04-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्हाला नेहमी आठवणीच्या फाशी वरती लटकायचे आहे, आठवणीने खऱ्या
सोन्यासारखे बनाल"
प्रश्न:-
कोणते बळ
विकारी दृष्टीला लगेच बदलू शकते?
उत्तर:-
ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राचे बळ जेव्हा आत्म्या मध्ये येते तर, विकारी दृष्टी
समाप्त होते. बाबांची श्रीमत आहे मुलांनो, तुम्ही सर्वजण आपसामध्ये भाऊ-भाऊ आहात,
भाऊ-बहीण आहात, तुमचे डोळे कधीच विकारी होऊ शकत नाहीत. तुम्ही नेहमी आठवणीचे मस्ती
मध्ये राहा. वाह! भाग्य वाह!आम्हाला भगवान स्वतः शिकवत आहेत. असे विचार करा, तर
नेहमी महारथी मध्ये राहाल.
ओम शांती।
गोड गोड मुलांप्रती आत्मिक पिता समजावत आहेत. मुलं जाणतात, आत्मिक पिता, जे पण
आत्माच आहेत, ते संपूर्ण आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही गंज चढलेला नाही. शिवबाबा
म्हणतात, माझ्यामध्ये गंज आहे का? बिल्कुल नाही. या दादा मध्ये तर पुर्णपणे गंज होता.
यांच्यामध्ये बाबांनी प्रवेश केला, तर मदत पण मिळाली. मुख्य गोष्ट पाच विकाराच्या
मुळे, आत्म्यावरती गंज चढल्यामुळे अपवित्र बनले आहेत. तर जितकी बाबांची आठवण कराल
तेवढा गंज निघत जाईल. भक्तिमार्गाच्या कथा तर जन्म जन्मांतर ऐकत आले आहात. ही गोष्ट
वेगळी आहे. तुम्हाला तर ज्ञानाच्या सागरा कडून ज्ञान मिळत आहे. तुमच्या बुद्धीमध्ये
मुख्य लक्ष्य आहे आणि दुसऱ्या कोणत्याही सत्संग इत्यादीमध्ये मुख्य लक्ष राहत नाही.
ईश्वराला सर्वव्यापी म्हटल्यामुळे माझी निंदा करत राहतात, हे पण वैश्विक नाटका
नुसार होत आहे. मनुष्य हे पण समजत नाहीत, की हे वैश्विक नाटक आहे. यामध्ये रचनाकार
आणि निर्माता पण वैश्विक नाटकाच्या वश आहेत. त्यांना सर्वशक्तिमान म्हटले जाते परंतु
तुम्ही जाणतात ते पण वैश्विक नाटकाच्या रूळावरुन चालत आहेत. बाबा जे स्वत: येऊन
मुलांना समजवतात, ते म्हणतात माझ्या मध्ये अविनाशी भुमिका नोंदलेली आहे, त्यानुसार
शिकवतो. जे काही समजवतो ते पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे. आता तुम्हाला या
पुरुषोत्तम संगमयुगा मध्ये पुरुषोत्तम बनायचे आहे. भगवानुवाच आहे ना. बाबा म्हणतात,
तुम्हा मुलांना पुरुषार्थ करून, असे लक्ष्मीनारायण सारखे बनायचे आहे. असे दुसरे कोणी
मनुष्य म्हणू शकत नाहीत की, तुम्हाला विश्वाचे मालक बनायचे आहे. तुम्ही जाणतात,
आम्ही विश्वाचे मालक, नरा पासून नारायण बनण्यासाठी आलो आहोत. भक्तिमार्ग मध्ये तर
जन्म जन्मांतर कथा ऐकत आले, ज्ञान काहीच नव्हते. आता तुम्ही समजता बरोबर या लक्ष्मी
नारायणाचे राज्य स्वर्गामध्ये होते, जे आत्ता नाही. त्रिमूर्ती बाबत पण मुलांना
समजावले आहे. ब्रह्माद्वारे आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे. सतयुगा
मध्ये एकच धर्म होता, दुसरा कोणता धर्म नव्हता. आता तो धर्म नाही, परत स्थापना होत
आहे. बाबा म्हणतात, मी कल्प-कल्पाच्या संगमयुगा मध्ये येऊन तुम्हा मुलांना शिकवतो.
