18-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, आता तुम्ही सत्य बाबा द्वारे, सत्य देवता बनत आहात, त्यामुळे सतयुगामध्ये
सत्संग करण्याची गरज नाही.
प्रश्न:-
सतयुगा मध्ये
देवता कडून कोणते पण विकर्म होत नाही, कां?
उत्तर:-
कारण त्यांना सत्य बाबा चे वरदान मिळाले आहे. विकर्म तेंव्हा होते, जेंव्हा रावणाचा
शाप मिळू लागतो. सतयुग त्रेता मध्ये सद्गती आहे, त्यावेळी दुर्गती चे नाव नसते,
विकारच नसतात, त्यामुळे विकर्म होत नाहीत. द्वापार कलियुगा मध्ये सर्वांची दुर्गती
होते, त्यामुळे विकर्म होत राहतात. ही पण समजण्याची गोष्ट आहे.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांसाठी बाबा समजावत आहेत, हे सर्वोच्च पिता पण आहेत, सर्वोच्च
शिक्षक पण आहेत, सर्वोच्च सद्गुरु पण आहेत. बाबाची अशी महिमा सांगितल्याने आपोआपच
सिद्ध होते कि, कृष्ण कोणाचा पिता होऊ शकत नाही, ते तर लहान मुलगा, सतयुगाचे
राजकुमार आहेत. ते शिक्षक पण होऊ शकत नाही, स्वतः शिक्षकाकडून शिकत आहेत. गुरु तर
तेथे असतच नाही, कारण तेथे सर्व सद्गती मध्ये आहेत. अर्धा कल्प सद्गती आहे, अर्धा
कल्प दुर्गती आहे. तर तेथे सद्गती आहे, त्यामुळे तेथे या ज्ञानाची गरजच राहत नाही.
सद्गती हे नावच नसते, कारण ज्ञानामुळे एकवीस जन्मासाठी सद्गती मिळते.व्दापार पासून
कलियुगाच्या अंतापर्यंत दुर्गती होते. तर कृष्ण मग व्दापार मध्ये कसे येऊ शकतील. हे
पण कोणाच्या लक्षात येत नाही. प्रत्येक गोष्टीं मध्ये खूप रहस्य भरलेले आहे, जे
समजणे फार जरुरीचे आहे. ते सर्वोच्च पिता, सर्वोच्च शिक्षक आहेत. इंग्रजीमध्ये
सुप्रीम असे म्हटले जाते. इंग्रजी अक्षर कांही चांगली आहेत. जसे ड्रामा अक्षर आहे.
ड्रामा नाटकाला म्हणत नाहीत. नाटकांमध्ये तर अदली बदली होते. हे सृष्टीचे चक्र फिरत
आहे असे म्हणतात, पण परंतु कसे फिरते,हुबेहूब फिरत आहे कां, कांही बदल होत आहे. हे
कोणाला पण माहीत नाही. म्हणतात पण कि, बनलेले परत बनत आहे. . . . जरूर कोणता खेळ आहे,
जो परत चक्कर मारत आहे. या चक्रामध्ये मनुष्याला पण चक्कर मारावी लागते. बरे, या
चक्राचे आयुष्य किती आहे? कशी पुनरावृत्ती होते ? याला फिरण्यासाठी किती वेळ लागतो
? हे कोणी जाणत नाहीत. इस्लामी, बौध्दी इ. सर्व घराणी आहेत, ज्यांची विश्व
नाटकांमध्ये भूमिका आहे.
तुम्हां ब्राह्मणांची राजधानी नाही. हे ब्राह्मणाचे कुळ आहे. सर्वोच्च ब्राह्मण कुळ
म्हटले जाते. देवी-देवतांचे पण कुळ आहे. हे तर समजणे फार सोपे आहे. सूक्ष्मवतन मध्ये
फरिश्ते राहतात. तिथे हाडा मासाचे शरीर नसते. देवतांना पण हाडा मासाचे शरीर आहे.
ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. विष्णुच्या नाभि कमळ मधून ब्रम्हाला कां
दाखवले आहे? सूक्ष्मवतन मध्ये तर या गोष्टी असत नाहीत. ना जवाहरात इत्यादी असते.
त्यामुळे ब्रम्हाला पांढऱ्या पोशाखा मध्ये ब्राह्मण दाखवले आहे. ब्रह्मा साधारण
मनुष्य, फार जन्माच्या अंत काळा मध्ये गरीब झाले आहेत ना. यावेळी खादीचे कपडे आहेत.
ते बिचारे समजत नाहीत कि, सूक्ष्म शरीर काय असते. तुम्हाला बाबा समजावत आहेत, तिथे
फरिश्तेच आहेत, ज्यांना हाडामांसाचे शरीर नसते. सूक्ष्मवतन मध्ये तर हे श्रंगार
इत्यादी असत नाहीत. परंतु चित्रांमध्ये दाखवतात, त्यामुळे बाबा त्यांचा पण
साक्षात्कार करवितात, मग अर्थ समजावत आहेत. जसे हनुमानाचा साक्षात्कार करवितात,
परंतु हनुमाना सारखा कोणी मनुष्य असत नाही. भक्ती मार्गामध्ये अनेक प्रकारची चित्रे
बनविली आहेत. ज्यांचा त्यावर विश्वास बसतो, त्यांना असे कांही सांगितले तर बिघडून
जातात. देवता इत्यादींची किती पूजा करतात, मग पाण्यात बुडून टाकतात. हा सर्व
भक्तिमार्ग आहे. भक्तिमार्गाच्या दलदलीमध्ये गळ्यापर्यंत बुडाले आहेत, तर मग बाहेर
कसे काढायचे. बाहेर काढणे पण अवघड होऊन जाते. कोणी कोणी तर इतरांना काढण्यासाठी
निमित्त बनतात, परंतु स्वतः बुडून जातात. स्वतः गळ्यापर्यंत दलदलीमध्ये फसलेले आहेत,
म्हणजे काम विकारांमध्ये अडकलेले आहेत. ही सर्वात मोठी दलदल आहे. सतयुगा मध्ये या
गोष्टी असत नाहीत. आता तुम्ही सत्य पित्या द्वारे सत्य देवता बनत आहात. मग तेथे
सत्संग असत नाहीत. सत्संग येथे भक्ती मार्गामध्ये करतात, समजतात ही सर्व ईश्वराची
रूपे आहेत. कांही पण समजत नाहीत. बाबा समजावत आहेत कि, कलियुगा मध्ये सर्व पापआत्मे
आहेत, सतयुगा मध्ये पुण्य आत्मे असतात. रात्रंदिवसा चा फरक आहे. आता तुम्ही
संगमयुगावर आहात. कलियुग आणि सतयुग दोघाला जाणत आहात. मूळ गोष्ट या तीरावरून त्या
तीराकडे जाण्याची आहे. क्षिरसागर आणि विषय सागराचे गायन आहे. परंतु अर्थ कांही समजत
नाहीत. आता बाबा कर्म आणि अकर्माचे रहस्य सांगत आहेत. कर्म तर मनुष्य करतातच, मग
कोणाचे कर्म अकर्म होत आहे, कोणाचे विकर्म होत आहे. रावण राज्यांमध्ये सर्व कर्म,
विकर्म होऊन जातात. सतयुगा मध्ये विकर्म होत नाहीत. कारण तिथे रामराज्य आहे. बाबा
कडून वरदान मिळालेले आहे. रावण श्राप देतात. हा सुख आणि दुःखा चा खेळ आहे.
दुःखामध्ये सर्व बाबांची आठवण करतात, सुखामध्ये कोणी आठवण करत नाहीत. तेथे विकार
नसतात. मुलांना समजावले आहे कि, आता कलम लावले जात आहे. हे कलम लावण्याची प्रथा पण
आताच सुरू झाली आहे. बाबांनी हे कलम लावणे सुरू केले आहे. पूर्वी जेव्हा इंग्रज
सरकार होते, तेव्हा कधी वर्तमानपत्रां मध्ये येत नव्हते कि, झाडांचे कलम लावत आहेत.
