23-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही देहीअभिमानी बना, तर सर्व आजार नाहीसे होतील, आणि तुम्ही दुहेरी मुकुटधारी विश्वाचे मालक बनाल."

प्रश्न:-
बाबा समोर कोणत्या मुलांना बसविले पाहिजे ?

उत्तर:-
ज्यांना ज्ञानाचे नृत्य करता येते, ज्ञानाचे नृत्य करणारी मुले, जेंव्हा बाबा समोर येतात, तर बाबाची मुरली पण तशीच चालते. जर कोणी समोर बसून इकडे तिकडे पाहतात, तर बाबा समजतात, हा मुलगा काहीच समजलेला नाही. बाबा ब्राह्मणी ला पण म्हणतात, तुम्हीं हे कोणाला आणले आहे. जे बाबा समोर बसून जांभळ्या देतात. मुलांना तर असे बाबा मिळाले आहेत, त्यामुळे खुशीमध्ये नृत्य केले पाहिजे.

गीत:-
दूर देशाचे राहणारे. . . .

ओम शांती।
गोड गोड मुलांनी गीत ऐकले. आत्मिक मुले समजतात कि, आत्मिक बाबा ज्यांची आम्ही आठवण करत आलो आहोत, दु:खहर्ता सुखकर्ता वा तुम्हीच मात पिता . . परत येऊन, आम्हाला भरपूर सुख द्या, आम्ही दुःखी आहोत, ही सारी दुनिया दु:खी आहे, कारण हे कलियुग, जुनी दुनिया आहे. जुनी दुनिया किंवा जुन्या घरांमध्ये एवढे सुख असत नाही, जेवढे नवीन दुनिया, नवीन घरामध्ये असते. तुम्ही मुले समजता कि, आम्ही विश्वाचे मालक, आदि सनातन देवी देवता धर्माचे होतो, आम्ही 84 जन्म घेतले आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हीं तुमच्या जन्माला ओळखत नव्हता कि, तुम्ही किती जन्म अभिनय केला आहे. मनुष्य समजतात 84 लाख पुनर्जन्म आहेत. एक एक पुनर्जन्म, किती वर्षाचा असतो. 84 लाखाच्या हिशोबाने तर सृष्टीचे चक्र फार मोठे होईल. तुम्ही मुले जाणता, आम्हा आत्म्यांचा पिता आम्हाला शिकवण्या साठी आले आहेत. आम्ही पण दूर देशातील राहणारे आहोत. आम्ही कांही येथील राहणारे नाहीत. इथे आम्ही अभिनय करण्यासाठी आले आहोत. बाबाची पण आम्ही परमधाम मध्ये आठवण करतो. आता या दुसऱ्याच्या देशांमध्ये आले आहेत. शिवाला बाबा म्हणतात. रावणाला बाबा म्हणत नाहीत. भगवाना ला बाबा म्हणतात. बाबा ची महिमा वेगळी आहे, पाच विकारांची कोणी महिमा करतात का! देह अभिमान तर फार मोठा आजार आहे. आम्ही देहीअभिमानी बनलो, तर कोणता आजार राहणार नाही, आणि आम्ही विश्वाचे मालक बनू. या गोष्टी तुमच्या बुद्धी मध्ये आहेत. तुम्ही जाणता, शिवबाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. जे पण एवढे सत्संग इ. आहेत, कुठे पण असे समजत नाहीत कि, आम्हाला बाबा येऊन राजयोग शिकवतील. राजाई साठी शिकवतात. राजा बनविणारे तर राजाच पाहिजे ना. सर्जन शिकून आपल्या सारखे सर्जन बनवतात. बरं, दुहेरी मुकुटधारी बनविणारे कुठून येतील,जे आम्हाला दुहेरी मुकुटधारी बनवतील, त्यामुळे मनुष्य दुहेरी मुकुटधारी कृष्णाला समजतात. परंतु कृष्ण कसे शिकवतील! जरूर बाबा संगमवर आले असतील, येऊन राजाई स्थापन केली असेल. बाबा कसे येतात, हे तुमच्या शिवाय इतर कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. दूरदेशातून बाबा येऊन आम्हाला शिकवत आहेत, राजयोग शिकवत आहेत. बाबा म्हणतात, मला काही लाईटचा किंवा रत्न जडित ताज नाही. ते कधीच राज्य प्राप्त करत नाहीत. डबल सिरताज बनत नाहीत, इतरांना बनवतात. बाबा म्हणतात, मी जर राजा बनलो, तर मग रंक पण बनावे लागेल. भारतवासी राव होते, आता रंक आहेत. तुम्ही पण दुहेरी मुकुटधारी बनत आहात, तर तुम्हाला बनवणारे पण दुहेरी मुकुटधारी असले पाहिजेत, त्यामुळे तुमचा योग पण लागेल. जो जसा असतो, तसे आपल्या सारखे बनवतो. संन्याशी प्रयत्न करून, संन्याशी बनवतात. तुम्ही गृहस्थी, ते संन्यासी तर मग तुम्ही शिष्य तर बनू शकत नाही. म्हणतात फलाना शिवनंदाचा शिष्य आहे. परंतु ते संन्यासी डोक्याचे चमन करणारे आहेत, तुम्ही तर अनुकरण करत नाही. तर तुम्ही मग शिष्य कां म्हणवता. शिष्य तर ते झटक्यात कपडे काढून, कफनी घालतात. तुम्ही तर गृहस्थी विकार इ.मध्ये राहता, मग शिवानंदाचे शिष्य कसे म्हणून घेता. गुरूचे तर काम सदगती करण्याचे आहे. गुरु असे तर म्हणत नाहीत, अमक्याची ची आठवण करा. मग तर ते स्वतः गुरु नाहीत. मुक्तिधाम मध्ये जाण्यासाठी पण युक्ती पाहिजे.

