28-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- मनापासून बाबा-बाबा म्हणा तर खुशी मधे शहारे येतील, खुशी मधे रहा तर मायाजीत बनाल. "

प्रश्न:-
मुलांना कोणत्या एका गोष्टीमध्ये मेहनत लागते, परंतु खुशी आणि आठवणीचा तोच आधार आहे?

उत्तर:-
आत्म-अभिमानी बनण्या मध्येच मेहनत लागते परंतु यामुळेच खुशीचा पारा चढतो, गोड बाबा आठवणी मध्ये येतात. माया तुम्हाला देह-अभिमाना मध्ये आणत राहील. पहलवाना बरोबर पहलवान होऊन लढेल, यामध्ये गोंधळून जाऊ नका. बाबा म्हणतात मुलांनो मायेच्या वादळांना घाबरू नका, फक्त कर्मेंद्रियांनी कोणतेही विकर्म करू नका.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत किंवा शिकवण देत आहेत. मुले जाणत आहेत शिकवणारा पिता सदैव देही- अभिमानी आहे. तो आहे निराकार, शरीर घेत नाही. पुनर्जन्मा मध्ये येत नाही. बाबा समजावत आहेत तुम्हा मुलांना माझ्या समान स्वतःला आत्मा समजायचे आहे. मी आहे परमपिता. परमपित्याला देह नसतो. त्यांना देही-अभिमानी ही म्हणू शकत नाही. तो तर आहेच निराकार. बाबा म्हणतात मला स्वतःचा देह नाही. तुम्हाला तर देह मिळत आला आहे. आता माझ्या समान देहापासून निराळे होऊन स्वतःला आत्मा समजा. जर विश्वाचे मालक बनवायचे असेल तर अजून कोणती अवघड गोष्ट नाही. बाबा म्हणतात देह- अभिमान सोडून माझ्या समान बना. सदैव बुद्धीमध्ये आठवणीत ठेवा आम्ही आत्मा आहोत, आम्हाला बाबा शिकवत आहेत. बाबा तर निराकार आहेत, परंतु आम्हाला कसे शिकवणार? म्हणून बाबा या शरीरामध्ये येऊन शिकवतात. गौमुख दाखवतात ना. आता गौमुखातून तर गंगा निघू शकत नाही. मातेला ही गोमाता म्हटले जाते. तुम्ही सर्व गाई आहात. हे(ब्रह्मा)तर गाय नाहीत. मुखाद्वारे ज्ञान मिळत आहे. बाबांची गाय तर नाही ना- नंदीवरती स्वारी दाखवतात. ते तर शिव-शंकर एक आहे असे म्हणतात. तुम्ही मुले आता समजत आहात शिव-शंकर एक नाहीत. शिव तर उच्च ते उच्च आहेत नंतर ब्रह्मा, विष्णू, शंकर. ब्रह्मा आहेत सूक्ष्मवतनवासी. तुम्हा मुलांना विचार सागर मंथन करून मुद्दे काढून समजावून सांगावे लागते, आणि निर्भय ही बनायचे आहे. तुम्हा मुलांनाच खुशी आहे. तुम्ही म्हणाल आम्ही ईश्वराचे विद्यार्थी आहोत, आम्हाला बाबा शिकवत आहेत. भगवानुवाच ही आहे- हे मुलांनो, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवण्यासाठी शिकवत आहे. भले कुठेही जात आहात, सेंटरवर जात आहात, बुद्धीमध्ये आहे की बाबा आम्हाला शिकवत आहेत. जे आत्ता आम्ही सेवाकेंद्रावरती ऐकत आहोत, बाबा मुरली चालवत आहेत. बाबा-बाबा करत रहा. ही सुद्धा तुमची यात्रा झाली. योग अक्षर शोभत नाही. मनुष्य अमरनाथ, बद्रीनाथ यात्रा करण्यासाठी पायी जातात. आता तुम्हा मुलांना तर आपल्या घरी जायचे आहे. तुम्ही जाणत आहात आता हे बेहद चे नाटक पूर्ण होत आहे. बाबा आले आहेत आम्हाला लायक बनवून घेऊन जाण्यासाठी. तुम्ही स्वतः म्हणता आम्ही पतित आहोत. पतित थोडेच मुक्ती प्राप्त करतील. बाबा म्हणतात हे आत्म्यांनो तुम्ही पतित बनले आहात. ते शरीराला पतित समजून गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात. आत्म्याला तर ते निर्लेप समजतात. बाबा समजावतात-मुख्य गोष्ट आहेच आत्म्याची. पापात्मा, पुण्यात्मा असे म्हणतात. हे अक्षर चांगल्या प्रकारे आठवणीत ठेवा. समजून घ्या आणि इतरांना समजावून सांगा. तुम्हालाच भाषण इ. करायचे आहे. बाबा तर गावागावांमध्ये, गल्ली-गल्ली मध्ये जाणार नाहीत. तुम्ही घराघरांमध्ये हे चित्र ठेवा. ८४ चे चक्र कसे फिरते. सीढी मध्ये खूप स्पष्ट आहे. आता बाबा म्हणतात-सतोप्रधान बना. आपल्या घरी जायचे आहे, पवित्र बनल्याशिवाय तर घरी जाणार नाही. हीच चिंता लागून राहिली पाहिजे. खूप मुले लिहितात, बाबा आम्हाला खूप वादळ येतात. मनामध्ये खूप खराब विचार येतात. या अगोदर येत नव्हते.