आता बाबा देवी-देवता धर्माचे कलम लावत आहेत. आणखीन कोणी कलम लावत नाहीत. अनेक धर्म
आहेत. देवी देवता धर्म प्राय:लोप झाला आहे. धर्मभ्रष्ट, कर्म भ्रष्ट झाल्यामुळे नाव
पण उलटे सुलटे ठेवले आहेत. जे देवी-देवता धर्माचे आहेत, त्यांना परत त्याच
देवी-देवता धर्मांमध्ये यायचे आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये जायचे आहे.
ख्रिश्चन धर्मातून निघून मग देवी-देवता धर्मांमध्ये येऊ शकत नाहीत, मुक्त तर होऊ
शकत नाहीत. होय, कोणी देवी-देवता धर्माचे, धर्मांतर करून ख्रिश्चन धर्मा मध्ये गेला
असेल, तर तो परत आपल्या देवी-देवता धर्मामध्ये येईल. त्याला हे ज्ञान आणि योग फार
आवडेल, त्यामुळे सिद्ध होते कि, तो आपल्या धर्मातील आहे. यामध्ये फार विशाल बुद्धी
पाहिजे. समजणे आणि समजावून सांगण्याची धारणा करायची आहे. पुस्तक वाचून सांगायचे नाही.
जसे कोणी गीता सांगतात. मनुष्य बसून ऐकतात. कोणी तर गीताचे श्लोक एकदम तोंड पाठ
करतात. बाकी तर त्यांचा अर्थ, प्रत्येक जण आपापला बसून काढत राहतात. श्लोक सारे
संस्कृत मध्ये आहेत. इथे तर महिमा आहे कि, समुद्राला शाई बनवा, सारे जंगल कलम बनवा,
तरी पण ज्ञानाचा अंत होत नाही. गीता तर फार छोटी आहे. 18 अध्याय आहेत. एवढी लहान
गीता बनवून गळ्यामध्ये घालतात. फार लहान अक्षर आहेत. गळ्यामध्ये घालण्याची पण सवय
पडते. किती लहान लॉकेट बनवतात. खरेतर सेकंदाची गोष्ट आहे. बाबाचे बनले तर जसे की
विश्वाचे मालक बनले. बाबा मी तुमचा एक दिवसाचा मुलगा आहे, असे पण लिहणे सुरू करतात.
एका दिवसां मध्ये निश्चय झाला आणि झटक्यात पत्र लिहितात. मुलगा झाला तर विश्वाचा
मालक झाला. हे पण कोणाच्या बुद्धीमध्ये मुश्किलीने बसते. तुम्ही विश्वाचे मालक बनत
आहात ना. तिथे आणखीन कोणता खंड असत नाही. नाव निशाण नाहीसे होऊन जाते. कोणाला पण
माहित नाही कि, हा खंड होता. जर माहीत असते तर जरूर त्याचा इतिहास भूगोल पाहिजे.
तिथे ते असतच नाहीत, त्यामुळे म्हटले जाते, तुम्ही विश्वाचे मालक बनणारे आहात. बाबा
ने सांगितले आहे, मी तुमचा पिता पण आहे, ज्ञानाचा सागर आहे. हे तर फार सर्वोच्च
ज्ञान आहे. ज्यामुळे आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. आमचे बाबा सर्वोच्च आहेत, सत्य
पिता, सत्य टीचर आहेत, सत्य सांगत आहेत.बेहदचे शिक्षण देत आहेत. बेहदचे गुरु आहेत.
सर्वांची सद्गती करत आहेत. एकाची महिमा केली तर मग ती महिमा दुसऱ्याची होऊ शकत नाही.
