02-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जुनी दुनिया बदलून आता नवीन बनत आहे, तुम्हाला
आत्ता पुरुषार्थ करून उत्तम देव पद मिळवायचे आहे"
प्रश्न:-
सेवाधारी
मुलांच्या बुद्धी मध्ये कोणती गोष्ट नेहमी आठवणीत राहते?
उत्तर:-
त्यांना आठवण राहते की, धन दान केल्यानंतर कमी पडत नाही, म्हणून ते रात्रंदिवस
झोपेचा त्याग करून पण ज्ञानदान करत राहतात, ते थकत नाहीत. परंतु जर स्वतःमध्येच
कोणते अवगुण असतील, तर सेवा करण्याचा उमंग उत्साह येत नाही.
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलां प्रति बाबा सन्मुख समजावत आहेत. मुलं जाणतात परमपिता रोज-रोज
समजवतात. जसे रोज रोज शिक्षक शिकवत राहतात. बाबा फक्त ज्ञान देतात, पालना करत
राहतात कारण की, त्याच्या घरांमध्ये मुलंच राहतात. मात-पित्याच्या सोबत राहतात ना,
ही तर आश्चर्यकारक गोष्ट आहे. आत्मिक पित्याजवळ तुम्ही राहतात. एक तर आत्मिक
पित्याजवळ मूळवतन मध्ये राहतात. परत कल्पामध्ये एकाच वेळी बाबा मुलांना, वारसा
देण्यासाठी किंवा पावन बनवण्यासाठी किंवा सुख शांती देण्यासाठी येतात. तर जरूर खाली
येऊन राहत असतील ना, यामध्येच मनुष्य संभ्रमित झाले आहेत. असे गायन पण आहे, साधारण
तना मध्ये प्रवेश करतात. आता साधारण तन कोठून, उडून तर येऊ शकत नाही. जर मनुष्य
तनामध्येच येतात. ते पण सांगतात, मी या तना मध्ये प्रवेश करतो. तुम्ही मुलं पण आत्ता
समजतात, बाबा आम्हाला स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आले आहेत. जरूर आम्ही लायक नाहीत,
पतित बनलो आहोत. सर्वजण म्हणतात पण, हे पतित पावन या, येऊन आम्हा पतितांना पावन बनवा.
बाबा म्हणतात मला कल्प-कल्प पतितांना पावन बनवण्याची नोकरी मिळाली आहे. हे मुलांना
आत्ता या पतित दुनियेला पावन बनवायचे आहे. जुन्या दुनियाला पतित, नवीन दुनियेला
पावन म्हणणार, म्हणजेच जुन्या दुनियेला नवीन बनवण्यासाठी बाबा आले आहेत. कलियुगाला
तर कोणीही, नवीन दुनिया म्हणू शकणार नाही. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. कलियुग
जुनी दुनिया आहे. बाबा पण जरूर जुन्या आणि नवीन दुनियेच्या संगमावरतीच येतील. ज्या
वेळेस तुम्ही हे ज्ञान समजावून सांगतात तर स्पष्ट करा, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे.
स्वयम् शिवपिता आलेले आहेत. सर्व दुनिया मध्ये असे कोणी मनुष्य नसतील, ज्यांना
माहिती असेल की, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जरूर तुम्ही संगम युगामध्ये आहात,
तेव्हा तर समजतात. मुख्य गोष्ट या संगमची आहे, तर हे ज्ञानाचे मुद्दे पण खूप आवश्यक
आहेत. ज्या ज्ञानगोष्टी कोणीही जाणत नाहीत, त्या समजावून सांगाव्या लागतील, त्यामुळे
बाबा म्हणतात, हे जरूर लिहायचे आहे की आता पुरुषोत्तम संगम आहे. नवीन युग म्हणजे
सतयुगाचे चित्र पण आहे. मनुष्य कसे समजतील, की हे लक्ष्मी -नारायण सतयुगी नवीन
दुनियाचे मालक आहेत. त्यांच्यावरती जरूर पुरुषोत्तम संगमयुग लिहायला पाहिजे. हे
जरूर लिहायचे आहे, कारण हीच मुख्य गोष्ट आहे. मनुष्य समजतात कलियुगामध्ये आणखी खूप
वर्ष शिल्लक आहेत, खूपच घोर अंधार आहे. तर समजावून सांगावे लागेल, नवीन दुनियेचे
मालक हे लक्ष्मी-नारायण आहेत. हे पूर्ण लक्षणं आहेत. तुम्ही म्हणतात या राज्याची
स्थापना होत आहे. असे गीत पण आहे, नवयुग आले की आले, अज्ञान निद्रे मधून जागे व्हा.
