30-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :-"तन-मन-धना द्वारे किंवा मन्सा-वाचा-कर्मणा अशी सेवा करा ज्यामुळे 21 जन्मांसाठी बाबांकडुन मोबदला मिळेल परंतु सेवेमध्ये कधीही आपसात वाद-विवाद व्हायला नको"

प्रश्न:-
नाटका नुसार बाबा जी सेवा करवत आहेत त्यामध्ये आणखी तीव्रता आणण्याची विधी काय आहे?

उत्तर:-
आपसात एक मत असावे, कधी कोणती तक्रार नसावी. जर तक्रार असेल तर सेवा काय करणार म्हणून आपसात मिळून संघटन बनवून विचार विनिमय करा, एक दुसऱ्याचे मदतगार बना. बाबा तर मदतगार आहेतच परंतु "हिम्मत मुलांची मदत बाबांची. . . . . " याच्या अर्थाला योग्य रीतीने समजून मोठ्या कार्यामध्ये मदतगार बना.

ओम शांती।
गोड-गोड मुले इथे येतात आत्मिक पित्याजवळ ताजेतवाने(रिफ्रेश)होण्यासाठी. जेव्हा ताजेतवाने होऊन परत जातात तर अवश्य जाऊन काहीतरी करून दाखवायला पाहिजे. एका-एका मुलांनी सेवेचा पुरावा द्यायला पाहिजे. जसे काही-काही मुले म्हणतात सेवाकेंद्र खोलण्याची इच्छा आहे. खेडेगावांमध्ये ही सेवा करतात ना. तर मुलांच्या मनामध्ये सदैव हा विचार राहायला पाहिजे की, आम्ही मन्सा-वाचा-कर्मणा, तन-मन-धनाने अशी सेवा करू ज्यामुळे भविष्य 21 जन्मां साठी मोबदला बाबांकडून मिळेल. हीच चिंता आहे. आम्ही काही करतो का? कोणाला ज्ञान देतो का? संपूर्ण दिवसभर हे विचार यायला पाहिजेत. भले सेंटर खोला परंतु घरामध्ये स्त्री-पुरुषाची तक्रार असायला नको. कोणताही टकराव नको. संन्यासी लोक घरातील टकरावा पासून दुर्लक्ष करून निघून जातात. नंतर शासन(सरकार)त्यांना थांबवते का? ते तर फक्त पुरुषच निघून जातात. आता काही-काही माता निघतात, ज्यांचे कोणी धनी- मालक नसते किंवा वैराग्य येते त्यांनाही ते संन्यासी पुरुष लोक बसून शिकवतात. त्यांच्याद्वारे आपला धंदा करतात. पैसे इत्यादी सर्व त्यांच्याजवळ असते. खरे पाहता घरदार सोडल्यानंतर पैसे इ. ची गरज राहत नाही. तर आता बाबा तुम्हा मुलांना समजावत आहेत. आम्हाला बाबांचा परिचय द्यायचा आहे-हे प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये यायला पाहिजे. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत, बेसमज आहेत. तुम्हा मुलांसाठी बाबांची आज्ञा आहे-गोड-गोड मुलांनो, तुम्ही स्वतःला आत्मा समजा, फक्त पंडित बनू नका. आपलेही कल्याण करायचे आहे. आठवणीने सतोप्रधान बनायचे आहे. खूप पुरुषार्थ करायचा आहे. नाहीतर खूप पश्चाताप करावा लागेल. म्हणतात बाबा आम्ही सतत विसरून जातो. संकल्प येतात. बाबा म्हणतात ते तर येणारच. तुम्हाला बाबांच्या आठवणी मध्ये राहून सतोप्रधान बनायचे आहे. आत्मा जी अपवित्र आहे, त्याला परमपिता परमात्म्याची आठवण करून पवित्र बनायचे आहे. बाबाच मुलांना दिशानिर्देश देतात-हे आज्ञाकारी मुलांनो-मी तुम्हाला आज्ञा करत आहे, माझी आठवण करा तर तुमचे पाप नष्ट होतील. पहिली-पहिली गोष्ट ही सांगा की निराकार शिवबाबा म्हणतात माझी आठवण करा-मी पतित-पावन आहे. माझ्या आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील दुसरा कोणता उपाय नाही. न कोणी सांगू शकते. खूप सारे संन्यासी इ. आहेत, निमंत्रण देतात-योग संमेलनामध्ये येउन सहभागी व्हा. आता त्यांच्या हठयोगाने कोणाचे कल्याण तर होणार नाही. असे खूप आश्रम आहेत ज्यांना या राजयोगा बद्दल अजिबात माहिती नाही. बाबांनाच जाणत नाहीत. बेहदचा पिता येऊन खरा-खरा योग शिकवत आहे. बाबा तुम्हा मुलांना आपसमान बनवत आहेत. जसा मी निराकार आहे. तात्पुरता या शरीरामध्ये आलो आहे. भाग्यशाली रथ तर अवश्य मनुष्याचा असेल. बैलाला तर म्हणणार नाही. बाकी घोडागाडी इ. ची गोष्ट नाही. न लढाईची कोणती गोष्ट आहे. तुम्ही जाणत आहात आम्हाला मायेशी युद्ध करायचे आहे. गायनही आहे माया से हारे हार. . . . . तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावु शकता- परंतु आता शिकत आहात. कुणी शिकता-शिकता ही एकदम जमिनीवर येऊन पडतात. काहीतरी तक्रार होते. दोन बहिणींचे ही आपापसात पटत नाही, खाऱ्या पाण्यासारखे होतात. तुमची आपापसात काहीही तक्रार व्हायला नको. तक्रार झाली तर बाबा म्हणतील हे काय सेवा करणार. खूप चांगल्या-चांगल्यांचेही असे हाल होतात. आता जर माला बनवली तर म्हणतील ही माळा अपूर्ण आहे. अजून यामध्ये हे-हे अवगुण आहेत. नाटकाच्या नियोजनानुसार बाबा सेवाही करून घेत आहेत. डायरेक्शन(दिशानिर्देश)देत राहतात. दिल्लीमध्ये चारी बाजूला सेवेचा घेराव टाका. हे फक्त एक-दोघांना थोडीच करायचे आहे, आपसात मिळून विचार-विनिमय करा. सर्वांचे एकमत असायला पाहिजे. बाबा एक आहेत परंतु मदतगार मुलांशिवाय काम थोडीच करणार आहेत. तुम्ही सेवाकेंद्र उघडता, मत घेता. बाबा विचारतात मदत करणारे आहात का? म्हणतात-हो बाबा, जर मदत करणारे नसतील तर काही करू शकत नाही. घरामध्ये ही मित्र संबंधी इ. येतात ना. खुशाल निंदा करतील, ते तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही त्याची पर्वा करू नका.