जेंव्हा ते आपल्यासारखे इतरांना बनवतील, तेंव्हा होऊ शकेल. तर तुम्ही पण पतित पावन
आहात. सत्य नाव लिहित आहेत. पतित पावन गंगा या माता आहेत. शिवशक्ती म्हणा किंवा
शिववंशी म्हणा. शिव वंशी ब्रह्माकुमार कुमारी. शिववंशी तर सर्व आहेत. बाकी ब्रम्हा
द्वारे रचना रचत आहेत, तर संगमयुगावरच ब्रह्माकुमार कुमारी बनतात. ब्रम्हा द्वारे
दत्तक घेत आहेत. पहिल्या प्रथम ब्रह्माकुमार कुमारी असतात. कोणी जरी शंका घेतली तर
त्यांना सांगा, हे प्रजापिता आहेत, यांच्या मध्ये प्रवेश करतात. बाबा म्हणतात अनेक
जन्मातील शेवटच्या जन्मांमध्ये प्रवेश करत आहे. दाखवतात की विष्णूच्या नाभी मधून
ब्रह्मा निघाले. बरं, मग विष्णू कोणाच्या नाभी मधून निघाले?
त्यांना बाणाची निशाणी देऊ शकतात. दोघे एकमेकातुन निघतात. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू
सो ब्रह्मा. हे त्यांच्यातून,ते त्यांच्यातून निर्माण होत आहेत. यासाठी एक सेकंद
लागतो. विष्णूला पाच हजार वर्षे लागतात. या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. तुम्ही सांगू
शकता, बाबा म्हणतात कि, लक्ष्मीनारायण 84 जन्म घेतात. मग त्यांच्याच अनेक जन्मातील,
शेवटच्या जन्मा मध्ये मी प्रवेश करून, असे बनत आहे. समजून घेण्याची गोष्ट आहे ना.
समजून घ्या कि, यांना ब्रह्मा कां म्हटले जाते. साऱ्या दुनियेला दाखवण्यासाठी हे
चित्र बनविले आहेत. आम्ही समजावू शकतो. समजून घेणारे समजतील, न समजून घेणाऱ्या साठी
म्हटले जाते कि, हे आमच्या कुळाचे नाहीत. बिचारा जरी स्वर्गात आला, तरी प्रजे मध्ये
येईल. आमच्या साठी तर सर्व बिचारे आहेत ना. गरीबांना बिचारा म्हटले जाते. किती
ज्ञान मुद्दे मुलांना धारण करावयाचे आहेत. विषयावर भाषण करावे लागते. हे विषय कांही
कमी नाहीत. प्रजापिता ब्रह्मा आणि सरस्वती, चार भुजा दाखवतात. दोन भुजा मुलीच्या
आहेत. युगल तर नाहीत. युगल तर खरे विष्णूच आहेत. ब्रह्मा ची मुलगी सरस्वती आहे.
शंकराला पण युगल नाही. त्यामुळे शिवशंकर म्हटले जाते. आता शंकर काय करत आहेत? विनाश
तर ऑटोमिक बॉब्स द्वारे होतो.बाबा कसे मुलांचा मृत्यू करतील, हे तर पाप होऊन जाईल.
बाबा तर सर्वांना शांतीधामला परत घेऊन जात आहेत, कोणते पण कष्ट नाही. हिसाब किताब
चुकतू करून, सर्व घरी जातात, कारण विनाशाची वेळ आहे. बाबा सेवा करण्यासाठी येतात.