हे तुम्ही जाणतात हे संगमयुग आहे, याला नवयुग म्हणणार नाही. संगमला संगमयुगच म्हटले
जाते. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जेव्हा जुनी दुनिया नष्ट होऊन, नवीन दुनिये ची
स्थापना होत आहे. मनुष्यापासून देवता बनत आहे, राजयोग शिकत आहेत. देवतां मध्ये पण
उत्तम लक्ष्मी-नारायणच आहेत. हे पण मनुष्य आहेत, त्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत,
म्हणून त्यांना देवी देवता म्हटले जाते. सर्वात उत्तम गुण पवित्रतेचा आहे. तेव्हा
तर मनुष्य देवतांच्या पुढे जाऊन डोके टेकवतात, पाया पडतात. हे सर्व मुद्दे
बुद्धीमध्ये त्यांच्याच धारण होईल, जे सेवा करत राहतात. असे म्हटले जाते धन
दिल्यानंतर नष्ट होत नाही. खूप ज्ञानाचे मुद्दे बाबा समजावत राहतात. बाबा ज्ञानाचे
मुद्दे स्पष्ट करत राहतात. ज्ञान तर खूप सहज आहे परंतु कोणामध्ये धारण चांगली होते,
कोणामध्ये होत नाही. ज्यांच्यामध्ये अवगुण आहेत, तर सेवाकेंद्र सांभाळू शकत नाहीत.
बाबा मुलांना समजवतात, प्रदर्शनीमध्ये स्पष्टपणे लिहायला पाहिजे, पुरुषोत्तम युग तर
मुख्य समजावयाला पाहिजे. या संगमयुगा वरतीच आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना
होत आहे. जेव्हा हा धर्म होता, तर दुसरा कोणता धर्म नव्हता. ही जी महाभारत लढाई आहे,
याची पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे. हे पण आत्ता निघाले आहेत. अगोदर थोडेच होते.
शंभर वर्षातच सर्व नष्ट होतात. संगमयुगाला कमीत कमी शंभर वर्ष तर पाहिजेत ना.
संपूर्ण नवीन दुनिया बनवायची आहे. नवीन दिल्ली बनवण्यामध्ये किती वर्ष लागले.
