचा वेळ वाया जात आहे. यावेळी बाबा तुम्हा मुलांना शिकवत आहेत, मग आर्धा कल्प तुम्ही प्रारब्ध प्राप्त करता. तिथे तुम्हाला कोणता त्रास होत नाही. तुमचा वेळ, दुःख सहन करण्यामध्ये वाया जातो. इथे तर दुःख च दुःख आहे, त्यामुळे सर्व बाबाची आठवण करतात कि, आमचा दुःखांमध्ये वेळ वाया जात आहे, यातून मुक्त करा. सुखा मध्ये वेळ वाया जातो असे म्हणत नाहीत. हे पण तुम्ही जाणता, यावेळी मनुष्यांची कांही किंमत नाही. मनुष्य पाहा अचानक मरून जातात. एकाच वादळा मध्ये किती मरून जातात. रावण राज्या मध्ये मनुष्यांची कांही किंमत नाही. आता बाबा तुमची किती किंमत वाढवत आहेत. कवडी पासून हिरे तुल्य बनवत आहेत.गायन पण केले जाते, हिऱ्या सारखा जन्म, अमोलक आहे. यावेळी मनुष्य कवडी च्या मागे लागले आहेत. जरी लखपती करोडपती पदमपती बनत आहेत, त्यांची सारी बुद्धी त्यामध्येच राहते. त्यांना सांगतात, हे सर्व विसरून एका बाबाची आठवण करा, परंतु मानतच नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये बसेल, ज्यांच्या बुद्धीमध्ये कल्पा पूर्वी बसले होते. नाहीतर कितीपण समजावा, कधी बुद्धीमध्ये बसणार नाही. तुम्ही पण नंबरवार जाणत आहात कि, ही दुनिया बदलत आहे जरी बाहेर तुम्ही लिहून ठेवले कि, दुनिया बदलत आहे, तरी पण समजणार नाहीत. जो पर्यंत तुम्ही कोणाला समजावत नाहीत. बरें, कोणी समजेल, त्यांना सांगावयाचे आहे, बाबाची आठवण करा, सतोप्रधान बना. ज्ञान तर फार सोपे आहे. हे सूर्यवंशी चंद्रवंशी…... आता ही दुनिया बदलत आहे, बदलविणारे एक बाबाच आहेत. हे पण तुम्ही यथार्थ रीतीने जाणत आहात, ते पण नंबरवार पुरुषार्था नुसार. माया पुरषार्थ करू देत नाही, मग समजतात, हे पण विश्व नाटकानुसार तेवढा पुरुषार्थ करत नाहीत. आता तुम्ही मुले जाणता कि, श्रीमता द्वारे आम्ही आमच्या साठी या दुनियेला बदलत आहोत. श्रीमत एका शिवबाबाची आहे. शिवबाबा, शिवबाबा म्हणणे तर फार सोपे आहे, आणखीन कोणी ना शिवबाबाला,ना प्राप्तीला ओळखतात. बाबा म्हणजेच वरसा. शिवबाबा पण खरे पाहिजेत ना.आज काल तर महापौराला पण पिता म्हणतात. गांधीना पण पिता म्हणत आहेत. कोणाला मग जगद्गुरु म्हणतात. आता जगत म्हणजे साऱ्या सृष्टीचा गुरु. ते कोणी मनुष्य कसे होऊ शकतील! तसे तर पतीत पावन सर्वांचा सदगती दाता एक बाबा आहेत‌. बाबा तर निराकार आहेत, मग ते कसे मुक्त करत आहेत? दुनिया बदलत आहे, तर जरूर ते अभिनय करतात, तेंव्हा तर माहित पडते. असे नाही कि, प्रलय होत आहे, मग बाबा नवीन सृष्टी रचत आहेत. ग्रंथा मध्ये दाखवले आहे, फार मोठा प्रलय होतो, मग पिंपळा च्या पानावर कृष्ण येतात. परंतु बाबा समजावतात, असे तर होत नाही. गायन पण आहे, जगाच्या इतिहास भूगोला ची पुनरावृत्ती होत आहे, मग प्रलय कसा होईल. तुमच्या मना मध्ये आहे कि, आता ही जुनी दुनिया बदलत आहे. या सर्व गोष्टी बाबा येऊन समजावत आहेत. हे लक्ष्मी नारायण नवीन दुनियेचे मालक आहेत. तुम्ही चित्रांमध्ये पण दाखवत आहात कि, जुन्या दुनिये चा मालक रावण आहे. राम राज्य आणि रावण राज्याचे गायन आहे ना. या गोष्टी तुमच्या बुद्धी मध्ये आहेत कि, बाबा जुनी आसुरी दुनिया नष्ट करून, नवीन दैवी दुनिये ची स्थापना करत आहेत. बाबा म्हणतात, मी जो आहे, जसा आहे, कोणी विरळे च समजत आहेत. ते पण तुम्ही नंबरवार पुरुषार्था नुसार जाणत आहात.