तुम्हा मुलांना समजावले जाते, तुमचे घर मुक्तिधाम किंवा निराकारी दुनिया आहे. आत्म्याला निराकार आत्मा म्हटले जाते. शरीर पाच तत्वाचे बनलेले आहे. आत्मे कोठून येतात? परमधाम निराकारी दुनिये मधून. तेथे अनेक आत्मे राहतात. त्याला गोड शांतीचे घर म्हणतात. तिथे आत्मे सुख दुःखा पासून दूर आहेत. हे चांगल्या रीतीने पक्के केले पाहिजे. आम्ही गोड शांतीच्या घरातील राहणारे आहोत. येथे ही नाटकशाळा आहे, जिथे आम्ही अभिनय करण्यासाठी आले आहोत. या नाटकशाळे मध्ये सूर्य, चंद्र, तारे इत्यादी बत्या आहेत. कोणी मोजमाप करू शकत नाही की, ही नाटक शाळा किती मैल दूर आहे. विमाना मधून वर जातात, परंतु त्यामध्ये पेट्रोल इत्यादी एवढे टाकू शकत नाहीत, जे वर जाऊन, परत माघारी येऊ शकतील. एवढे दूर जाऊ शकत नाहीत. ते समजतात एवढे मैल दूर आहे, माघारी आले नाहीत, तर खाली पडतील. समुद्राचा व आकाश तत्वाचा अंत प्राप्त करू शकत नाहीत. आता बाबा तुम्हाला त्यांचा अंत देत आहेत. आत्मा या आकाश तत्वा पासून दूर निघून जाते. किती मोठे रॉकेट आहे. तुम्ही आत्मा जेंव्हा पवित्र बनाल, तर मग रॉकेट सारखे तुम्ही उडू शकाल. किती लहान रॉकेट आहे. चंद्र सूर्या पासून पार दूर मूलवतन मध्ये निघून जाल. सूर्य आणि चंद्राचा अंत प्राप्त करण्यासाठी फार प्रयत्न करतात. लांबचे तारे इत्यादी किती लहान दिसून येतात. ते तर फार मोठे आहेत. जसे तुम्ही पतंग उडवता, तर वरून ते किती लहान लहान दिसतात. बाबा म्हणतात, तुमची आत्मा तर सर्वात तीव्र आहे. सेकंदा मध्ये एका शरीरा मधून निघून, दुसऱ्या गर्भामध्ये जाऊन प्रवेश करते. कोणाच्या कर्माचा हिसाब किताब लंडन मध्ये असेल, तर सेकंदा मध्ये लंडन मध्ये जाऊन जन्म घेईल. सेकंदा मध्ये जीवनमुक्तीचे पण गायन आहे ना. मुलगा गर्भातून निघाला आणि मालक बनला, वारिस तर होतोच. तुम्ही मुलांनी पण बाबाला ओळखले, म्हणजे विश्वाचे मालक बनले. बेहदचे बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत. शाळेमध्ये बॅरिस्टरी शिकतात, तर बॅरिस्टर बनतात. इथे तुम्ही डबल सिरताज(दुहेरी मुकुटधारी) बनण्यासाठी शिकत आहात. जर पास झालात तर डबल सिरताज जरूर बनाल. तरी पण स्वर्गामध्ये जरूर येतील. तुम्ही जाणता बाबा तर नेहमी तेथेच राहतात. ओ गॉड फादर म्हणतात, त्यावेळी दृष्टी जरूर वर जाते. गॉड फादर आहेत, तर जरूर काही तरी त्यांचा अभिनय असेल ना. आता अभिनय करत आहेत. त्यांना बागवान पण म्हणतात. काट्यांना येऊन फुल बनवतात. तर तुम्हां मुलांना खुशी झाली पाहिजे. बाबा या परक्या देशांमध्ये आले आहेत.दूर देशातील राहणारे या परदेशात आले आहेत. दूर देशातील राहणारे तर बाबा आहेत. आणि आत्मे पण येथील राहणारे आहेत. इथे मग अभिनय करण्यासाठी येतात. परक्या देशाचा अर्थ कोणी समजत नाहीत. मनुष्य तर भक्ती मार्गामध्ये जे ऐकतात, ते सत सत म्हणतात. तुम्हा मुलांना बाबा किती चांगल्या रीतीने समजावत आहेत. आत्म अपवित्र झाल्यामुळे उडू शकत नाही. पवित्र बनल्या शिवाय परत जाऊ शकणार नाही. पतित-पावन एकाच बाबाला म्हटले जाते. त्यांना संगमयुगावर यावे लागते.तुम्हाला किती खुशी झाली पाहिजे. बाबा तुम्हाला डबल सिरताज बनवत आहेत, यापेक्षा उंच दर्जा कोणाचा असत नाही. बाबा म्हणतात, मी डबल सिरताज बनत नाही. मी एकाच वेळी येतो. पराया देश, पराये शरीरा मध्ये. हे दादा पण म्हणतात, मी थोडाच शिव आहे. मला तर लखीराज म्हणत होते, मग समर्पित झालो, तेव्हा बाबांनी, ब्रह्मा नाव ठेवले. यांच्या मध्ये प्रवेश करून यांना सांगितले कि, तुम्ही तुमच्या जन्माला ओळखत नाहीत. 84 चा पण हिशेब झाला पाहिजे ना. ते लोक तर 84 लाख म्हणतात, जे बिल्कुल अशक्य आहे. 