ही पाठशाला आहे ना. येथे मुलांना चरित्र पण सुधारायचे आहे आणि पाच विकारांना काढून
टाकायचे आहे. तुम्हीच देवतांच्या पुढे जाऊन गायन करत होते, तुम्ही सर्व गुण संपन्न...
आम्ही पापी आहोत. भारतवासीच देवता होते. सतयुगामध्ये हे लक्ष्मीनारायण पूज्य होते,
परत कलियुगामध्ये पुजारी बनले. आता परत पुज्य बनत आहेत. त्यांचे शरीर पण सतोप्रधान
होते. जशी आत्मा तसेच शरीर मिळते. सोन्यामध्ये भेसळ होते, तर त्याचा भाव कमी होतो.
तुम्ही पण खूप श्रेष्ठ होते, विकारी बनल्यामुळे आता खूप कमी भाव झाला आहे. तुम्ही
पूज्य होते, जे आता पुजारी बनले आहेत. आता जितके योगामध्ये राहाल, तेवढी गंज उतरेल
आणि बाबांशी प्रेम वाढेल, खुशी पण होईल. बाबा स्पष्ट करून सांगतात, मुलांनो चार्ट
लिहा म्हणजे दिनचर्या लिहा की, संपूर्ण दिवसांमध्ये आम्ही किती वेळ आठवण करतो. आठवणी
ची यात्रा हे अक्षर बरोबर आहे. आठवण करत करत, गंज काढून टाकून, अंत मती सो गती होईल.
ते पंडे लोक यात्रे वरती घेऊन जातात. येथे तर आत्म स्वतःची यात्रा करत राहते.
आपल्याला परमधामला जायचे आहे, कारण हे वैश्विक नाटकाचे चक्र आता पूर्ण होत आहे. हे
पण तुम्ही जाणतात की, खूप खराब दुनिया आहे. परमात्म्याला तर कोणीच जाणत नाहीत, जाणत
नसल्यामुळे म्हटले जाते विनाश काळात विपरीत बुद्धी. त्यांच्यासाठी तर हा नर्कच
स्वर्गासारखा आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये या ज्ञानाच्या गोष्टी बसू शकत नाहीत.
तुम्हा मुलांना हे सर्व विचार सागर मंथन करण्यासाठी खूप एकांत पाहिजे. मधुबन मध्ये
तर एकांत खूप छान आहे म्हणून मधुबन ची महिमा आहे. तुम्हा मुलांना खूप खुश व्हायला
पाहिजे, आम्हा जीव आत्म्यांना परमात्मा शिकवत आहेत. कल्पापुर्वी पण असे शिकवले होते.
कृष्णाची गोष्ट नाही, तो तर छोटा मुलगा होता. तो आत्मा आणि हे परमात्मा आहेत. प्रथम
क्रमांकची आत्मा श्रीकृष्ण, परत शेवटच्या नंबर मध्ये येते, तर नाव पण वेगळे होते.
अनेक जन्माच्या अंतमध्ये नाव तर दुसरेच असेल ना. असे म्हणतात हे दादा लेखराज आहेत.
हा अनेक जन्माच्या अंतकाळातील जन्म आहे. बाबा म्हणतात, यांच्या शरीरा मध्ये प्रवेश
करून तुम्हाला राजयोग शिकवतो. बाबा कोणत्या तरी तना मध्ये येतील ना. ग्रंथांमध्ये
या गोष्टी नाहीत. बाबा तुम्हा मुलांना शिकवतात, तुम्हीच शिकतात, परत सतयुगा मध्ये
हे ज्ञान नसेल. तेथे तर प्रारब्ध आहे. बाबा संगमयुगा मध्ये येऊन हे ज्ञान ऐकवतात,
परत तुम्ही श्रेष्ठ पद मिळवतात. ही वेळ बेहदच्या पित्याकडून बेहदचा वारसा घेण्यासाठी
आहे, म्हणून मुलांनो चालढकल करू नका. माया खूप गफलत करवते, परत समजले जाते, यांच्या
भाग्यामध्ये नाही. बाबा तर पुरुषार्थ करवतात. भाग्या मध्ये किती फरक पडतो. कोणी पास,
कोणी नापास होतात. दुहेरी मुकुटधारी बनण्यासाठी, पुरुषार्थ करावा लागेल.
बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारांमध्ये खुशाल रहा. लौकिक पित्याचे कर्ज पण मुलांना
उतरायचे आहे. कायद्यानुसार चालायचे आहे. येथे तर सर्व बेकायदा आहेत. तुम्ही जाणतात,
आम्हीच इतके उच्च पवित्र होतो, परत खाली उतरत आलो आहोत. आता परत पवित्र बनायचे आहे.
प्रजापिता ब्रह्माची मुलं सर्व ब्रह्मकुमार-कुमारी आहेत, तर विकारी दृष्टी जाऊ शकत
नाही, कारण तुम्ही आपसामधे भाऊबहीण आहेत ना. हे शिव पिता युक्ती सांगतात. तुम्ही
सर्व बाबा-बाबा म्हणत राहतात, तर भाऊ बहीण झाले ना. भगवंताला सर्व बाबा म्हणतात ना.
आत्मे म्हणतात, आम्ही शिव बाबांची मुल आहोत, परत शरीरामध्ये आल्यामुळे भाऊ-बहीण
आहोत. परत आमची विकारी दृष्टी का जायला पाहिजे? तुम्ही मोठ-मोठ्या सभांमध्ये हे
समजावू शकता, तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात, परत प्रजापिता ब्रह्मा द्वारे रचना केली
जाते, तर भाऊ-बहीण झाले, दुसरा कोणताही संबंध नाही. आम्ही सर्व एक पित्याची मुल
आहोत. एक बाबांची मुलं परत विकारांमध्ये कसे जाऊ शकतो. भाऊ भाऊ पण आहोत आणि भाऊ
बहीण पण आहोत. बाबांनी समजवले आहे, हे डोळे खूप धोका देणारे आहेत. डोळे चांगली
गोष्ट पाहतात, तर मन आकर्षित होते, डोळे पाहणार नाहीत, तर इच्छा पण होणार नाही. या
विकारी दृष्टीला बदलायचे आहे. भाऊ बहीण विकारात जाऊ शकत नाहीत. विकारी दृष्टी नष्ट
व्हायला पाहिजे. ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राचे बळ पाहिजे. अर्धा कल्प या डोळ्याद्वारे
काम केले आहे, आता बाबा म्हणतात ही सर्व गंज कशी निघेल. आम्ही आत्मा जे पवित्र होतो,
त्यामध्येच विकाराची गंज लागलेली आहे. जितकी बाबांची आठवण कराल, तेवढे बाबांशी
प्रेम वाढेल, ज्ञानामुळे नाही, तर आठवणी द्वारे प्रेम वाढेल. भारताचा प्राचीन योग
आहे, ज्याद्वारे आत्मा पवित्र बनून आपल्या घरी चालली जाईल. सर्व भावांना आपल्या
पित्याचा परिचय द्यायचा आहे. सर्वव्यापीच्या ज्ञानामुळे तिव्रवेगाने विकारांमध्ये
गेले आहेत. आता बाबा म्हणतात वैश्विक नाटकात तुमची भूमिका आहे. राजधानी आवश्य
स्थापन होणार आहे. जितका कल्पापूर्वी पुरुषार्थ केला आहे, तेवढा जरूर कराल. तुम्ही
साक्षी होऊन पाहत राहतात, हे प्रदर्शनी इत्यादी तर खूप पाहत राहतील. तुमची ईश्वरीय
संस्था आहे. ही निराकारी ईश्वरीय पित्याची संस्था आहे. दुसरी असते ख्रिश्चन संस्था,
बौध्दी संस्था. ही तर निराकारी ईश्वरीय संस्था आहे. निराकार तर जरूर कोणत्या
शरीमध्ये येतील ना. तुम्ही पण निराकार आत्मे, माझ्या सोबत राहणारे होते ना. हे
वैश्विक नाटक कसे आहे, हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. रावण राज्यांमध्ये सर्व
विपरीत बुद्धी झाले आहेत. आता बाबांशी प्रीत लावायची आहे. तुमचा वायदा आहे, माझे तर
एक शिवबाबा दुसरे कोणी नाहीत, नष्टमोहा बनायचे आहे. हेच कष्ट घ्यायचे आहेत. हे जसे
फाशीवर लटकणे आहे. बाबांची आठवण करणे म्हणजे फाशी वरती लटकणे, शरीराला विसरून
