27-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- तुम्ही या नाटकाच्या खेळाला जाणत आहात म्हणून आभार मानण्याची ही गरज नाही"

प्रश्न:-
सेवेची आवड असणाऱ्या मुलांमध्ये कोणती सवय अजिबात असायला नको?

उत्तर:-
मागण्याची. तुम्हाला बाबांकडून आशिर्वाद किंवा कृपा इ. मागण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणाकडून पैसे ही मागू शकत नाही. मागण्यापेक्षा मेलेले बरे. तुम्ही जाणत आहात कल्पा पूर्वी ज्यांनी बीज पेरले असेल तेच पेरतील, ज्यांना आपले भविष्य पद उच्च बनवायचे असेल ते अवश्य सहयोगी बनतील. तुमचे काम आहे सेवा करणे. तुम्ही कोणाला काही मागू शकत नाही. भक्तीमध्ये मागतात, ज्ञानामध्ये नाही.

गीत:-
मुझको सहारा देने वाले...

ओम शांती।
मुलांच्या मनामधून आभार अक्षर पिता, शिक्षक, गुरु यांच्यासाठी निघू शकत नाही कारण की मुले जाणत आहेत हा खेळ बनला आहे. आभार इ. ची गरजच नाही. नाटका नुसार मुले हे ही जाणत आहेत. नाटक अक्षरही तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये येते. खेळ अक्षर म्हटल्या नंतरच सारा खेळ तुमच्या बुद्धीमध्ये येऊन जातो. म्हणजेच स्वदर्शन चक्रधारी तुम्ही स्वतःच बनून जाता. तिन्ही लोक ही तुमच्या बुद्धीमध्ये येऊन जातात. मूळवतन, क्ष्मवतन, स्थूलवतन. आता खेळ पूर्ण होत आहे हे ही तुम्ही जाणत आहात. बाबा येऊन तुम्हाला त्रिकालदर्शी बनवत आहेत. तिन्ही काळ, तिन्ही लोकांच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावत आहेत. काळ वेळेला म्हटले जाते. या सर्व गोष्टी लिहून घेतल्याशिवाय आठवणीत राहू शकत नाहीत. तुम्ही मुले तर खूप मुद्दे(पॉईंट)विसरून जाता. नाटकाच्या कालावधीला ही तुम्ही जाणता. तुम्ही त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनत आहात, ज्ञानाचा तिसरा नेत्र तुम्हाला मिळाला आहे. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुम्ही आस्तिक बनले आहात, नाहीतर तुमचा कोणी धनी नव्हता. हे ज्ञान तुम्हा मुलांना मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये सदैव ज्ञानाचे मंथन चालते. हे सुद्धा ज्ञान आहे ना. नाटका नुसार, उच्च ते उच्च पिताच ज्ञान देत आहेत. नाटक अक्षरही तुमच्या मुखातून निघू शकते. ते ही जी मुले सेवेमध्ये अग्रेसर राहतात त्यांच्या मुखातून निघू शकते. तुम्ही आता जाणत आहात-आम्ही अनाथ होतो. आता बेहद चा पिता धनी मिळाला आहे तर सनाथ बनलो आहे. अगोदर तुम्ही मुले अनाथ होता, बेहद्दचे पिता बेहद चे सुख देणारे आहेत, दुसरा कोणी पिता नाहीत, जे असे सुख देऊ शकतात. नवी दुनिया आणि जुनी दुनिया हे सर्व तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. परंतु इतरांनाही योग्य रीतीने समजावून सांगायला पाहिजे, याच ईश्वरीय धंद्यामध्ये लागायला पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती आपली-आपली असते. जे आठवणीच्या यात्रेमध्ये राहतात तेच समजावून सांगू शकतात. आठवणीने बळ मिळते ना. बाबा धारदार तलवार आहेत. तुम्हा मुलांना शक्तिशाली(धारदार) बनायचे आहे. योग बळाने विश्वाची बादशाही प्राप्त करत आहात. योगाने बळ मिळते, ज्ञानाने नाही. मुलांना समजावले आहे-ज्ञान कमाईचे साधन आहे. योगाला बळ म्हटले जाते. रात्रं-दिवसाचा फरक आहे. आता योग चांगला की ज्ञान चांगले?