84 लाख जन्माचे रहस्य समजण्यासाठी तर शेकडो वर्ष लागतील. आठवणीत पण राहणार नाहीत.84 लाख योनी मध्ये तर पशु पक्षी इत्यादी सर्व येतात. मनुष्यांचा जन्म दुर्लभ म्हटले जाते. जनावरे थोडेच ज्ञान समजू शकतील. तुम्हाला बाबा येऊन ज्ञान शिकवत आहेत. स्वतः म्हणतात,मी रावण राज्यांमध्ये आलो आहे. मायेने तुम्हाला किती पत्थरबुद्धी बनवले आहे. आता मग बाबा तुम्हाला पारस बुद्धी बनवत आहेत. उतरती कलेमुळे तुम्ही पत्थरबुद्धी बनले आहात. आता मग बाबा चढती कले मध्ये घेऊन जात आहेत, नंबरवार तर आहेत ना. प्रत्येकाला स्वतःच्या पुरुषार्थाने समजायचे आहे. मुख्य गोष्ट आठवणीची आहे. रात्रीला झोपताना पण हा विचार करा. बाबा आम्ही तुमच्या आठवणी मध्ये झोपतो. म्हणजे आम्ही या शरीराला सोडत आहोत. तुमच्या जवळ येत आहोत. अशी बाबाची आठवण करत करत झोपा, तर मग पाहा किती मजा येत आहे. होऊ शकते कि, साक्षात्कार पण होईल. परंतु या साक्षात्कार इत्यादी मध्ये खुश व्हायचे नाही. बाबा आम्ही तर तुमचीच आठवण करतो. तुमच्या जवळ येऊ इच्छित आहोत. बाबांची तुम्ही आठवण करत करत, फार आरामात निघून जाल. होऊ शकते, सूक्ष्मवतन मध्ये पण निघून जाल. मूलवतन मध्ये तर जाऊ शकत नाहीत. आता परत जाण्याची वेळ कुठे आली आहे. होय, साक्षात्कार झाला बिंदूचा, मग छोट्या-छोट्या आत्म्यांचे झाड दिसून येईल. तसे तुम्हाला वैकुंठाचा साक्षात्कार होत आहे ना. असे नाही साक्षात्कार झाल्यामुळे तुम्ही वैकुंठाला निघून जाल. नाही, त्यासाठी तर मग मेहनत करावी लागेल. तुम्हाला समजावले जाते कि, तुम्ही पहिल्या प्रथम गोड घरी जाल. सर्व आत्मे अभिनय करण्या पासून मुक्त होतील. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही, तोपर्यंत जाऊ शकत नाही. बाकी साक्षात्कारा पासून कांही पण मिळत नाही.मीराला साक्षात्कार झाला, वैकुंठा मध्ये थोडीच गेली. वैकुंठ तर सतयुगा मध्ये असतो. आता तुम्ही तयारी करत आहात,वैकुंठा चे मालक बनण्याची. बाबा ध्यान इत्यादी मध्ये एवढे जाऊ देत नाहीत, कारण तुम्हाला तर शिकायचे आहे. बाबा येऊन शिकवतात, सर्वांची सदगती करतात. विनाश तर समोर उभा आहे. बाकी असुर आणि देवतांचे युद्ध तर होत नाही.ते आपसा मध्ये युद्ध करतात तुमच्यासाठी, कारण तुम्हाला नवीन दुनिया पाहिजे. बाकी तुमचे युद्ध माये बरोबर आहे. तुम्ही फार प्रसिद्ध योध्दे आहात. परंतु कोणी जाणत नाही कि, देवींचे एवढे गायन कां आहे. आता तुम्ही भारताला योगबळाने स्वर्ग बनवत आहात. तुम्हाला आता बाबा मिळाले आहेत. तुम्हाला सांगत आहेत, ज्ञानामुळे नवीन दुनिया जिंदाबाद होत आहे. हे लक्ष्मी नारायण नवीन दूनिया चे मालक होते ना. आता जुनी आहे. जुन्या दुनिया चा विनाश पुर्वी पण मुसळा द्वारे झाला होता. महाभारत युद्ध लागले होते. त्यावेळी बाबा राजयोग शिकवत होते, आता प्रत्यक्षा मध्ये बाबा राजयोग शिकवत आहेत ना.बाबा तुम्हाला खरे सांगत आहेत. खरे बाबा आले आहेत, त्यामुळे नेहमी तुम्ही खुशी मध्ये नाचत आहात. हे ज्ञानाचा नृत्य आहे, तर जे ज्ञान नृत्याचे शौकिन आहेत, त्यांनाच समोर बसवले पाहिजे. जे समजणारे नाहीत त्यांना जांभळी येईल. असे समजून येते कि, हे कांही पण समजत नाहीत. ज्ञानाला थोडे पण समजले नाहीत, तर इकडे तिकडे पाहत राहतात. बाबा पण ब्राह्मणीला म्हणतात, तुम्ही कोणाला आणले आहे. जे शिकत आहेत आणि शिकवत आहेत, त्यांना समोर बसवले पाहिजे, त्यांना खुशी होत राहील. आम्हाला पण नृत्य करायचे आहे, हे ज्ञानाचे नृत्य आहे. कृष्णाने तर ना ज्ञान सांगितले,ना नृत्य केले. मुरली तरी ही ज्ञानाची आहे ना. तर बाबांनी सांगितले आहे, रात्रीला झोपताना बाबाची आठवण करा, चक्राला बुद्धीमध्ये फिरवत राहा, बाबा आम्ही आता या शरीराला सोडून, तुमच्या जवळ येत आहोत. अशी आठवण करत करत झोपा, मग पाहा काय होत आहे. पूर्वी कबरीस्तान बनवत होते, मग कोणी शांती मध्ये जात होते, कोणी रास करत होते. जे बाबाला ओळखतच नाहीत, तर ते आठवण कसे करू शकतील. मनुष्यमात्र बाबाला ओळखतच नाहीत, तर बाबाची आठवण कशी करतील. त्यामुळे बाबा म्हणतात, मी जो आहे, जसा आहे, मला कोणी पण ओळखत नाही.

