09-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुमचा हा वेळ खूप खूप किमती आहे, म्हणून याला व्यर्थ गोष्टीमध्ये घालू
नका, पात्र व्यक्तीला पाहून ज्ञानाचे दान करा"
प्रश्न:-
गुणांची धारणा
होत राहील आणि चलन पण सुधारत राहील याची सहज विधी कोणती आहे?
उत्तर:-
बाबांनी जे समजवले आहे, ते दुसऱ्यांना पण समजावून सांगा, ज्ञानाचे दान करा, तर
गुणांची धारणा पण सहज होत जाईल आणि चलन पण सुधारत राहिल. ज्यांच्या बुद्धीमध्ये हे
ज्ञान राहत नाही, ज्ञानदानाचे दान करत नाहीत, ते कंजूष आहेत. ते स्वतःचे नुकसान करत
राहतात.
गीत:-
बचपन के दिन
भुला ना देना, आज हॅसे कल रुला न देना. .
ओम शांती।
गोडगोड मुलांनी गीत ऐकले, अर्थ तर चांगल्या रीतीने समजला असेल. आम्ही आत्मा आहोत आणि
बेहद पित्याची मुलं आहोत, हे विसरायचं नाही. आत्ता बाबांच्या आठवणीत आनंदित आहेत आणि
आत्ता आठवण विसरल्यामुळे दुःखी होतात. आत्ता जिवंत आहेत, आत्ता मरतात म्हणजेच आत्ता
बेहदच्या पित्याचे बनतात आणि परत शारीरिक परिवाराकडे चालले जातात. तर बाबा म्हणतात,
आज हसत आहात, उद्या रडू नका. हा गीताचा अर्थ झाला.
तुम्ही मुलं जाणतात, सहसा मनुष्य शांती साठीच तीर्थयात्रा करत राहतात. असे नाही की
अनेक ठिकाणी तीर्थयात्रे वरती गेल्यामुळे शांती मिळते. हे एकच संगम युग आहे, जेव्हा
बाबा येऊन समजवतात, प्रथम तर स्वतःला ओळखायला पाहिजे. प्रथम तर स्वता:ला ओळखायचे आहे.
आत्मा शांत स्वरुप आहे. आत्म्याचे राहण्याचे स्थान पण शांतीधाम आहे. येथे कर्म तर
जरूर करावे लागते. जेव्हा आपल्या शांतीधाम मध्ये आहेत, तर शांत आहेत. सतयुगामध्ये
शांती राहते, सुख पण आहे शांती पण आहे. शांतीधामला सुखधाम म्हणनार नाही. जेव्हा सुख
आहे तर, त्याला सुखधाम, जेव्हा दु:ख आहे, तर त्याला दुखधाम म्हणतात. या सर्व गोष्टी
तुम्ही समजत आहात. हे ज्ञान देण्यासाठी, कोणाला सन्मुख समजवले जाते. प्रदर्शनीमध्ये
जेव्हा येतात तर, प्रथम बाबांचा परिचय द्यायला पाहिजे. आत्म्यांचे पिता एकच आहेत,
हे समजले जाते. तेच गीतेचे भगवान आहेत, बाकी सर्व आत्मे आहेत. आत्माच शरीर सोडते आणि
घेते. शरीराचे नाव बदलत राहते परंतु आत्म्याचे नाव बदलत नाही. तर तुम्ही मुलं समजावू
शकतात की, बेहदच्या पित्याकडून सुखाचा वारसा मिळत आहे. बाबा सुखाच्या सृष्टीची
स्थापना करतात. बाबा दुःखाची सृष्टी स्थापन कसे करतील? असे होत नाही. भारतामध्येच
लक्ष्मीनारायणचे राज्य होते, चित्र पण आहेत, तुम्ही सांगा सुखाचा वारसा मिळत आहे.
काही जण म्हणतील, ही तर तुमची कल्पना आहे. तर तुम्ही त्यांना ज्ञान देवू नका. कल्पना
समजणारे काहीच समजू शकणार नाहीत. तुमचा वेळ तर खूप किमती आहे. या दुनियेमध्ये
तुमच्या एवढा किमती वेळ कोणाचा नाही. मोठ्या मनुष्याचा वेळ खूप किमती असतो. बाबांचा
वेळ खूप किमती आहे. बाबा समजावून खूप श्रेष्ठ बनवत आहेत. तर बाबा तुम्हा मुलांना
म्हणतात की, तुम्ही आपला वेळ व्यर्थ घालवू नका. ज्ञान पण पात्र व्यक्तीलाच द्यायला
पाहिजे. पात्र व्यक्तीलाच समजावयाला पाहिजे, सर्व मुलं तर समजू शकणार नाहीत, इतकी
बुद्धी नाही जे समजतील. प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. जोपर्यंत समजत नाहीत
की, परमात्म्याचे पिता शिव आहेत. तर पुढे काहीच समजू शकत नाहीत. खूप स्नेहाने,
नम्रता द्वारे समजावून पाठवायला पाहिजे, कारण असुरी संप्रदाय भांडण करण्यामध्ये
उशीर करत नाहीत. शासन विद्यार्थ्यांची खूप महिमा करत राहते, त्यांच्यासाठी अनेक
सुख-सुविधा करत राहते. कॉलेजचे विद्यार्थीच प्रथम दगड मारायला सुरू करतात, म्हणजे
दंगल करतात. त्यांच्या मध्ये जोश असतो ना. वृध्द किंवा माता तर दगड इतक्या जोरा
मध्ये मारू शकत नाहीत. सहसा विद्यार्थीच दंगल करतात. त्यांनाच लढाईसाठी तयार करतात.
