25-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, उच्च ते उच्चपद प्राप्त करायचे असेल तर आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहा- ही आत्मिक फाशी आहे, बुद्धी आपल्या परमधाम घरामध्ये लटकून राहावी"

प्रश्न:-
ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होत नाही, त्यांची लक्षणं काय असतील?

उत्तर:-
ते छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये नाराज होत राहतील. ज्याच्या बुद्धीमध्ये जेवढे ज्ञान धारण होईल, तेवढी खुशी राहील. बुद्धी मध्ये जर हे ज्ञान राहिले की आता दुनियेला खाली जायचंच आहे, यामध्ये नुकसानच होणार आहे, तर कधीही नाराज होणार नाहीत. सदैव खुशीमधे राहतील.

ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलां प्रती आत्मिक पिता बसून समजावत आहेत. मुले समजतात उच्च ते उच्च भगवान असे म्हटले जाते. आत्म्याचा बुद्धी योग घराकडे जायला पाहिजे. परंतु ज्याच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट येईल, असा एकही मनुष्य दुनियेमध्ये नाही. संन्यासी लोकही ब्रह्मतत्वाला घर समजत नाहीत ते तर म्हणतात आम्ही ब्रह्म मध्ये लीन होऊन जाऊ तर घर थोडीच झाले. घरामध्ये थांबावे लागते. तुम्हा मुलांची बुद्धी तिथे राहायला पाहिजे. ज्याप्रमाणे काहीजण फाशी वर चढतात ना-तुम्ही आता आत्मिक फाशीवर चढलेले आहात. मनामध्ये आहे आम्हाला उच्च ते उच्च पिता येऊन उच्च ते उच्च घरामध्ये घेऊन जात आहेत. आता आम्हाला घरी जायचे आहे. उच्च ते उच्च बाबा आम्हाला पुन्हा उच्च पदाची प्राप्ती करवत आहेत. रावण राज्यांमध्ये सर्व कनिष्ठ आहेत. ते उच्च, हे कनिष्ठ. त्यांना उच्च बद्दल माहितीच नाही. जे उच्च आहेत त्यांनाही कनिष्ठ बद्दल काहीच माहित नसते. आता तुम्ही समजत आहात उच्च ते उच्च भगवानालाच म्हटले जाते. बुद्धी वरती निघून जाते. तो तर परमधाम मध्ये राहणारा आहे. आम्ही आत्मे परमधाम चे राहणारे आहोत, हे कोणीही समजू शकत नाही. इथे फक्त अभिनय करण्यासाठी येतो. हे कोणाच्याही लक्षात राहत नाही. आपल्याच काम धंद्यामध्ये मध्ये व्यस्त राहतात. आता बाबा समजावत आहेत उच्च ते उच्च तेव्हाच बनाल जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहाल. आठवणीनेच उच्च पद मिळणार आहे. तुम्हाला जे ज्ञान दिले जाते, ते विसरायचे नाही. छोटी मुले सुद्धा वर्णन करू शकतात. बाकी योगाची गोष्ट मुले समजू शकणार नाहीत. खूप मुले आहेत जे आठवणीच्या यात्रेला योग्यरितीने समजू शकत नाहीत. आम्ही किती उंच जात आहे. मूलवतन, सूक्ष्म वतन, स्थूलवतन. . . . पाच तत्व इथे आहेत. सूक्ष्मवतन, मुलवतन मध्ये हे नसतात. हे ज्ञान बाबा देतात म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर असे म्हटले जाते. मनुष्य समजतात, खूप शास्त्र इ. वाचणे म्हणजे ज्ञान आहे. किती पैसे कमावतात. शास्त्र वाचणाऱ्यांना किती मान मिळतो. परंतु आता तुम्ही समजत आहात यामध्ये कोणताही मोठेपणा नाही. उच्च ते उच्च एक भगवान आहेत. त्यांच्याद्वारे आम्ही उच्च ते उच्च स्वर्गामध्ये राज्य करणारे बनत आहोत. स्वर्ग काय आहे, नर्क काय आहे?84 चे चक्र कसे फिरते?