आत्म्याला बाबांच्या आठवणी मध्ये जायचे आहे. बाबांची आठवण खूप आवश्यक आहे, नाहीतर
गंज कसा निघेल. मुलांच्या मनामध्ये खूप आनंद राहायला पाहिजे, शिवबाबा आम्हाला शिकवत
आहेत. कोणी ऐकतील तर म्हणतील, हे काय म्हणत आहेत, कारण तेथे तर कृष्णालाच भगवान
समजतात. . . तुम्हा मुलांना आता खूप आनंद होत आहे की, आम्ही आता कृष्णाच्या
राजधानीमध्ये जात आहोत. आम्हीपण राजकुमार राजकुमारी बनू शकतो. ते प्रथम राजकुमार
आहेत. नवीन घरांमध्ये राहतात, नंतर जे मुलं जन्म घेतील, ते तर उशिरा येतील ना. जन्म
तर स्वर्गामध्ये होईल. तुम्ही पण स्वर्गामध्ये राजकुमार बनू शकतात. सर्व तर प्रथम
क्रमांका मध्ये येणार नाहीत, क्रमानुसार माळ बनेल ना. बाबा म्हणतात, मुलांनो खूप
पुरुषार्थ करा. येथे तुम्ही नरापासून नारायण बनण्यासाठी आले आहात. ही सत्यनारायणाची
कथा आहे, लक्ष्मीची कथा कधी ऐकली नसेल. प्रेम पण सर्वांचे कृष्ण वरती जाते.
कृष्णालाच पाळण्यामध्ये झोके देतात, राधेला का देत नाहीत? वैश्विक नाटका नुसार
त्यांचे नाव चालते. तुमची समवयस्क तर राधा आहे, तरीही प्रेम कृष्ण सोबत आहे. त्यांची
वैश्विक नाटकांमध्ये भूमिका अशी आहे. मुलं नेहमी प्रिय असतात. पिता मुलांना पाहून
खूप खुश होतात. मुलगा झाला तर आनंद होतो, मुलगी झाली, तर संभ्रमित होतात. काहीतर
मुलीला मारून पण टाकतात. रावणाच्या राज्यांमध्ये चरित्रा मध्ये खूप फरक पडतो. गायन
पण आहे, तुम्ही सर्व गुण संपन्न इत्यादी आहात. आम्ही तर निर्गुण आहोत. बाबा म्हणतात
परत असे गुणवान बना. आता समजतात, आम्ही असे अनेक वेळेस, या विश्वाचे मालक बनलो आहोत.
आता परत बनवायचे आहे. मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे. शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत.
हेच बसून चिंतन करा. भगवान आम्हाला शिकवत आहेत, वाह भाग्य वाह!असे विचार करत मस्ताना
व्हायला पाहिजे. वाह भाग्य वाह! बेहदचे बाबा आम्हाला मिळाले आहेत. आम्ही बाबांची
आठवण करत आहोत. पवित्रतेची धारणा करायची आहे. आम्ही हे बनत आहोत, दैवी गुण धारण करत
आहोत. हे पण मनमनाभव आहे. बाबा आम्हाला असे श्रेष्ठ बनवतात. ही तर प्रत्यक्ष
अनुभवाची गोष्ट आहे. बाबा गोड गोड मुलांना श्रीमत देतात की, चार्ट म्हणजेच दिनचर्या
लिहा. एकांत मध्ये बसून स्वत:शी गोष्टी करा. हा बैज तर नेहमी लावलेला हवा.
भगवंताच्या श्रीमता वरती आम्ही असे श्रेष्ठ बनत आहोत. त्यांना पाहून त्यांच्याशी
प्रेम करत राहा. बाबांच्या आठवणी द्वारे आम्ही असे बनत आहोत. बाबा तुमची तर कमाल आहे,
बाबा आम्हाला माहीत होते की, तुम्ही आम्हाला विश्वाचे मालक बनवाल. नवविधा भक्तीमध्ये
दर्शनासाठी गळा कापायला लागतात किंवा प्राण द्यायला लागतात, तेव्हा दर्शन होते. अशा
भक्तांची माळ बनलेली आहे. भक्तांचा मान पण आहे, याचे भक्त जसे बादशहा आहेत. आता
तुम्हा मुलांना बाबांशी प्रेम आहे, एक बाबां शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको.