आत्ता बाबा आत्म्यांना समजवतात, तुम्ही उलटे बनले आहात. स्वतःला आत्म्याच्या ऐवजी
शरीर समजतात. आता बाबा तुम्हाला सरळ करत आहेत. रात्रंदिवसाचा फरक होतो. सरळ
झाल्यामुळे तुम्ही विश्वाचे मालक मालक बनतात. आता तुम्ही समजतात, आम्ही अर्धाकल्प
उल्टे होतो. आता बाबा अर्ध्या कल्पासाठी सुल्टे बनवतात. अल्लाह ची मुलं बनतात, तर
विश्वाच्या बादशाहीचा वारसा मिळतो. रावण उल्टे करतात तर कला काय नष्ट होते, परत
अधोगती होत राहते. रामराज्य आणि रावण राज्याला तुम्ही मुलंच जाणतात. तुम्हाला
बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे. जरी शरीर निर्वाहसाठी कर्म पण करायचे आहेत,
तरीही वेळ खूप मिळतो. कोणी जिज्ञासू इत्यादी नाहीत, सेवा नाही तर, बाबांच्या आठवणी
मध्ये बसायला पाहिजे. ती तर अल्पकाळासाठी कमाई आणि तुमची तर नेहमीसाठी कमाई आहे,
यामध्ये लक्ष जास्त द्यावे लागते. माया सारखी सारखी दुसऱ्या विचारात घेऊन जाते. हे
तर होईलच, माया विसरायला लावते. यावरती नाटक पण दाखवतात, प्रभू असे म्हणतात, माया
असे म्हणते. बाबा मुलांना समजवतात, माझीच आठवण करा आणि यामध्येच विघ्न पडतात.
दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये विघ्न पडत नाहीत. पवित्र राहण्यासाठी खूप मार खातात.
भागवत इत्यादींमध्ये या वेळेचे गायन आहे. पुतना, सुर्पनखा पण यावेळेतील गोष्टी आहेत.
जेव्हा बाबा येऊन पवित्र बनवतात. उत्सव इत्यादी जे पण साजरे करतात, जे भूतकाळात
होऊन गेलेले आहेत, त्यांचे सण साजरा करतात. भुतकाळाची महिमा करतात, कारण होऊन गेले
आहेत. जसे ख्रिस्त इत्यादी धर्म स्थापन करण्यासाठी आले. तिथी तारीख पण लिहतात, परत
त्यांचा जन्मदिवस पण साजरा करतात. भक्ती मार्गामध्ये हा धंदा चालतो. सतयुगामध्ये असे
होत नाही. ही दुनियाच नष्ट होते. या गोष्टी तुमच्या मध्ये पण खूप थोडेच समजतात.
बाबांनी समजवले आहे, सर्वांना अंतकाळ परत जायचे आहे. सर्व सोडून चालले जातील.
तुमच्या बुद्धीमध्ये आहे, बाकी थोडे दिवस आहेत. आता परत हे सर्व विनाश होणार आहे.
सतयुगा मध्ये फक्त आम्हीच येऊ. सर्व तर येणार नाहीत, जे कल्पा पूर्वी आले होते, तेच
क्रमानुसार येतील. तेच चांगल्या रीतीने अभ्यास करून शिकत पण आहेत. जे चांगले शिकतात,
तेच परत क्रमानुसार परिवर्तन होतात. तुम्ही पण परिवर्तन होत आहात. तुमची बुद्धी
जाणते कि, जे पण आत्मे आहेत, सर्व क्रमानुसार शांतीधाम मध्ये जाऊन बसतील, परत
क्रमानुसार येत राहतील. बाबा म्हणतात, मुख्य गोष्ट आहे बाबांचा परिचय देणे. आत्म
काय आहे, परमात्मा काय आहे, दुनिया मध्ये कोणीच जाणत नाहीत. जरी गायन करतात भृकुटी
मध्ये अजब तारा चमकतो, बस जास्त काहीच समजत नाहीत. तेही हे ज्ञान खूप थोड्या
मनुष्याच्या बुद्धी मध्ये आहे, सारखे सारखे विसरतात. प्रथम तर हे समजावयचे आहे,
बाबाच पतित पावन आहेत. वारसा पण देतात, सावकार बनवतात. तुमच्याजवळ गीत पण आहे, शेवटी
तो दिवस आला आज, ज्याची भक्ती मार्गामध्ये खूप वाट पाहत होतो. द्वापर पासून भक्ती
सुरू होते, परत अंत काळात बाबा येऊन रस्ता दाखवतात. कयामतची वेळ यालाच म्हटले जाते.