आता तुम्हाला किती समज मिळाली आहे. तुम्हीं गुप्त योध्दे आहात. योद्धा नाव ऐकून, देवीना मग तलवार, बाण इत्यादी दिले आहे. तुम्ही योगबळाचे योध्दे आहात. योग बळाने विश्वाचे मालक बनता. बाहुबळाने जरी कोणी कितीही प्रयत्न केला, तरी विजय प्राप्त करू शकणार नाहीत. भारताचा योग प्रसिद्ध आहे. हे बाबा येऊन शिकवत आहेत. हे पण कोणाला माहित नाही. उठता, बसता बाबाची आठवण करत राहा.कांही म्हणतात योग लागत नाही. योग अक्षर विसरून जावा. मुले तर बाबाची आठवण करतात ना. शिव बाबा म्हणतात, माझी एकट्याची आठवण करा. मीच सर्वशक्तिमान आहे, माझी आठवण केल्याने, तुम्ही सतोप्रधान बनाल. जेव्हा सतोप्रधान बनाल, तेंव्हा मग आत्म्यांची वरात निघेल‌. जशी मधमाशांची वरात असते ना. ही शिवबाबा ची वरात आहे. शिवबाबा च्या मागे सर्व आत्मे डासा सारखे निघून जातील. बाकी सर्वांचे शरीर नष्ट होईल. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) रात्री झोपण्यापूर्वी बाबा बरोबर गोड गोड गोष्टी करा. बाबा आम्ही या शरीराला सोडून, तुमच्या जवळ येत आहे. अशी आठवण करून झोपायचे आहे. आठवणच मुख्य आहे. आठवणीनेच पारसबुद्धि बनाल.