योग नावाजलेला आहे. योग म्हणजे बाबांची आठवण. बाबा म्हणतात या आठवणीनेच तुमचे पाप नष्ट होतील. यावरच बाबा जोर देत आहेत. ज्ञान तर सहज आहे. भगवानुवाच मी तुम्हाला सहज ज्ञान सांगत आहे. ८४ च्या चक्राचे ज्ञान सांगत आहे. त्यामध्ये सर्वच येते. इतिहास- भूगोल आहे ना. ज्ञान आणि योग दोन्ही सेकंदाचे काम आहे. बस आम्ही आत्मा आहोत, आम्हाला बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये मेहनत आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये राहिल्याने जसे काही शरीराची विस्मृती होऊन जाते. तासभर ही असे अशरीरी होउन बसलात तर किती पावन होऊन जाल. मनुष्य रात्री कोणी ६ कोणी ८ तास झोपतात तर अशरीरी होऊन जातात ना. त्या वेळी कोणतेही विकर्म होत नाही. आत्मा थकून झोपी जाते. पाप विनाश होतात असेही नाही. नाही, ती झोप आहे. विकर्म होत नाहीत. झोपले नाही तर पापच करत राहतील. झोपही एक बचावाचे साधन आहे. दिवसभर काम करून आत्मा म्हणते मी आता झोपत आहे, अशरीरी बनत आहे. तुम्हाला शरीर असतानाही अशरीरी बनायचे आहे. मी आत्मा या शरीरापासून वेगळी, शांत स्वरूप आहे. आत्म्याची महिमा कधी ऐकली नसेल. आत्मा सत् चित् आनंद स्वरूप आहे. परमात्म्याची महिमा गातात की की तो सत्य आहे, चैतन्य आहे, सुख शांती चा सागर आहे. आता तुम्हाला मास्टर(मालक)म्हटले जाईल, मुलांना मास्टर ही म्हणतात. बाबा युक्त्या ही सांगत राहतात. असेही नाही की दिवसभर झोपायचे नाही. नाही, तुम्हाला तर आठवणी मध्ये राहून पापांचा विनाश करायचा आहे. जेवढे होईल तेवढी बाबांची आठवण करायची आहे. बाबा आमच्यावर दया किंवा कृपा करतात असेही नाही. रहमदिल बादशाह-हे त्यांचे गायन आहे. तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवणे, हासुद्धा त्यांचा अभिनय आहे. भक्त लोक महिमा गातात-तुम्हाला फक्त महिमा गायची नाही. हे गीत इ. दिवसेंदिवस बंद होत राहतात. शाळेमध्ये कधी गीत असतात का?मुले शांत बसून राहतात. शिक्षक आल्यानंतर उठून उभे राहतात, नंतर बसतात. हे बाबा म्हणतात मला तर तुम्हाला शिकवण्याचा अभिनय मिळाला आहे, ते तर शिकवायचेच आहे. तुम्हा मुलांना उठण्याची गरज नाही. आत्म्याला बसून ऐकायचे आहे. तुमची गोष्ट साऱ्या दुनिया पेक्षा निराळी आहे. मुलांना उठून उभे राहा असे म्हणतात का. नाही, ते तर भक्ती मार्गामध्ये करतात, इथे नाही. बाबा तर स्वतः उठून नमस्ते करतात. शाळेमध्ये जर मुले उशिरा गेली तर शिक्षक एक तर शिक्षा देतात किंवा बाहेर उभे करतात म्हणून वेळेवर पोहोचण्याची भीती राहते. इथे तर घाबरण्याची गोष्ट नाही. बाबा तर समजावत राहतात-मुरली मिळत राहतात. त्या नियमित वाचायच्या आहेत. मुरली वाचली तर तुमची हजेरी लागेल. नाहीतर गैरहजेरी लागेल कारण की बाबा म्हणतात तुम्हाला गुह्य-गुह्य गोष्टी सांगतो. तुम्ही जर मुरली मिस(बुडवली)केली तर ते पॉईंट(मुद्दे)मिस होऊन जातील. या नवीन गोष्टी आहेत, ज्यांना दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. तुमचे चित्र पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होतात. कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. भगवानाने चित्र बनवले होते. ही तुमची नवी चित्रशाळा आहे. ब्राह्मण कुळाचे जे देवता बनणारे आहेत त्यांच्याच बुद्धीमध्ये बसेल. म्हणतील हे तर ठीक आहे. कल्पा पूर्वीही आम्ही शिकलो होतो, अवश्य भगवान शिकवत आहेत.