आसुरी बंधनाचा सर्व हिशेब चुक्त करून परत चालले जातात. ८४ जन्माच्या भूमिकेला
तुम्हीच जाणतात. ही भुमिका चालतच राहते. शिवजयंती साजरी करतात, तर जरूर शिव आले
असतील, जरूर काही केले असेल ना. तेच नवीन दुनियेची स्थापना करतात. हे
लक्ष्मीनारायण मालक होते, आत्ता नाहीत. परत बाबा राजयोग शिकवतात, राज योग शिकवला
होता ना. तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणाच्या मुखामध्ये हे ज्ञान येऊ शकणार नाही.
तुम्हीच समजावू शकतात, शिव बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. सो हम हम सो चे उच्चारण
करतात, ते पण चुकीचे आहे. तुम्हाला तर बाबांनी समजवले आहे, तुम्ही चक्र लावून
ब्राह्मण कुळापासून देवता कुळांमध्ये येतात. सो हमचा अर्थ पण तुम्ही समजावू शकतात.
आता आम्ही ब्राह्मण आहोत. हे 84 जन्माचे चक्र आहे, हे काही मंत्र जपण्याचे नाही.
बुद्धीमध्ये अर्थ राहिला पाहिजे. ती पण सेकंदाची गोष्ट आहे. सेकंदांमध्ये सर्व
लक्षात येते. जसे बीज आणि झाडाचे रहस्य पण सेकंदांमध्ये लक्षात येते. आम्ही असे
चक्र लावतो, त्याला स्वदर्शन चक्र पण म्हटले जाते. तुम्ही कोणाला म्हणाल, आम्ही
स्वदर्शन चक्रधारी आहोत, तर कोणी मानणार नाहीत. असे म्हणतील हे तर सर्व पदव्या स्वतः
वरतीच ठेवतात. तुम्ही समजावून सांगाल की, आम्ही ८४जन्म कसे घेतात. हे चक्र फिरत
राहते. आत्म्याला आपल्या 84 जन्माचे दर्शन होते, याला स्वदर्शन चक्रधारी म्हटले जाते.
प्रथम तर ऐकून चमकतात, हे काय थापा मारतात. जेव्हा तुम्ही बाबांचा परिचय द्याल, तर
त्याला थापा वाटणार नाहीत. बाबांची आठवण करतात, गायन पण करतात. बाबा आम्ही आपल्यावर
वारी जाऊ, तुमचीच आठवण करू. बाबा म्हणतात, तुम्हीच म्हणत होते ना, आता परत तुम्हाला
आठवण देतो, नष्टोमोहा बना. या देहापासून पण नष्ट मोहा बना. स्वतःला आत्मा समजून माझी
आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. ही गोड गोष्ट सर्वांना पसंत येईल. बाबांचा
परिचय नसेल तर, परत कोणत्या ना कोणत्या गोष्टी मध्ये संशय येत राहील, म्हणून प्रथम
२-३ चित्र पुढे ठेवा. ज्यामध्ये बाबांचा परिचय असेल. बाबांचा परिचय मिळाल्याने वारसा
पण मिळेल.
बाबा म्हणतात, मी तुम्हाला राजांचा राजा बनवतो. हे चित्र बनवा. दुहेरी मुकुटधारी
राजांच्यापुढे एकेरी मुकुटधारी राजे डोके टेकवतात. तुम्हीच पुज्य, तुम्हीच पुजारीचे
पण रहस्य समजून येईल. प्रथम शिवाची पूजा करतात, परत आपल्या चित्राची बसून पूजा
करतात. ते पावन होऊन गेले आहेत, त्यांचे चित्र बनवून पूजा करतात. हे पण तुम्हाला
आत्ता ज्ञान मिळाले आहे. आता तर भगवंतासाठी म्हणतात की, तुम्हीच पूज्य तुम्हीच
पुजारी. आता तुम्हाला समजले आहे की, तुम्ही या चक्रामध्ये येतात. बुद्धीमध्ये हे
ज्ञान नेहमी राहते आणि परत समजावून सांगायचे पण आहे. ज्ञान दिल्यानंतर ते नष्ट होत
नाही, जे धन दान करत नाहीत, त्यांना कंजूस म्हटले जाते. बाबांनी जे समजावले आहे, ते
परत दुसऱ्यांना समजून सांगायचे आहे. तुम्ही ज्ञान समजावून सांगणार नाही तर, स्वतःचे
नुकसान होईल. दैवी गुणांची धारणा पण होणार नाही. चलन पण अशीच होऊन जाईल. प्रत्येकजण
स्वतःला तर समजू शकतो ना. तुम्हाला आता समज मिळाली आहे, बाकी सर्व बेसमज आहेत.