तुम्ही मुलांनी एकत्र बसून विचार विनिमय करायला पाहिजे. ज्याप्रमाणे सेंटर खोलतात तेव्हा सर्वजण मिळून लिहितात-बाबा आम्ही ब्राह्मणीच्या विचाराने हे काम करत आहे. सिंधी भाषेमध्ये म्हणतात-ब त बारा (एका बरोबर 2 मिळवल्यावर 12 होतात)12 झाले तर अजूनच चांगला विचार निघेल. काही ठिकाणी एक दोघांकडून विचार घेत नाहीत. आता असे कोणते काम होऊ शकते का? बाबा म्हणतात जोपर्यंत तुमचे आपसात संघटन होत नाही तोपर्यंत तुम्ही एवढे मोठे कार्य कसे करू शकणार. छोटे दुकान, मोठे दुकानही असते ना. आपसात मिळून संघटन बनवतात. बाबा तुम्ही मदत करा असे कुणी म्हणत नाही. सुरुवातीला तर मदतगार बनवायला पाहिजेत. नंतर बाबा म्हणतात-हिम्मत मुलांची मदत बाबांची. सुरुवातीला स्वतःला मदतगार बनवा. बाबा आम्ही एवढे करतो बाकी तुम्ही मदत करा. असे नाही, सुरुवातीला तुम्ही मदत करा. हिम्मते मर्दा. . . . . याचा अर्थही समजत नाहीत. सुरुवातीला तर मुलांमध्ये हिम्मत पाहिजे. कोण-कोण काय मदत देते? सारा पोतामेल लिहितील- आमक्या-आमक्या नी ही मदत दिली आहे. नियमाप्रमाणे लिहून देतील. बाकी असे थोडेच एक- एक म्हणतील आम्ही सेवाकेंद्र उघडतो, मदत द्या. असे तर बाबा उघडू शकत नाहीत का? परंतु असे तर होऊ शकत नाही. समितिला एकत्र भेटावे लागते. तुमच्यामध्ये ही क्रमवार आहेत ना. काहींना तर अजिबात काहीच कळत नाही. काही खूप हर्षित होतात. बाबा तर समजतात या ज्ञानामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे. एकच पिता, शिक्षक, गुरु मिळतो तर खुशी व्हायला पाहिजे ना. दुनियेमध्ये या गोष्टी कोणीही जाणत नाही. शिवबाबाच ज्ञानसागर, पतित पावन, सर्वांचा सदगती दाता आहे. सर्वांचा पिता ही एक आहे. हे दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही. आता तुम्ही मुले जाणत आहात तोच ज्ञानसंपन्न, मुक्तिदाता, मार्गदर्शक आहे. तर बाबांच्या मतावर चालायला हवे. आपसात बसून विचार विनिमय करायला हवा. खर्च करायचा आहे. एकाच्या मतावर तर चालू शकत नाहीत. मदतगार सर्वजण पाहिजेत. हीसुद्धा बुद्धी पाहिजे ना. तुम्हा मुलांना घराघरांमध्ये संदेश द्यायचा आहे. विचारतात- लग्नामध्ये निमंत्रण मिळते, जाऊ का? बाबा म्हणतात-का नाही, जा, जाऊन आपली सेवा करा. अनेकांचे कल्याण करा. भाषणही करू शकता. मृत्यू समोर उभा आहे, बाबा म्हणतात मामेकम माझी आठवण करा. इथे सर्व पाप आत्मे आहेत. बाबांची निंदा करत राहतात. बाबां पासून तुम्हाला बेमुख केले आहे. गायनही आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. कोण म्हणाले? बाबांनी स्वतः सांगितले आहे-माझ्याशी प्रीत बुद्धी नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. मला जाणतच नाहीत. ज्यांची प्रीत बुद्धी आहे, जे माझी आठवण करतात, तेच विजय प्राप्त करतील. जरी प्रीत आहे परंतु आठवण करत नाहीत, तरीही कमी पद प्राप्त करतील. बाबा मुलांना डायरेक्शन देतात. मुख्य गोष्ट सर्वांना संदेश द्यायचा आहे. बाबांची आठवण करा तर पावन बनुन, पावन दुनियेचे मालक