हे तुमच्याशिवाय या सृष्टी मध्ये कोणीही जाणत नाही, या सर्व कल्पना आहेत असे म्हणतात. अशा लोकांसाठी समजून घ्यायचे-हे आमच्या कुळातले नाहीत. कधीही नाराज व्हायचे नाही. समजून घ्यायचे-यांची भुमिकाच नाही, तर काहीही समजू शकणार नाहीत. आता तुम्हा मुलांची मान खूप उंच आहे. जेव्हा तुम्ही उच्च दुनियेमध्ये असाल तेव्हा कनिष्ठ दुनिये बद्दल तुम्हाला काहीच माहित नसेल. कनिष्ठ दुनिया निवासी उच्च दुनिया निवासी बद्दल काहीच जाणत नाहीत. त्याला स्वर्ग म्हटले जाते. परदेशातले लोक स्वर्गामध्ये जात नाहीत तरीही नाव घेतात, हेविन, पैराडाईज होता असे म्हणतात. मुसलमान लोकही बहिश्त म्हणतात. परंतु तिथे जायचे कसे हे कोणालाही माहित नाही. आता तुम्हाला किती समज मिळत आहे, उच्च ते उच्च पिता किती ज्ञान देत आहेत. हे नाटक कसे आश्चर्यकारक बनले आहे. जे नाटकाच्या रहस्याला समजत नाहीत ते कल्पना आहे असे म्हणतात.

तुम्ही मुले जाणत आहात, ही तर पतित दुनिया आहे म्हणून बोलावतात-हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. बाबा म्हणतात प्रत्येक पाचहजार वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होतो. जुन्या दुनियेला नवीन बनवण्यासाठी मला यावे लागते. कल्प-कल्प येऊन तुम्हा मुलांना उच्च ते उच्च बनवतो. पावन ला उच्च आणि पतीतला कनिष्ठ असे म्हटले जाते. हीच दुनिया नवी पावन होती, आता तर पतित आहे. या गोष्टी तुमच्या मध्ये ही क्रमवार आहेत ज्यांना समजतात. ज्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी राहतात, ते सदैव खुश राहतात. बुद्धीमध्ये नसेल तर कोणी काही म्हणाले, काही नुकसान झाले तर नाराज होऊन जातात. बाबा म्हणतात आता या नीच दुनियेचा अंत होणार आहे. ही जुनी दुनिया आहे. मनुष्य किती कनिठ बनला आहे. परंतु आम्ही कनिष्ठ आहोत असे थोडेच समजतात. भक्त लोक नेहमी माथा टेकतात. जे पवित्र आहेत त्यांच्यासमोर माथा टेकवा लागतो. सतयुगामध्ये कधी असे होत नाही. भक्त लोकच असे करतात. मान खाली घालून चाला, असे बाबा म्हणत नाहीत. नाही, हे तर शिक्षण आहे. ईश्वर पित्याच्या विद्यापीठांमध्ये तुम्ही शिकत आहात. तर किती नशा असायला पाहिजे. असे व्हायला नको, फक्त विद्यापीठांमध्ये नशा राहील, घरी आल्यानंतर उतरेल. घरामध्ये नशा राहायला पाहिजे. इथे तर तुम्ही मुले जाणत आहात शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. हे तर म्हणतात की मी थोडीच ज्ञानाचा सागर आहे. हे बाबासुद्धा ज्ञानाचे सागर नाहीत. सागरा मधून नदी निघते ना. सागर तर एक आहे, ब्रह्मपुत्रा सर्वात मोठी नदी आहे. खूप मोठे जहाजं येतात. नद्या तर बाहेरही खुप आहेत. पतितपावनी गंगा असे फक्त