भक्ती मार्गाच्या ग्रंथामध्ये प्रथम क्रमांकावर गीता आहे कारण की पहिला धर्मच हा आहे. अर्ध्याकल्पा नंतर त्याच्याही खूप उशिरा दुसरे ग्रंथ बनतात. सुरुवातीला इब्राहिम आला तेव्हा एकटा होता. नंतर एका पासून दोन, दोनपासून चार झाले. जेव्हा धर्माची वृद्धी होत-होत लाख दीड लाख होऊन जातात तेव्हा ग्रंथ इ. बनवतात. त्यांचे ही ग्रंथ अर्ध्या वेळा नंतरच बनवत असतील, हिशेब केला जातो ना. मुलांना तर खूप खुशी व्हायला पाहिजे. बाबांकडून आम्हाला वारसा मिळत आहे. तुम्ही जाणत आहात बाबा आम्हाला सृष्टी चक्राचे सारे ज्ञान समजावत आहेत. हा बेहद चा इतिहास-भूगोल आहे. सर्वांना सांगा इथे दुनियेचा इतिहास-भूगोल समजावला जातो जो इतर कोणीही शिकवू शकत नाही. जरी दुनियेचा नकाशा काढतात. परंतु त्यामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य केव्हा होते, किती वेळ चालले असे कुठे दाखवतात?दुनिया तर एकच आहे. भारतामध्येच राज्य करून गेले आहेत, आता नाहीत. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. ते तर कल्पाचे आयुष्यच मोठे लाखो वर्षांचे आहे असे म्हणतात. तुम्हा गोड-गोड मुलांना काही जास्त त्रास देत नाहीत. बाबा म्हणतात पावन बनायचे आहे. पावन बनण्यासाठी तुम्ही भक्ती मार्गामध्ये किती धक्के खात आहात. आता समजत आहात धक्के खाता-खाता २५००वर्ष निघून गेली. आता पुन्हा एकदा राज्य भाग्य देण्यासाठी बाबा आले आहेत. हेच तुमच्या आठवणीत आहे. जुन्या पासून नवी आणि नव्या पासून जुनी दुनिया अवश्य बनते. आता तुम्ही जुन्या भारताचे मालक आहात ना. पुन्हा नव्या भारताचे मालक बनाल. एका बाजूला भारताची खूप महिमा गात राहतात, दुसऱ्या बाजूला नंतर खूप निंदा करत राहतात. ते गीतही तुमच्याजवळ आहेत. तुम्ही समजावता-आता काय-काय होत आहे. ही दोन्ही गीते ऐकवायला पाहिजेत. तुम्ही सांगू शकता-कुठे रामराज्य, कुठे हे!

बाबा गरीब निवाज आहेत. गरिबांच्याच मुली ज्ञान घेतात. सावकारांना तर आपला नशा राहतो. कल्पा पूर्वी जे आले असतील तेच येतील. काळजी करण्याची काही गरज नाही. शिवबाबांना कधी कोणती काळजी नसते, दादाला असते. यांना आपली ही काळजी आहे, मला नंबर एक पावन बनायचे आहे. यामध्ये गुप्त पुरुषार्थ आहे. चार्ट, दिनचर्या लिहिल्याने समजून येते, यांचा पुरुषार्थ जास्त आहे. बाबा नेहमी समजावत राहतात डायरी ठेवा. खूप मुले लिहितात, चार्ट लिहिल्याने खूप सुधारणा झाली आहे. ही युक्ती खूप चांगली आहे, तर सर्वांनी करायला पाहिजे. डायरी ठेवल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. डायरी ठेवणे म्हणजे बाबांची आठवण करणे. त्यामध्ये बाबांची आठवण लिहायची आहे. डायरी ही मदतगार बनेल, पुरुषार्थ होईल. लिहून ठेवण्यासाठी किती लाखो-करोडो डायऱ्या बनतात. लिहून ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे कधीही विसरायला नाही पाहिजे. त्याच वेळी डायरीमध्ये लिहायला पाहिजे. रात्री हिसाब-किताब लिहायला पाहिजे. नंतर माहित पडेल यामध्ये तर आमचे नुकसान होत आहे कारण की जन्म जन्मांतराचे विकर्म भस्म करायचे आहेत.