बनाल. नाटका नुसार बाबांना वृद्ध शरीर घ्यावे लागते. वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करतात. मनुष्य वानप्रस्थ अवस्थेमध्ये ईश्वराला भेटण्यासाठी मेहनत करतात. भक्तीमध्ये समजतात- जप तप इ. करणे हे सर्व ईश्वराला भेटण्याचे मार्ग आहेत. केव्हा भेटेल हे काही माहिती नाही. जन्म-जन्मांतर भक्ती करत आले आहेत. ईश्वर तर कोणाला भेटतच नाही. हे समजत नाहीत बाबा तेव्हा येतील जेव्हा जुन्या दुनियेला नवे बनवायचे असेल. रचनाकार बाबा आहेत, चित्र तर आहेत परंतु त्रिमूर्ती मध्ये शिवाला दाखवत नाहीत. शिवबाबां शिवाय ब्रह्मा-विष्णू-शंकर दाखवले आहेत, जसे की गळा कापला आहे. बाबांच्या शिवाय अनाथ होतात. बाबा म्हणतात मी घेऊन तुम्हाला सनाथ बनवतो. २१ जन्म तुम्ही सनाथ बनता. कोणताही त्रास राहत नाही. तुम्ही ही म्हणाल-जोपर्यंत बाबा भेटले नव्हते, तोपर्यंत आम्ही ही अनाथ तुच्छ बुद्धी होतो. पतित-पावन म्हणतात-परंतु ते किंवा येतात, हे जाणत नाहीत. नवी दुनिया पावन दुनिया आहे. बाबा किती सोप्या पद्धतीने समजावतात. तुम्हालाही समजते, आम्ही बाबांचे बनलो आहे, स्वर्गाचे मालक अवश्य बनू. शिवबाबा बेहदचा मालक आहे. बाबांनीच येऊन सुख-शांती चा वारसा दिला होता. सतयुगामध्ये सुख होते-बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये होते. आता या गोष्टींना तुम्ही समजत आहात. शिवबाबा का आले असतील. अवश्य नवी दुनिया रचण्यासाठी. पतीतांना पावन बनवण्यासाठी आले असतील. उच्च कार्य केले असेल, मनुष्य खूप अंधारात आहेत. बाबा म्हणतात हेही नाटकांमध्ये नोंद आहे. तुम्हा मुलांना बाबा बसून जागे करत आहेत. तुम्हाला आता या सर्व नाटकाबद्दल माहित आहे-नवी दूनिया कशाप्रकारे नंतर जुनी होते. बाबा म्हणतात दुसरे सर्व काही सोडून एक बाबांची आठवण करा. आम्हाला कोणाबद्दल तिरस्कार वाटत नाही. हे समजवावे लागते. नाटका नुसार मायेचे राज्यही होणार आहे. आता परत बाबा म्हणतात-गोड-गोड मुलांनो, आता हे चक्र पूर्ण होत आहे. आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळत आहे, त्यावर चालायचे आहे. आता ५ विकारांच्या मतावर चालायचे नाही. अर्धाकल्प तुम्ही मायेच्या मतावर चालून तमोप्रधान बनले आहात. आता मी तुम्हाला सतोप्रधान बनवण्यासाठी आलो आहे. सतोप्रधान, तमोप्रधान चा हा खेळ आहे. निंदा करण्याची कोणती गोष्ट नाही. म्हणतात ईश्वराने हे अवागमन चे(जन्म मरणाचे नाटक)नाटकच का बनवले? का म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. हे तर नाटकाचे चक्र आहे, जे नंतर पुनरावृत्त होत राहते. नाटकं अनादी आहे. आता कलियुग आहे, सतयुग पाठीमागे होऊन गेले आहे. आता पुन्हा बाबा आले आहेत. बाबा-बाबा म्हणत रहा तर कल्याण होत राहील. बाबा म्हणतात या अतिशय गुह्य रमणीक गोष्टी आहेत. असे म्हणतात वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे पाहिजे. सोन्याची बुद्धी कशी बनेल? आत्म्या मध्येच बुद्धी आहे ना. आत्मा म्हणते-माझी बुद्धी आता बाबांकडे आहे. मी बाबांची