एकदम बुध्दीची लाईन स्पष्ट पाहिजे. आता आमचे ८४ जन्म पूर्ण झाले. याला जिंकायचे आहे.
आता आम्ही बाबाच्या आदेशावर पूर्ण रीतीने चालू. काम महाशत्रू आहे, त्याला जिंकायचे
आहे. हार खाऊन, परत पश्र्चाताप करून काय करणार. हाडे एकदम तुटून जातील. खूप खडक सजा
मिळते. गंज उतरण्याऐवजी आणखी जोरात चढतो. योग लागणार नाही. आठवणी मध्ये राहणे, खूप
कष्ट आहे. अनेक गप्पा मारतात, आम्ही तर बाबांच्या आठवणीने मध्येच राहतो. बाबा
जाणतात राहू शकत नाहीत. यामध्येच मायचे मोठे वादळ येते. स्वप्न इत्यादी असे येतील,
जे एकदम तंग करतील. खूप सहज आहे, लहान मुलगा पण समजू शकतो. बाकी आठवणीच्या
यात्रेमध्ये कष्ट आहेत. आम्ही खूप सेवा करतो, फक्त यामध्ये आनंदी व्हायचे नाही.
गुप्त सेवा, आठवणीची यात्रा करत राहा. यांना तर नशा राहतो मी शिव बाबांचा एकटाच
मुलगा आहे. बाबा विश्वाचे रचनाकार आहेत, तर जरुर आम्ही पण स्वर्गाचे मालक बनू.
राजकुमार बनणार आहोत, हा आनंद राहायला पाहिजे परंतु तुम्ही मुलं जितके आठवणीमध्ये
राहू शकता तेवढा मी नाही. बाबांना तर खूप विचार करावे लागतात. मुलांना कधी पण
संभ्रम व्हायला नको की, बाबा मोठ्या मनुष्याची खात्री का करतात. बाबा प्रत्येक
मुलांची नाडी पाहून त्यांच्या कल्याणार्थ प्रत्येकाला चालवतात. शिक्षक जाणतात
प्रत्येक विद्यार्थ्याला कसे चालवायचे आहे. मुलांना यामध्ये संशय घ्यायचं नाही,
अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) एकांत
मध्ये बसून स्वत:शी गोष्टी करायच्या आहेत. आत्म्याला जो गंज लागला आहे, त्याला
उरण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये राहून काढायचा आहे.
(२) कोणत्याही गोष्टी मध्ये संशय घ्यायचं नाही. ईर्ष्या करायची नाही. आतांरिक आनंदा
मध्ये राहायचे आहे. स्वतःची गुप्त सेवा करायची आहे.
वरदान:-
सेवा करत
उपराम स्थिती मध्ये राहणारे योगयुक्त, युक्तीयुक्त सेवाधारी भव.
जे योग्ययुक्त,
युक्तीयुक्त सेवाधारी आहेत, ते सेवा करताना पण नेहमी उपराम राहतील. असे नाही सेवा
जास्त आहे, म्हणून अशरीरी बनू शकत नाही, परंतु आठवण राहावी की माझी सेवा नाही,
बाबांनी दिली आहे तर निर्बंधन राहाल. मी विश्वस्त आहे बंधनमुक्त आहे, असा अभ्यास करा.
अतीच्या वेळेत अंत काळातील स्थिती, कर्मातीत अवस्थेचा अभ्यास करा. जसे दिनचर्या
मध्ये संकल्पाला नियंत्रीत करण्याचा अभ्यास करतात, असेच अंतरीच्या वेळेत अंत
काळाच्या स्थितीचा अनुभव करा, तेव्हा अंत काळात चांगल्या मार्काने पास होऊ शकाल.
बोधवाक्य:-
शुभ भावना,
कारणला निववारण मध्ये परिवर्तन करते.