तुम्ही समजतात भारतामध्येच नवीन दुनिया होती, परत जुनी दुनिया नष्ट होईल, काही तरी
खुणा राहतात ना. प्रलय तर होत नाही ना. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये आहेत. आत्ता
संगमयुग आहे. नवीन दुनिया मध्ये जरूर हे देवी-देवता होते, परत हेच असतील. हे
राजयोगाचे शिक्षण आहे. जर कोणी विस्तारामध्ये समजावू शकत नाहीत, तर एक गोष्ट सांगा
परमपिता परमात्मा जे सर्वांचे पिता आहेत, त्यांची तर सर्रास आठवण करत राहतात. ते
सर्व मुलांना म्हणतात, तुम्ही पतित बनले आहात. त्यांना बोलवतात पण, हे पतित पावन
या. बरोबर आम्ही कलियुगामध्ये पतित आहोत आणि सतयुगा मध्ये पावन होतो. आता परमपिता
परमात्मा म्हणतात, देह सहित सर्व पतित संबंध सोडून माझीच आठवण करा, तर तुम्ही पावन
बनाल. हे गीताचे वाक्य आहेत, हे युग पण गीताचे आहे. गिता संगमयुगा मध्येच गायन केली
होती, तेव्हा विनाश पण झाला होता. बाबांनी राजयोग पण शिकवला होता. राजाई स्थापन झाली
होती, परत जरूर होईल. हे सर्व आत्मिक पिता समजावत आहेत ना. तुम्ही समजा या ब्रह्मा
तना मध्ये आले नाही, दुसऱ्या कोणत्याही तना मध्ये आले, हे ज्ञान तर शिव बाबांचे आहे
ना. आम्ही ब्रह्मांचे तर नाव घेत नाही ना. माझी आठवण करा आणि ८४ चक्राचे ज्ञान
बुद्धी मध्ये ठेवा. धारणा करतील तर चक्रवर्ती राजा बनतील. हा संदेश सर्व धर्मांसाठी
आहे, घरी तर सर्वांना जायचे आहे. आम्ही पण परमधाम घराचा रस्ता दाखवत आहोत. पादरी
इत्यादी कोणीही असतील, तुम्ही त्यांना शिवपित्याचा संदेश देऊ शकतात. तुम्हाला खुशीचा
पारा चढायला पाहिजे. परमपिता परमात्मा म्हणतात माझीच आठवण करा, तर तुमचे विकर्म
विनाश होतील. सर्वांना आठवण करून द्या. बाबा चा संदेश ऐकवणे ही, क्रमांक एकची सेवा
आहे. गीतेचे युग पण आत्ताच आहे. बाबा आले आहेत म्हणून ते चित्र सुरुवातीला ठेवायला
पाहिजे. आम्ही बाबांचा संदेश देऊ शकतो, तर तयार राहायला पाहिजे. मनामध्ये यायला
पाहिजे, आम्ही अंधाची काठी कशी बनू. हा संदेश कोणालाही देऊ शकता.
ब्रह्मकुमार-कुमारींचे नाव ऐकून घाबरतात. तुम्ही सांगा आम्ही परमपित्याचा संदेश देत
आहोत. परमपिता परमात्मा म्हणतात, माझीच आठवण करा बस. आम्ही कोणाची निंदा करत नाही.
बाबा म्हणतात माझीच आठवण करा. मीच उच्च ते उच्च पतित-पावन आहे. माझी आठवण केल्यामुळे,
तुमचे विकर्म विनाश होतील, याची नोंद घ्या. ही खुप कामाची गोष्ट आहे. काही जण
हातावरती पण लिहतात ना, हे पण लिहा. तुम्ही इतके सांगितले तरी दयाळू, कल्याणकारी
बनाल. आपल्याशी प्रतिज्ञा करायला पाहिजे. सेवा तर जरुर करायला पाहिजे, परत याची सवय
लागेल. येथे पण तुम्ही समजावू शकतात. चित्र देऊ शकतात, ही संदेश देण्याची गोष्ट आहे.
लाखो बनतील. घराघरांमध्ये संदेश द्यायचा आहे. पैसे कोणी देतील किंवा देणार नाहीत,
बाबा तर गरीब निवाज आहेत ना. आमचे कर्तव्य आहे, घराघरांमध्ये संदेश देणे. हे बापदादा,
यांच्याद्वारे वारसा मिळतो. ८४ जन्म हे घेतील. यांचा हा अंतिम जन्म आहे. आम्ही
ब्राह्मणच परत देवता बनू. ब्रह्मा पण ब्राह्मण आहेत. प्रजापिता ब्रह्मा एकटे तर
नसतील ना. जरूर ब्राह्मण वंशावळ पण असेल ना. ब्रह्मासो विष्णु देवता, ब्राह्मण उच्च
आहेत. तेच देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतात. कोणी जरूर निघतील, जे तुमच्या
ज्ञान गोष्टी समजतील. पुरुष पण सेवा करू शकतात. सकाळी उठून मनुष्य दुकान उघडतात, तर
ते म्हणतात सकाळचे साई. . . तुम्ही पण सकाळी सकाळी उठून बाबांचा संदेश ऐकवत राहा.