तुम्ही सर्व काही जाणतात. बाबा म्हणतात या किनार्यावर दैवी संप्रदाय, तर त्या
किनार्यावर आसुरी संप्रदाय आहेत. बुद्धी द्वारे तुम्ही जाणतात, आम्ही संगमयुगी
आहोत. एकाच घरामध्ये एक संगमयुगाचे तर दुसरे कलियुगाचे, दोन्ही एकत्र राहतात. असे
पाहिले जाते, हंस बनण्याचे लायक नाहीतर युक्ती केली जाते. नाही तर विघ्न आणतात.
तुम्हाला आपल्यासारखे बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. नाहीतर तंग करत राहतात, परत
युक्तीने किनारा करावा लागतो. विघ्न पण येतील. असे ज्ञान तुम्हीच देऊ शकतात. गोड पण
खूप बनायचे आहे. नष्टोमोहा पण बनायचे आहे. एका विकाराला सोडले तर, परत दुसरे विकार
खिट खिट करतात. असे समजले जाते जे काही होते, ते कल्पा पूर्वी सारखेच होत आहे, असे
समजून शांत राहायचे आहे. ही पण भावी समजली जाते. चांगल्यात चांगली समजवणारे, मुलंपण
विकारांमध्ये जातात. खूप जोरांमध्ये आघात होतो, परत म्हटले जाते कल्पापूर्वी पण
असेच झाले असेल. प्रत्येक जण स्वतःला समजू शकतात. परत बाबांना लिहतात, आम्हाला
क्रोध आला, अमक्याला आम्ही मारले, ही चूक झाली. बाबा समजवतात, जेवढे शक्य होईल तेवढे
नियंत्रण करा. अनेक प्रकारचे मनुष्य आहेत, आबलावरती खूप अत्याचार करतात. पुरुष तर
बलवान असतात, स्त्रिया तर निर्बल असतात. बाबा परत तुम्हाला, ही गुप्त लढाई शिकवतात,
ज्याद्वारे तुम्ही रावणावर विजय मिळवतात. ही लढाई कोणाच्या बुद्धीमध्ये नाही.
तुमच्या मध्ये पण क्रमानुसर आहेत, जे समजू शकतात. ही तर बिल्कुल नवीन गोष्ट आहे. आता
तुम्ही सुखधामसाठी शिकत आहात. हे पण आत्ता आठवणीत आहे, परत विसरून जाते. मुख्य
गोष्ट आठवणी ची यात्रा आहे. आठवणी द्वारे आम्ही पावन बनू, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती, मातापिता, बापदादाची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) काही पण
होते तर, भावी समजून शांत राहायचे आहे. क्रोध करायचा नाही, जेवढे शक्य होईल, तेवढे
स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आहे. युक्ती द्वारे आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करायचा
आहे.
(२) खूप स्नेह आणि
नम्रता द्वारे सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. सर्वांना ही गोड गोड गोष्ट ऐकवा
की, बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. या देहापासून नष्टोमोहा बना.
वरदान:-
नम्रताच्या
कवच द्वारे व्यर्थ च्या रावणाला जाळणारे, खरे स्नेही भव.
कोणी कितीही तुमच्या
संघठनां मध्ये कमी शोधण्याचा प्रयत्न करतील, परंतु जरा पण संस्कार स्वभावाची टक्कर
दिसून यायला नको. जर कोणी निंदा करतात, शिव्या देतात, अपमान करतात तरीही तुम्ही संत
बना. जर कोणी चुकीचे करतात, तर तुम्ही बरोबर रहा. कोणी टक्कर घेतात, तर तुम्ही
त्याला स्नेहाचे पाणी द्या. हे का, असे का, हे विचार करून अग्नीमध्ये तेल घालू नका.
नम्रताचे कवच परिधान करा. जेथे नम्रता असेल, तेथे स्नेह आणि सहयोग पण आवश्य असेल.
बोधवाक्य:-
माझ्या पणाच्या
अनेक हदच्या भावना, एक "माझे बाबा" मध्ये सामवून द्या.