खुप आठवण करतो. बसल्या- बसल्या बुद्धी इतर ठिकाणी निघून जाते. बुद्धीमध्ये कामधंदा आठवणीत येत राहील. तर तुमच्या गोष्टी जसे की ऐकणारच नाहीत. मेहनत आहे. जेवढे-जेवढे मरण जवळ येत जाईल-तुम्ही खूप आठवणीमध्ये राहाल. मृत्यूच्या वेळी सर्वजण म्हणतात भगवानाची आठवण करा. आता बाबा स्वतः म्हणतात माझी आठवण करा. तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. परत जायचे आहे म्हणून आता माझी आठवण करा. दुसऱ्या कोणत्या गोष्टी ऐकू नका. जन्म जन्मांतराचे पापांचे ओझे तुमच्या डोक्यावर आहे. शिवबाबा म्हणतात या वेळी सर्वजण अजामिल आहेत. मुख्य गोष्ट आहे आठवणीची यात्रा ज्याद्वारे तुम्ही पावन बनणार आहात नंतर आपसा मधे प्रेमही असायला पाहिजे. एक-दोघांचा विचार घ्यायला पाहिजे. बाबा प्रेमाचा सागर आहे ना. तर तुमचेही आपसा मध्ये खूप प्रेम असायला पाहिजे. देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे. भाऊ-बहिणीचा संबंध ही विसरून जायला पाहिजे. भाऊ- बहीणीशी ही योग ठेवू नका. एक बाबांशी योग ठेवा. बाबा आत्म्यांना म्हणतात-माझी आठवण करा तर तुमची विकारी दृष्टी नष्ट होऊन जाईल. कर्मेन्द्रियांनी कोणतेही विकर्म करू नका. मनामध्ये वादळ अवश्य येतील. हे खूप मोठे ध्येय आहे. बाबा म्हणतात पहा कर्मेंद्रिया धोका देत आहेत तर खबरदार व्हा. जर उलटे काम केले तर संपले. चढेल तो चाखेल वैकुंठाचा मालक... मेहनत केल्याशिवाय थोडीच काही होते. खूप मेहनत आहे. देहा सहित देहाचे... काही-काहींना तर बंधनही नाही तरीही फसलेले राहतात. बाबांच्या श्रीमतावर चालत नाहीत. दोन लाख आहेत, जरी मोठे कुटुंब आहे तरीही बाबा म्हणतात जास्त काम धंद्यामध्ये फसू नका. वानप्रस्थी बना. खर्च इ. कमी करा. गरीब लोक किती साधे राहतात. आता काय-काय वस्तू निघाल्या आहेत, विचारूच नका. साहूकार खूप खर्च करतात. नाहीतर पोटाला काय पाहिजे? एक पाव पीठ. बस. अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आपसा मध्ये खूप-खूप प्रेमळ बनायचे आहे परंतु भाऊ- बहिणींशी योग ठेवायचा नाही. कर्मेन्द्रियांनी कोणतेही विकर्म करायचे नाही.

2. एका ईश्वरीय मतावर चालून सतोप्रधान बनायचे आहे. मायेचे मत सोडून द्यायचे आहे. आपसामध्ये संघटन मजबूत करायचे आहे, एक-दुसऱ्याचे मदतगार बनायचे आहे.

वरदान:-
अमृतवेळेच्या महत्वाला जाणून खुल्या भंडारा पासून आपली झोळी भरपूर करणारे भाग्यवान भव

अमृतवेळेला वरदाता भाग्य विधात्यापासून भाग्याची रेषा जेवढी खेचायची आहे तेवढी खेचून घ्या कारण की त्यावेळी भोळा भगवानाच्या रुपामध्ये प्रेमस्वरूप आहे म्हणून मालक बना आणि अधिकार घ्या. खजान्यावर कोणतेही कुलूप- चावी नाही. त्यावेळी फक्त मायेची बहाणेबाजी सोडून एक संकल्प करा की जो पण आहे, जशी पण आहे, तुमची आहे. मन बुद्धी बाबांच्या हवाले करून तख्तनशीन बना तर बाबांचे सर्व खजाने स्वतःचे खजाने आहेत असा अनुभव होईल.

बोधवाक्य:-
सेवेमध्ये जर स्वार्थ मिसळत असेल तर सफलता ही मिक्स होऊन जाईल म्हणून निस्वार्थ सेवाधारी बना.