तुम्ही सांगा, तुमचा धंदा खूप चांगला होईल. तुम्ही साईची आठवण करा, तर २१ जन्माचा
वारसा मिळेल. अमृतवेळ म्हणजे पहाटेची वेळ फार चांगली आहे. आज-काल कारखान्यांमध्ये
माता पण काम करतात. हे बैज बनवणे पण खूप सहज आहे.
तुम्हा मुलांना रात्रंदिवस सेवा करत राहायला पाहिजे, झोपेचा पण त्याग करायला पाहिजे.
बाबांचा परिचय भेटल्यानंतर मनुष्य धनीचे बनतात. तुम्ही कोणालाही संदेश देऊ शकतात.
तुमचे ज्ञान तर खूप श्रेष्ठ आहे. तुम्ही सांगा आम्ही तर एकाची आठवण करतो. ख्रिस्ताची
आत्मा पण त्यांचा मुलगा होता. आत्मे तर सर्व त्यांची मुलं आहेत. तेच ईश्वरीय पिता
म्हणतात, दुसऱ्या कोणत्याही देहधारीची तुम्ही आठवण करू नका. तुम्ही स्वतःला आत्मा
समजून माझीच आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. माझ्या जवळ येऊ शकाल. मनुष्य घरी
जाण्यासाठी पुरुषार्थ करत राहतात परंतु जात कोणीही नाहीत. असे दिसून येते की, मुलं
आता खूप थंड पडले आहेत. इतके कष्ट घेत नाहीत, काही ना काही कारण सांगत राहतात,
यामध्ये खूप सहन करावे लागते. धर्म संस्थापकला खूप सहन करावे लागते. ख्रिस्ताला पण
म्हणतात, त्यांना क्राॅस वरती चढवले. तुमचे काम आहे सर्वांना संदेश देणे. त्यासाठी
बाबा युक्ती पण सांगत राहतात. सेवा करत नाहीत तर बाबा समजतात, धारण करत नाहीत. बाबा
मत देतात, कशाप्रकारे संदेश देऊ शकता. रेल्वेमध्ये पण तुम्ही हा संदेश देत रहा.
तुम्ही जाणतात आम्ही स्वर्गा मध्ये जात आहोत. कोणी शांतीधाम मध्ये पण जातात ना.
तुम्हीच रस्ता दाखवू शकतात. तुम्हा ब्राह्मणांनाच जायला पाहिजे. हे तर खूप आहेत.
ब्राह्मणाला कोठेतरी ठेवतीलत ना. ब्राह्मण देवता क्षत्रिय. प्रजापिता ब्रह्माची
संतान तर जरूर असतील ना. आदी मध्ये ब्राह्मण आहेत. तुम्ही ब्राह्मण उच्च ते उच्च
आहात. ते ब्राह्मण तर कुख वंशावळ आहेत. ब्राह्मण तर जरूर पाहिजेत ना. नाहीतर
प्रजापिता ब्रह्मा ची मुलं ब्राह्मण कोठे गेले. ब्राह्मणाला तुम्ही समजावून सांगा,
तर ते लगेच समजतील. तुम्ही सांगा, तुम्ही ब्राह्मण आहात, आम्ही पण स्वतःला ब्राह्मण
म्हणतो. आता तुम्हीच सांगा, तुमचा धर्म स्थापन करणारे कोण आहेत. ब्रह्माच्या शिवाय
कोणाचे नाव घेणार नाहीत. तुम्ही प्रयत्न करून पहा. ब्राह्मणांचे पण खूप मोठे मोठे
कुळ असतात. पुजारी ब्राह्मण तर खूप आहेत. अजमेर मध्ये अनेक मुलं जातात, कधी कोणी
समाचार दिला नाही की, आम्ही ब्राह्मणांना भेटलो त्यांना विचारले, तुमचा धर्म स्थापन
करणारे कोण आहेत? ब्राह्मण धर्म कोणी स्थापन केला? तुम्हाला तर माहित आहे, खरे
ब्राह्मण कोण आहेत. तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकतात. यात्रेसाठी भक्तच जातात. हे
लक्ष्मी नारायणचे चित्र तर खूप चांगले आहे. तुम्हाला माहित आहे, जगदंबा कोण आहे,
लक्ष्मी कोण आहे. अशा प्रकारे तुम्ही नोकरांना, भिलनी इत्यादींना समजावू शकतात.