जे चांगले पुरषार्थी आहेत, त्यांना फार चांगला नशा राहतो. आठवण करणाऱ्या पुरुषार्थींना खरा नशा चढतो. 84 च्या चक्राचे ज्ञान समजल्याने एवढा नशा चढत नाही, जेवढा आठवणीच्या यात्रे ने चढत आहे. मूळ गोष्ट आहेच पावन बनण्याची. म्हणतात पण, येऊन पावन बनवा. असे म्हणत नाहीत कि, येवून बादशाही द्या. भक्ती मार्गामध्ये कथा पण किती ऐकत आहेत. खरी खरी सत्य नारायणा ची कथा तर ही आहे. त्या कथा तर जन्म जन्मांतर ऐकत, ऐकत खाली उतरत आले आहात. भारता मध्ये च या कथा ऐकण्याची प्रथा आहे, आणखीन कोणत्या खंडामध्ये कथा इत्यादी होत नाहीत. भारताला च धार्मिक मानतात. अनेकानेक मंदिरे भारता मध्ये आहेत. ख्रिश्चनांचा तर एकच चर्च असतो. इथे तर वेगवेगळ्या प्रकारची अनेक मंदिरे आहेत. खरे तर एका च शिवबाबा चे मंदिर असायला पाहिजे. नाव पण एका चे असले पाहिजे. इथे तर अनेक नांवे आहेत.परदेशी पण इथे मंदिर पाहण्या साठी येतात. बिचाऱ्याना माहित नाही कि, प्राचीन भारत कसा होता? पाच हजार वर्षापूर्वीची तर कोणती जुनी वस्तू असत नाही. ते तर समजतात कि, लाखो वर्षा पूर्वी ची जुनी वस्तू मिळाली. बाबा समजावतात, ही मंदिरा मध्ये चित्र इत्यादी जी बनवली आहेत, त्यांना अडीच हजार वर्षे झाली आहेत. पहिल्या प्रथम शिवाची पूजा होते. ती अव्याभिचारी पूजा आहे. तसे अव्यभिचारी ज्ञान पण म्हटले जाते. अगोदर अव्यभिचारी पूजा, मग व्याभिचारी पूजा होते. आता तर पाहा पाणी, मातीची पूजा करत आहेत.

आता बेहदचे बाबा म्हणतात, तुम्ही किती धन भक्ती मार्गां मध्ये गमावले आहे. किती अथाह शास्त्र, अथाह चित्रे आहेत. गीता किती अनेकानेक आहेत. या सर्वांवर खर्च करून करून पाहा, तुम्ही काय झाले आहात. काल तुम्हाला डबल सिरताज बनवले होते, मग तुम्ही किती कंगाल झाले आहात. काल ची तर गोष्ट आहे ना. तुम्ही पण समजता, बरोबर आम्ही 84 चे चक्र मारले आहे. आता आम्ही परत असे बनत आहोत.बाबा कडून वारसा घेत आहोत. बाबा वारंवार ताकीद देतात कि, गीते मध्ये पण मनमनाभव अक्षर आहे. कांही कांही अक्षरे बरोबर आहेत. "प्राय" म्हटले जाते ना, म्हणजे देवी देवता धर्म नाही, बाकी चित्रे आहेत. तुमचे स्मृति स्थळ पाहा कसे चांगले बनवले आहे. तुम्ही समजता, आता आम्ही परत स्थापना करत आहोत. मग भक्ती मार्गामध्ये आमची च तंतोतंत स्मृतिस्थळे बनतील. भूकंप इ. होतात, त्यामध्ये सर्व नाहीसे होऊन जाते. मग तिथे सर्व तुम्ही नवीन बनवता. कौशल्य तर तेथे राहते ना. हिरे कापण्याची पण कला आहे. इथे पण हिरा कापतात, मग बनवतात. हिरे कापणारे पण फार तरबेज असतात. ते मग तिथे जातील. तिथे या सर्व कला घेऊन जातील. तुम्ही जाणता तिथे किती सुख असते. या लक्ष्मी नारायणा चे राज्य होते ना. नाव च स्वर्ग आहे. 100% धनवान.