(२) पाच विकारांच्या आजारापासून वाचण्यासाठी, आत्म अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. अथाह खुषी मध्ये राहायचे आहे. ज्ञानाचे नृत्य करायचे आहे .क्लास मध्ये सुस्ती पसरावयाची नाही.

वरदान:-
त्रिकालदर्शी च्या स्थिती द्वारे, व्यर्थचे खाते नाहीसे करणारे, नेहमी सफलता मूर्त भव.

त्रिकालदर्शीपणा च्या स्थिती मध्ये, स्थित होणे म्हणजे प्रत्येक संकल्प, बोल, व कर्म करण्यापूर्वी चेक करा कि, हे व्यर्थ आहे का समर्थ आहे. व्यर्थ एक सेकंदांमध्ये पद्मामाचे नुकसान करते. समर्थ एका सेकंदा मध्ये पद्माची कमाई करते.सेकंदाचे व्यर्थ पण, कमाई मध्ये फार तोटा करत आहे. ज्यामुळे केलेली कमाई, पण नाहीशी होते. त्यामुळे एक काल दर्शी होऊन कर्म करण्यापेक्षा, त्रिकालदर्शी स्थिती मध्ये स्थित होऊन कर्म करा, तर व्यर्थ समाप्त होऊन जाईल, आणि नेहमी सफलता मूर्त बनाल.

बोधवाक्य:-
मान, शान आणि साधनांचा त्याग च महान त्याग आहे.