सर्वांना सद्गती देत आहेत, तुम्ही पण अगोदर गतीमध्ये नंतर सद्गती मध्ये जाता. या
गोष्टी समजण्याच्या आहेत. या गोष्टीला कोणी थोडे पण समजत नाहीत. तुम्ही पाहता कि,
कोणी तर फार डोके खातात, का़ही समजत नाहीत. जे कोणी चांगले समजणारे असतील, ते येऊन
समजतील, त्यांना सांगा, एक एक गोष्ट समजायची असेल, तर वेळ द्या. इथे तर आदेश आहे
कि, सर्वांना बाबाचा परिचय द्या. हे आहेच काट्याचे जंगल, कारण एक दोघाला दुःख देत
आहेत. याला दुखधाम म्हटले जाते. सतयुग सुखधाम आहे. दुख:धाम पासून सुखधाम कसे बनत आहे,
हे तुम्हाला समजावत आहेत. लक्ष्मी नारायण सुखधाम मध्ये होते, मग ते 84 जन्म घेऊन
दु:खधाम मध्ये आले आहेत. हे ब्रह्मा चे नाव पण कसे ठेवले, बाबा म्हणतात, मी
त्यांच्या मध्ये प्रवेश करून, बेहदचा संन्यास करवीत आहे. झटक्यात संन्यास करवीत आहे,
कारण बाबाला सेवा करायची आहे, तेच करत आहेत. यांच्या नंतर तर अनेक जण निघाले,
त्यांचे नाव ब्रह्मा ठेवले. ते लोक मग मांजराची पिल्ले दाखवत आहेत. त्या सर्व दंतकथा
आहेत. मांजराची पिल्ले कशी होऊ शकतात. मांजर थोडेच बसून ज्ञान ऐकेल. बाबा युक्त्या
फार सांगत आहेत. कोणती गोष्ट कोणाला समजत नसेल, तर त्यांना सांगा, जोपर्यंत बाबाला
समजले नाहीत, तर आणखीन काहींही समजू शकणार नाहीत. एका गोष्टीवर निश्चय करा, आणि लिहा.
नाहीतर विसरून जाल. माया विसरून टाकते. मुख्य गोष्ट आहे बाबा चा परिचय देणे. आमचे
बाबा, सर्वोच्च पिता, सर्वोच्च शिक्षक आहेत. जे साऱ्या विश्वाच्या आदि मध्य अंताचे
रहस्य समजावत आहेत. ज्याची कोणाला माहिती नाही, हे समजावून सांगण्यासाठी वेळ पाहिजे.
जोपर्यंत बाबाला समजले नाहीत, तोपर्यंत प्रश्न निर्माण करत राहतील. बाबाला नाही
समजले तर बादशाहीला पण समजणार नाहीत. फुकट संशय घेत राहतात, असे कां, शास्त्रांमध्ये
तर असे सांगितले आहे, त्यामुळे अगोदर सर्वांना बाबा चा परिचय द्या. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति, मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) कर्म
अकर्म आणि विकर्माच्या गुह्य गतीला बुद्धीमध्ये ठेवून, आता कोणते विकर्म करायचे नाही.
ज्ञान आणि योगाची धारणा करून, दुसऱ्याला सांगायचे आहे.
(२) सत्य बाबाचे, सत्य ज्ञान देऊन, मनुष्याला देवता बनविण्याची सेवा करायची आहे.
विकाराच्या दलदली मधून सर्वांना बाहेर काढायचे आहे.
वरदान:-
आपल्या
शक्तिशाली स्थिती द्वारे मन्सा सेवेचे प्रमाणपत्र प्राप्त करणारे, स्व अभ्यासी भव.
विश्वाला
प्रकाश आणि शक्तीचे वरदान देण्यासाठी, अमृतवेळेला आठवणीच्या, स्व अभ्यासाद्वारे,
शक्तिशाली वातावरण बनवा. तेव्हाच मन्सा सेवेचे प्रमाणपत्र प्राप्त होईल. शेवटच्या
वेळी मन्सा द्वारेच नजरे द्वारे शांत करण्याची, आपल्या वृती द्वारे, त्यांच्या
वृत्तीला बदलण्याची सेवा करायची आहे. आपल्या श्रेष्ठ स्मृती द्वारे, सर्वांना समर्थ
बनवा. जेंव्हा असा प्रकाश आणि शक्ती देण्याचा अभ्यास कराल, तेंव्हाच निर्विघ्न
वातावरण बनेल, आणि हा किल्ला मजबूत होईल.
बोधवाक्य:-
समजदार तो आहे,
जो मन्सा वाचा कर्मणा, तिन्ही सेवा एकत्र करतो.