तुमच्या शिवाय कोणी नाहीत, जे त्यांना ज्ञान ऐकवतील. खूप दयाळू बनायचे आहे. तुम्ही
सांगा, तुम्ही पण पावन बनून, पावन दुनिया मध्ये जाऊ शकता. स्वतःला आत्मा समजून
शिवबाबांची आठवण करा. अनेकांना रस्ता दाखवण्याची, आवड पाहिजे. जे स्वतः आठवण करत
असतील, तर ते दुसर्यांना पण आठवण देण्याचा पुरुषार्थ करतील. बाबा तर जाऊन सांगणार
नाहीत, हे तर तुम्हाला मुलांचे काम आहे. गरिबांचे पण कल्याण करायचे आहे, बिचारे खूप
सुखी होतील. थोडी जरी आठवण केली, तरीही प्रजा मध्ये येतील, हे पण चांगलेच आहे. हा
देवी देवता धर्म खुप सुख देणारा आहे. दिवसेंदिवस तुमचा आवाज होईल. सर्वांना हा
संदेश देत राहा, स्वतःला आत्मा समजून शिव पित्याची आठवण करा. तुम्ही गोड गोड मुलं
पद्मा पदम भाग्यशाली आहात. जेव्हा महिमा ऐकतात, तर समजतात, कोणत्या गोष्टीची काळजी
का करायला पाहिजे. हे गुप्त ज्ञान, गुप्त खुशी आहे. तुम्ही गुप्त योध्दे आहात.
तुम्हाला गुप्त योद्धे म्हणू शकतो, दुसऱ्या कोणाला गुप्त योध्दे म्हणू शकत नाहीत.
दिलवाडा मंदिर, तुमचे पूर्ण स्मृतिस्थळ आहे. मन जिंकण्याचा परिवार आहे ना, महावीर
महावीरनी आणि त्यांची मुलं, हे पुर्ण तीर्थ आहे. हे तर काशी पेक्षा उच्च तिर्थस्थळ
झाले, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)
घराघरांमध्ये जाऊन बाबाचा संदेश द्यायचा आहे. सेवा करण्याची प्रतिज्ञा करायची आहे.
सेवेसाठी कोणतेही कारण द्यायचे नाही.
(२) कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही. गुप्त खुशीमध्ये राहायचे आहे. कोणत्याही
देहधारीची आठवण करायची नाही. एक बाबांच्या आठवणी मध्येच राहायचे आहे.
वरदान:-
परिस्थिती
किंवा समस्यांना भाग्य समजून, स्वतःच्या निश्चयाचा पाया मजबूत करणारे अचल अडोल भव.
कोणतीही
परिस्थिती, समस्या आली, तरी तुम्ही उंच उडी मारून त्याला पार करा, कारण समस्या येणे
पण भाग्याची लक्षणं आहेत. हा निश्चय पायाला मजबूत करण्याचे साधन आहे. तुम्ही जेव्हा
एकदा अंगदच्या समान मजबूत बनाल, तर हे पेपर म्हणजे परीक्षा नमस्ते करेल. प्रथम
विक्राळ रूपामध्ये समस्या येतील आणि परत दासी बनतील. आव्हान करा की आम्ही महावीर
आहोत. जसे पाण्याच्या वरती रेषा ओढू शकत नाही, तसेच तुम्हा मास्टर सागराच्या वरती
कोणतीही परिस्थिती, समस्या आघात करू शकत नाही. स्व स्थितीमध्ये राहिल्यामुळे अचल
अडोल बनाल.
बोधवाक्य:-
ज्ञानसंपन्न
तेच आहेत, ज्याचे प्रत्येक कर्म श्रेष्ठ आणि सफल आहे.