आता तर दिवाळखोर आहेत. भारता मध्ये जवाहराता ची फार फॅशन आहे, जे परंपरे पासून चालत आले आहे. तर तुम्हा मुलांना किती खुशी झाली पाहिजे. तुम्ही जाणता ही दुनिया बदलत आहे. आता स्वर्ग बनत आहे, त्यासाठी आम्हाला पवित्र जरूर बनायचे आहे. दैवीगुण पण धारण करायचे आहेत, त्यामुळे बाबा म्हणतात,चार्ट जरूर लिहा. आम्ही आत्म्याने कोणते आसुरी कृत्य तर केले नाही? स्वतःला आत्मा पक्के समजा. या शरीराद्वारे कोणते विकर्म तर केले नाही? जर केले तर रजिस्टर खराब होऊन जाईल. ही 21 जन्माची लॉटरी आहे. ही पण रेस आहे. घोड्याची रेस होत आहे ना. याला म्हणतात राजस्व अश्वमेघ . .स्वराज्या साठी अश्व म्हणजे तुम्हा आत्मांना रेस करायची आहे. आता परत घरी जायचे आहे. त्याला गोड शांतीधाम म्हटले जाते. हे अक्षर तुम्ही आता ऐकत आहात. आता बाबा म्हणतात, मुलांनो, फार मेहनत करा. राजाई मिळत आहे,ही थोडीच कमी गोष्ट आहे. मी आत्मा आहे, आम्ही एवढे जन्म घेतले. आता बाबा म्हणतात, तुमचे 84 जन्म पूर्ण झाले आहेत. आता परत पहिल्या नंबर पासून सुरुवात करायची आहे. नवीन महला मध्ये जरूर मुलेच बसतील. जुन्या मध्ये तर बसणार नाहीत. असे तर नाही, स्वतः जुन्या मध्ये बसतील आणि नवीन मध्ये भाडेकरू ना बसवतील. तुम्ही किती मेहनत करता, नवीन दुनिये चे मालक बनण्याची. नवीन घर बनवतात, तर मनात येते, जुने सोडून नवीन मध्ये बसावे. बाबा मुलांसाठी नवीन घर तेंव्हा बनवितात,जेंव्हा पहिले घर जुने होते. तिथे भाड्याने देण्याची तर गोष्टच नसते. जसे ते लोक चंद्रावर प्लॉट घेण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही मग स्वर्गा मध्ये प्लॉट घेत आहात. जेवढे जेवढे ज्ञान आणि योगा मध्ये राहाल, तेवढे पवित्र बनाल. हा राजयोग आहे, किती मोठी राजाई मिळत आहे. बाकी ते चंद्र इत्यादी ठिकाणी प्लॉट शोधत आहेत, ते सर्व व्यर्थ आहे. या वस्तू ज्या सुख देणाऱ्या आहेत, त्या मग विनाश करण्यासाठी दू:ख देणाऱ्या बनतात. पुढे चालून लष्कर इत्यादीं सर्व कमी होईल. बॉम्ब द्वारेच फटाफट काम होत राहील. हे नाटक बनलेले आहे, वेळेवर अचानक विनाश होईल, मग शिपाई इत्यादी पण मरून जातील. पाहण्यात मजा आहे. तुम्ही आता फरिश्ते बनत आहात. तुम्ही जाणता आमच्यासाठी विनाश होत आहे. नाटका मध्ये तशी नोंद आहे, जुनी दुनिया नाहीशी होत आहे. जे जसे कर्म करतात, तसे तर भोगावे लागते ना.आता समजा संन्याशी चांगले आहेत, तरी पण जन्म गृहस्थी जवळ घेतात. श्रेष्ठ जन्म तर तुम्हाला नवीन दुनिये मध्ये मिळतो.तरी पण संस्कारा नुसार जाऊन तसे बनाल. तुम्ही आता संस्कार घेऊन जात आहात, नवीन दुनियेसाठी. भारता मध्ये जरूर जन्म घेतील.जे चांगले धार्मिक वृतीचे असतात, त्यांच्या जवळ जन्म घेतील, कारण तुम्ही कर्म पण तसेच करत आहात. जसे जसे संस्कार असतात, त्या नुसार जन्म होतो. तुम्ही फार उंच कुळा मध्ये जाऊन जन्म घ्याल. तुमच्या सारखे कर्म करणारे तर कोणी नाहीत. जसे शिक्षण, जशी सेवा, तसा जन्म मिळतो.