इथेच म्हटले जाते. बाहेर कुठेही नदीला असे म्हणत नाहीत. पतित पावनी नदी आहे तर मग गुरुची काही गरज नाही. नद्यांमध्ये, तलावामध्ये किती भटकतात. काही ठिकाणी तलाव इतके खराब असतात, विचारूच नका. त्याची माती अंगाला लावतात. आता लक्षात आले आहे-हे सर्व खाली उतरण्याचे मार्ग आहेत. ते लोक किती प्रेमाने जातात. आता तुम्ही समजत आहात त्या ज्ञानामुळे आमचे डोळे उघडले आहेत. तुमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला आहे. आत्म्याला तिसरा नेत्र मिळाला आहे म्हणून त्रिकालदर्शी असे म्हणतात. तिन्ही काळाचे ज्ञान आत्म्यामध्ये येते. आत्मा तर बिंदू आहे, त्याला डोळे कसे असतील. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने तुम्ही त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ बनत आहात. नास्तिक पासून आस्तिक बनत आहात. अगोदर तुम्ही रचनाकार आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नव्हते. आता बाबांच्या द्वारे रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणल्याने तुम्हाला वारसा मिळत आहे. हे ज्ञान आहे ना. इतिहास भूगोल ही आहे, हिसाब-किताब ही आहे ना. चांगला हुशार मुलगा असेल तर हिशेब करेल आम्ही किती जन्म घेतले आहेत, या हिशोबाने इतर धर्माचे किती जन्म घेत असतील. परंतु बाबा म्हणतात या सर्व गोष्टींमध्ये जास्त डोके चालवण्याची गरज नाही. वेळ वाया जाईल. इथे सर्व विसरायचे आहे. हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही तर रचनाकार पित्याची ओळख करून देता, ज्याला कोणीही जाणत नाही. शिवबाबा भारतामध्येच येतात. अवश्य काहीतरी करून जातात म्हणून तर जयंती साजरी केली जाते. गांधी किंवा कुणी साधू होऊन गेले आहेत त्यांचे पोस्टाचे तिकीट बनवत राहतात. कुटुंब नियोजनाचे पण बनवतात. आता तुम्हाला तर नशा आहे- आम्ही तर पांडव शासन आहोत. सर्वशक्तिमान पित्यांचे शासन आहे. तुमची ही ओळखण्याची निशाणी आहे. दुसरे कोणीही या निशाणीला जाणत नाहीत. तुम्ही समजत आहात की विनाश काले प्रीत बुद्धी आमचीच आहे. बाबांची आम्ही खुप आठवण करतो. बाबांची आठवण करता-करता प्रेमामध्ये अश्रू येतात. बाबा, तुम्ही आम्हाला अर्ध्या कल्पा साठी सर्व दुःखांपासून दूर करत आहात. दुसऱ्या कोणा गुरु किंवा मित्र संबंधी इ. ची आठवण करण्याची गरज नाही. एक बाबांचीच आठवण करा. सकाळची वेळ खूप चांगली आहे. बाबा, तुमची तर खूप कमाल आहे. प्रत्येक 5 हजार वर्षानंतर तुम्ही आम्हाला जागे करता. सर्व मनुष्य कुंभकर्णाच्या आसुरी झोपे मध्ये झोपले आहेत अर्थात अज्ञान अंधारामध्ये आहेत. आता तुम्ही समजत आहात-भारताचा प्राचीन योग तर हा आहे, बाकी जे पण एवढे हटयोग इ. शिकवत आहेत, ते सर्व व्यायाम आहेत शरीराला निरोगी ठेवण्यासाठी. आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे म्हणून तुम्हाला खुशी होते. तुम्ही इथे येता समजता बाबा आम्हाला