बाबा म्हणतात तुम्ही हा विचार करू नका. अगोदर काय तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये थोडीच होते. आता तुम्हाला बाबांच्या आठवणी मध्ये राहून मायेवर विजय मिळवायचा आहे. वेळो-वेळी हे आठवण करत राहा, याची गाठ बांधा. ज्याप्रमाणे माता गाठ बांधतात, पुरुष लोक तर नोंदवहीमध्ये लिहितात. तुमचा तर हा बैज चांगली निशाणी, खुण आहे. आम्ही राजकुमार बनत आहोत, हे आहे गरीबा पासून राजकुमार बनवण्याचे ईश्वरीय विद्यापीठ. तुम्ही राजकुमार होते ना. श्रीकृष्ण विश्वाचा राजकुमार होता. ज्याप्रमाणे इंग्लंडचा प्रिन्स ऑफ वेल्स(वेल्सचा राजकुमार) असे म्हटले जाते. त्या आहेत हदच्या गोष्टी, राधाकृष्ण तर खूप नावाजलेले आहेत. स्वर्गाचे राजकुमार-राजकुमारी होते ना म्हणून त्यांच्यावर सर्वजण प्रेम करतात. श्रीकृष्णावर तर खूप प्रेम करतात. दोघांवरही करायला पाहिजे. प्रथम तर राधा वर करायला पाहिजे. परंतु मुलावर जास्त प्रेम राहते कारण की तो वारस बनतो. स्त्रीचे ही पति वर खूप प्रेम आहे. पतीसाठी म्हटले जाते हा तुझा गुरु ईश्वर आहे. स्त्रीसाठी असे म्हणत नाहीत. सतयुगामध्ये तर मातांची महिमा आहे. प्रथम लक्ष्मी नंतर नारायण. अंबेचा किती मान ठेवतात. ब्रह्मा ची मुलगी आहे. ब्रह्माचा एवढा मान नाही, ब्रह्माचे मंदिर अजमेर मध्ये आहे. जिथे मेळे इ. भरतात. अंबेच्या मंदिरामध्ये ही मेळा भरतो. खरं तर हे सर्व मेळे मलीन बनवण्यासाठी आहेत. तुमचा हा मेळा स्वच्छ बनण्यासाठी आहे. स्वच्छ बनण्यासाठी तुम्हाला स्वच्छ बाबांची आठवण करायची आहे. पाण्याने काही पाप नष्ट होत नाहीत. गीते मध्येही भगवानुवाच आहे, मनमनाभव. सुरुवात आणि शेवटी हे अक्षरं आहेत. तुम्ही मुले जाणत आहात, आम्हीच सुरुवातीला भक्ती सुरू केली आहे. सतोप्रधान भक्ती नंतर सतो- रजो-तमो भक्ती होते. आता तर पहा दगड माती इ. सर्वांची भक्ती करत राहतात. ही सर्व अंधश्रद्धा आहे. तुम्ही यावेळी संगमावर बसले आहात. हे उलटे झाड आहे ना. बीज वरती आहे. बाबा म्हणतात या मनुष्य सृष्टीचा बीज रचनाकार मी आहे. आता नव्या दुनियेची स्थापना करत आहे. कलम लावतात ना. झाडाची जुनी पाने गळून जातात. नवी-नवी पाने निघतात. आता बाबा देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. अशी खूप पाने आहेत जी मिक्स झाली आहेत. स्वतःला हिंदू म्हणवतात. खरे पाहता हिंदू आदी सनातन देवी-देवता धर्म वाले आहेत. खरे पाहता हिंदुस्तानचे नाव भारत आहे, जिथे देवता राहत होते. इतर कोणत्याही देशाचे नाव बदलत नाही, याचे नाव बदलले आहे. हिंदुस्तान म्हणतात. बौद्ध लोक असे म्हणत नाहीत की आमचा धर्म जापानी किंवा चिनी आहे. ते तर आपल्या धर्माला बौद्ध म्हणतात. तुमच्या मध्ये कोणीही स्वतःला आदी सनातन देवी-देवता धर्माचे म्हणत नाहीत. जर कोणी म्हणाले तर विचारा तो धर्म केंव्हा आणि कोणी स्थापन केला?काहीच सांगू शकणार नाहीत. कल्पाचे आयुष्य लांब-लचक केले आहे, याला म्हणतात अज्ञान अंधार असे म्हटले जाते. एक तर आपल्या धर्माविषयी माहीत नाही दुसरे लक्ष्मी-नारायणाचे राज्य खुप दुर घेउन गेले आहेत म्हणूनच घोर अंधियारा असे म्हटले. ज्ञान आणि अज्ञानामध्ये किती फरक आहे. ज्ञानसागर एक शिवबाबा आहेत. त्यांच्याकडून जसे की एक तांब्या घेतात. फक्त एखाद्याला एवढेच सांगा की शिवबाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. हे तर जसे ओंजळभर पाणी झाले ना. काही तर आंघोळ करतात, काहीजण घागर भरून घेऊन जातात. काहीजण छोटा-छोटा तांब्या घेऊन जातात. रोज एक- एक थेंब मटक्या मध्ये टाकून त्याला ज्ञान जल समजून पितात. विदेशातही वैष्णव लोक गंगाजल घागर भरून घेऊन जातात. नंतर मागवत राहतात. आता हे सर्व पाणी डोंगरामधून येते. वरूनही पाणी पाडतात. आज-काल पहा घरही किती उंच १०० मजल्यापर्यंत बनवत राहतात. सतयुगामध्ये असे होणार नाही. तिथे तर तुम्हाला जमीन एवढी मिळते विचारूच नका. इथे राहण्यासाठी एवढी जमीन नाही, म्हणून एवढे मजले बनवतात. तिथे धान्यही भरपूर पिकते. ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये खूप धान्य झाल्यानंतर जाळून टाकतात. हा मृत्युलोक आहे. तो अमरलोक आहे. अर्धाकल्प तिथे तुम्ही सुखामध्ये राहता. काळ आत मध्ये घुसू शकत नाही. यावर एक कथाही आहे. ही बेहद्द ची गोष्ट आहे. बेहद्द च्या गोष्टींवरून नंतर हद्दच्या कथा बसून बनवल्या आहेत. सुरुवातीला ग्रंथ किती छोटा होता. आता तर किती मोठा केला आहे. शिवबाबा किती छोटे आहेत, त्यांची पण किती मोठी प्रतिमा बनवली आहे. बुद्धाचे चित्र, पांडवांचे चित्र खूप मोठे-मोठे उंच बनवले आहेत. असे तर कुणीच असत नाही. तुम्हा मुलांना तर हे ध्येयाचे, चित्र घराघरांमध्ये ठेवायला पाहिजे. आम्ही शिकून हे बनत आहोत. नंतर रडायला थोडेच पाहिजे. जे रडतात ते गमावतात. देह-अभिमाना मध्ये येतात. तुम्हा मुलांना आत्म- अभिमानी बनायचे आहे, यामध्येच मेहनत लागते. आत्म- अभिमानी बनल्याने खुशीचा पारा चढतो. गोड बाबा आठवणी मध्ये येतात. बाबांकडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत. बाबा आम्हाला या भाग्यशाली रथामध्ये येऊन शिकवत आहेत. रात्रंदिवस बाबा-बाबा आठवण करत राहा. तुम्ही अर्ध्याकल्पाचे आशिक आहात. भक्त भगवानाची आठवण करतात. भक्त अनेक आहेत. ज्ञानामध्ये सर्वजण एक बाबांची आठवण करतात. तोच सर्वांचा पिता आहे. ज्ञानसागर पिता आम्हाला शिकवत आहेत, तुम्हा मुलांना तर अंगावर शहारे यायला पाहिजेत. मायेचे वादळ तर येणारच आहेत. बाबा म्हणतात- सर्वात जास्त वादळ तर माझ्या जवळ येतात कारण सर्वात पुढे मी आहे. माझ्या जवळ येतात तेव्हा तर मी समजू शकतो मुलांच्या जवळ किती येत असतील. गोंधळून जात असतील. अनेक प्रकारचे वादळे येतात जे अज्ञान काळातही कधी आले नसतील, तेही येतात. सुरुवातीला माझ्याजवळ आले पाहिजेत, नाहीतर मी मुलांना कसे समजावणार. हा सर्वात पुढे आहे. पहलवान आहे, तर माया ही पहलवाना बरोबर पहलवान होऊन लढते. मल्लयुद्धामध्ये सर्व एकसारखे नसतात. प्रथम, द्वितीय, तिसरा दर्जा असतो. बाबांच्या जवळ सर्वात जास्त वादळे येतात, म्हणून बाबा म्हणतात या वादळांना घाबरू नका. फक्त कर्म इंद्रियाद्वारे कोणते विकर्म करू नका. काहीजण म्हणतात- ज्ञानामध्ये आलो आहे तर असे का होते, यापेक्षा ज्ञान घेतले नसते तर बरे झाले असते. संकल्प चालले नसते. अरे हे तर युद्ध आहे ना. स्त्री समोर असतानाही पवित्र दृष्टी रहावी, समजायचे आहे शिवबाबांची मुले आम्ही भाऊ- भाऊ आहोत नंतर प्रजापिता ब्रह्मा ची मुले असल्याने भाऊ-बहिण झालो. नंतर विकार कुठून आला. ब्राह्मण उंच शेंडी आहेत. त्यानंतर देवता बनतात तर आम्ही भाऊ-बहीण आहोत. एक बाबांची मुले कुमार-कुमारी आहोत. जर दोघे कुमार कुमारी होऊन राहत नसतील तर नंतर भांडण होते. अबलांवर अत्याचारही होतात. पुरुषही लिहितात आमची स्त्री तर जसे की पुतना आहे. खूप मेहनत आहे. तरुणांना तर खूप मेहनत लागते. आणि जे गंधर्व विवाह करून एकत्र राहतात त्यांची खूप कमाल आहे. त्यांचे खूप उच्च पद असू शकते. परंतु जेव्हा अशी अवस्था धारण होईल. तेंव्हा ज्ञानामध्ये तीव्र जातील. अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. मायेच्या वादळांना घाबरायचे किंवा गोंधळून जायचे नाही. फक्त ध्यान ठेवायचे आहे कर्मेन्द्रिया द्वारे कोणतेही विकर्म व्हायला नको. ज्ञानसागर बाबा आम्हाला शिकवत आहेत, या खुशी मध्ये राहायचे आहे.