मरणार तर अनेक आहेत. अगोदर स्वागत करणारे पण जातील. बाबा समजावत आहेत, आता ही दुनिया बदलत आहे. बाबाने तर साक्षात्कार केला आहे. बाबा स्वतःचे उदाहरण सांगत आहेत. पाहिले, 21 जन्मासाठी राजाई मिळत आहे, त्या समोर हे दहा वीस लाख काय आहेत? अल्फ ला बादशाही मिळाली, आणि बे ला मिळाली गदाई. भागीदारा ला सांगितले, जे पाहिजे ते घे. कांही पण त्रास झाला नाही. मुलांना पण समजावले जाते, बाबा कडून तुम्ही काय घेत आहात? स्वर्गाची बादशाही. जेवढे होईल तेवढे सेंटर उघडत जावा. अनेकांचे कल्याण करा. तुमची 21 जन्माची कमाई होत आहे. इथे तर लखपती, करोडपती फार आहेत. ते सर्व भिकारी आहेत. तुमच्या जवळ अनेक जण येतील. प्रदर्शनी मध्ये किती येतात, असे समजू नका, प्रजा बनत नाही. प्रजा फार बनत आहे. चांगले चांगले तर फार म्हणतात, मग म्हणतात आम्हाला वेळ नाही. थोडे पण ऐकले तर प्रजे मध्ये येतील. अविनाशी ज्ञानाचा विनाश होत नाही. बाबा चा परिचय देणे, कांही कमी गोष्ट थोडीच आहे. कोणा कोणा मध्ये तर रोमांच उभे राहतात. जर उंच पद प्राप्त करणारा असेल, तर पुरुषार्थ करू लागेल. बाबा कोणा कडून धन इत्यादी तर घेत नाहीत. मुलांच्या थेंबा थेंबाने तळे साचत आहे. कोणी कोणी एक रुपया पण पाठवतात. बाबा एक ईट लावा. सुदामा च्या मुठभर तांदळाचे गायन आहे ना. बाबा म्हणतात तुमचे तर हे हिरे जवाहरात आहेत. हिऱ्या सारखा जन्म तुम्हा सर्वांचा बनत आहे. तुम्ही भविष्या साठी बनत आहात. तुम्ही जाणता कि, इथे या डोळ्यांनी जे कांही दिसत आहे, ती जुनी दुनिया आहे. ही दुनिया बदलत आहे. आता तुम्ही अमरपुरी चे मालक बनत आहात. मोहजीत जरूर बनायचे आहे. तुम्ही म्हणत आले आहात कि, बाबा तुम्ही आले, तर आम्ही समर्पित होऊ,सौदा तर चांगला आहे ना. मनुष्य थोडेच जाणतात कि, सौदागर, रत्नागर, जादूगर नाव कां पडले आहे. रत्नागर आहेत ना, अविनाशी ज्ञान रत्न, एक एक अमूल्य महावाक्य आहेत. या वर रूप बसंत ची कथा आहे ना. तुम्ही रूप पण आहात, बसंत पण आहात. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आता या शरीराद्वारे कोणते पण विकर्म करायचे नाही.असे कोणते आसुरी कर्म होऊ नये, ज्यामुळे रजिस्टर खराब होईल.

(२) एका बाबाच्या आठवणीच्या नशेमध्ये राहायचे आहे. पावन बनण्याचा मुळ पुरुषार्थ जरूर करायचा आहे. कवडी च्या मागे आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. श्रीमताने जीवन श्रेष्ठ बनवायचे आहे.

वरदान:-
स्वतःला नम्र सोन्या सारखे बनवून, प्रत्येक कार्या मध्ये सफल होणारे, स्व परिवर्तक भव.

जे स्वतःला प्रत्येक परिस्थितीमध्ये परिवर्तन करून, स्व परिवर्तक बनतात, ते नेहमी सफल होतात. त्यामुळे स्वतःला बदलण्याचे लक्ष्य ठेवा. दुसरा बदलला, तर मी बदलेन असे नाही, दुसरा बदलो अथवा न बदलो, मला बदलायचे आहे. हे अर्जुन, मला बनायचे आहे. नेहमी परिवर्तन करण्यामध्ये अगोदर मी. यामध्ये जो अगोदर मी म्हणतो, तो पहिला नंबर घेतो. कारण स्वतःला नम्र बनवणाराच खऱ्याअर्थाने सोन्या सारखा आहे,त्याचीच किंमत आहे.

बोधवाक्य:-
आपल्या श्रेष्ठ जीवनाच्या प्रत्यक्ष प्रमाणा व्दारे बाबांना प्रत्यक्ष करा.