बाबा रस्ता सांगत आहेत-स्वतः वर दया किंवा कृपा करायची आहे. शिक्षक तर शिकवतात, आशीर्वाद तर देणार नाहीत. आशीर्वाद, कृपा, दया इ. मागण्यापेक्षा मेलेले बरे. कोणाकडून पैसे ही मागायचे नाहीत. मुलांना कठोर मनाई केली आहे. बाबा म्हणतात नाटका नुसार ज्यांनी कल्पापूर्वी बीज पेरले असेल, वारसा प्राप्त केला असेल ते आपोआप करतील. तुम्ही कोणत्याही कामासाठी मागू नका. जो करणार नाही त्याला मिळणारही नाही. मनुष्य दान- पूण्य करतात तर मोबदल्यात मिळते ना. राजाच्या घरी किंवा सावकाराच्या घरी जन्म होतो. ज्यांना करायचे असेल ते स्वतः करतील, तुम्ही मागू नका. कल्पा पूर्वी ज्यांनी जेवढे केले आहे, ड्रामा (नाटक) त्यांच्याकडून करून घेईल. मागण्याची काय गरज आहे. बाबा तर म्हणतात सेवेसाठी भंडारी भरत राहते. आम्ही मुलांना पैसा द्या असे थोडीच म्हणू शकतो. भक्तीमार्गाची गोष्ट ज्ञान मार्गामध्ये नसते. ज्यांनी कल्पा पूर्वी मदत केली आहे ते स्वतः करत राहतील कधीही मागायचे नाही. बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही देणगी जमा करू शकत नाही. हे तर संन्यासी लोक करतात. भक्ती मार्गामध्ये ही, थोडे देतात त्याचा मोबदला एक जन्मासाठी मिळतो. इथे जन्म-जन्मांतरासाठी आहे. तर जन्म-जन्मांतरासाठी सर्व काही देणे चांगले आहे ना. यांचे तर भोळा भंडारी नाव आहे. तुम्ही पुरुषार्थ करा तर विजय माळेमध्ये गुंफले जाऊ शकता, भंडारा भरपूर काळ कंटक दूर होतात. तिथे कधीही अकाळे मृत्यू होत नाही. इथे मनुष्य काळाला किती घाबरतात. थोडे काही झाले तर मृत्यू आठवणीमध्ये येतो. तिथे हा विचारच नाही, तुम्ही अमरपुरी मध्ये जात आहात. हा छी-छी मृत्यू लोक आहे. भारतच अमर लोक होता, आता मृत्युलोक आहे.

तुमचा अर्धाकल्प खूप छी-छी व्यतीत होऊन गेला आहे. खाली घसरत आले आहात. जगन्नाथ पुरी मध्ये खूप खराब चित्र आहेत. बाबा तर अनुभवी आहेत ना. चारी बाजूला फिरले आहेत. गोऱ्या पासून सावळा बनला आहे. गावामध्ये राहणारा होता. खरे पाहता हा संपूर्ण भारत एक गाव आहे. तुम्ही गावातील मुले आहात. आता तुम्ही समजत आहात आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. असे समजू नका आम्ही तर मुंबईमध्ये राहणारे आहोत. मुंबई सुद्धा स्वर्गाच्या समोर काय आहे? काहीच नाही. एक दगडही नाही. आम्ही गावातील मुले अनाथ बनलो आहोत आता परत आम्ही स्वर्गाचे मालक बनत आहोत तर खुशी राहिली पाहिजे. नावच आहे स्वर्ग. किती हिरे-जवाहरात महलांना लावलेले असतात. सोमनाथाचे मंदिर किती हिरे-जवाहरांनी भरले होते. प्रथम शिवाचेच मंदिर बनवले जाते. भारत किती साहुकार होता. आता तर भारत गाव आहे. सतयुगामध्ये खूप मालामाल होता. या गोष्टी दुनियेमध्ये तुमच्या शिवाय कोणीही जाणत नाही. तुम्ही म्हणाल काल आम्ही बादशाह होतो, आज फकीर आहे. नंतर विश्वाचे मालक बनत आहोत. तुम्हा मुलांना आपल्या भाग्यावर आभार मानायला पाहिजेत. आम्ही पदमापदम भाग्यशाली आहोत. अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. विकर्मां पासून वाचण्यासाठी या शरीरामध्ये राहात असताना अशरीरी बनण्याचा पुरूषार्थ करायचा आहे. आठवणीची यात्रा अशी असावी ज्यामुळे शरीराची विस्मृती होऊन जाईल.

2. ज्ञानाचे मंथन करून आस्तिक बनायचे आहे. मुरली कधीही मिस(बुडवायची)करायची नाही. आपल्या प्रगतीसाठी डायरीमध्ये आठवणीचा चार्ट लिहून ठेवायचा आहे.

वरदान:-
ज्ञानरूपी चावी द्वारे भाग्याचा अखूट खजाना प्राप्त करणारे मालामाल भव

संगम युगावर सर्व मुलांना भाग्य बनवण्यासाठी ज्ञानरूपी चावी मिळते. ही चावी लावा आणि जेवढा पाहिजे तेवढा भाग्याचा खजाना घ्या. चावी मिळाली आणि मालामाल बनले. जो जेवढा मालामाल बनतो तेवढी खुशी स्वतःच राहते. जसे की खुशीचा झरा अखूट अविनाशी वाहतच राहतो असा अनुभव होतो. ते सर्व खजाने भरपूर मालामाल दिसतात. त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची अप्राप्ती रहात नाही.

बोधवाक्य:-
बाबांशी कनेक्शन (संबंध)ठीक ठेवा तर सर्व शक्तींचा करंट येत राहील.