2. सतोप्रधान बनण्यासाठी आत्म अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे, ज्ञानाचे विचार सागर मंथन करायचे आहे, आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे.

वरदान:-
श्रेष्ठ पुरुषार्था द्वारे अंतिम परिणामा मध्ये प्रथम क्रमांक घेणारे उडणारे पक्षी भव

अंतिम परिणामा मध्ये प्रथम क्रमांक घेण्यासाठी:-1- मनाच्या अविनाशी वैराग्याद्वारे झालेल्या गोष्टींना, संस्कार रुपी बीजाला जाळून टाका. 2- अमृतवेळेपासून रात्रीपर्यंत ईश्वरीय नियम आणि मर्यादांचे सदैव पालन करण्याचे व्रत घ्या आणि 3- मनसा द्वारे वाणी द्वारे किंवा संबंध संपर्क द्वारे निरंतर महादानी बनून, पुण्यात्मा बनून, दान पुण्य करत रहा. जेव्हा असा श्रेष्ठ उच्च बनवणारा पुरुषार्थ असेल तर उडता पक्षी बनून अंतिम परिणामांमध्ये नंबर एक बनू शकाल.

बोधवाक्य:-
वृत्ती द्वारे वातावरणाला शक्तिशाली बनवणे हाच शेवटचा पुरुषार्थ किंवा सेवा आहे.