रिफ्रेश(ताजेतवाने)करत आहेत. काहीजण इथून रिफ्रेश होऊन बाहेर पडतात, तेव्हा तो नशा नष्ट होऊन जातो. क्रमवार तर आहेत ना. बाबा समजावत आहेत-ही पतित दुनिया आहे. बोलावतात ही, हे पतित पावन परंतु स्वतःला पतित थोडीच समजतात, म्हणून पाप धुण्यासाठी जातात. परंतु शरीराला थोडेच पाप लागते. बाबा तर येऊन तुम्हाला पावन बनवतात आणि म्हणतात माझीच आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. हे ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. भारत स्वर्ग होता, आता नर्क आहे. तुम्ही मुले तर आता संगमावर आहात. कोणी विकारांमध्ये जातात तर नापास होतात जसे की नरकामधे जाऊन घसरून पडतात. पाचव्या मजल्यावरून खाली पडतात, नंतर १०० पटीने सजा खावी लागते. तर बाबा समजावत आहेत भारत किती उच्च होता, आता किती नीच आहे. आता तुम्ही किती समजदार बनत आहात. मनुष्य तर किती बेसमज आहेत. बाबा तुम्हाला इथे किती नशा चढवतात, नंतर बाहेर पडल्यावर नशा कमी होतो, खुशी निघून जाते. विद्यार्थी जेव्हा मोठी परीक्षा पास होतो तर नशा कधी कमी होतो का?शिकून पास होतात नंतर काय-काय बनतात. आता पहा दुनियेचे काय हाल आहे?तुम्हाला उच्च ते उच्च पिता येऊन शिकवत आहेत. तोही निराकार आहे. तुम्ही आत्मे सुद्धा निराकार आहात. इथे अभिनय करण्यासाठी आले आहात. हे नाटकाचे रहस्य बाबा येऊन समजावत आहेत. या सृष्टी चक्राला नाटक असेही म्हटले जाते. त्या नाटकामध्ये तर कुणी आजारी पडल्यानंतर निघून जातात. हे आहे बेहद चे नाटक. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये योग्य रीतीने आहे. तुम्ही जाणत आहात आम्ही इथे अभिनय करण्यासाठी आलो आहोत. आम्ही बेहद चे अभिनेता (कलाकार)आहोत. हे शरीर घेऊन अभिनय करत आहोत, बाबा आले आहेत-हे सर्व बुद्धीमध्ये असायला पाहिजे. बेहद चे नाटक किती बुद्धीमध्ये असायला पाहिजे. बेहद विश्वाची बादशाही मिळत आहे तर त्यासाठी पुरुषार्थ ही असा चांगला करायला पाहिजे ना. गृहस्थ व्यवहारामध्ये खुशाल रहा परंतु पवित्र बना. परदेशामध्ये असे खुप असतात, जेव्हा वृद्ध होतात तेव्हा सोबतीसाठी लग्न करतात.... सांभाळण्यासाठी नंतर त्यांना सर्व देऊन टाकतात. काही त्यांना देतात, काही दान करतात. विकाराची गोष्ट नसते. आशिक- माशुक ही विकारासाठी प्रेम करत नाहीत. फक्त शरीराचे प्रेम असते. तुम्ही आत्मिक सजनीआहात एक साजनची आठवण करत आहात. सर्वजण एकाचीच आठवण करतात. तो किती शोभावान आहे. आत्मा गोरी आहे ना. तो सदैव गोरा आहे. तुम्ही तर सावळे बनले आहात, तुम्हाला तो सावळ्या पासून गोरा बनवत आहे. हे तुम्ही जाणत आहात की, बाबा आम्हाला गोरा बनवत आहे. इथे खूप जण असे आहेत, माहित नाही कोणत्या विचारांमध्ये बसलेले असतात. शाळेमध्ये ही असे होते-बसल्या-बसल्या कुठे बुद्धी सिनेमाकडे, मित्रांकडे निघून जाते. सत्संगामध्ये ही असे होते. इथेही असे आहे, बुद्धीमध्ये बसत नाही, त्यामुळे नशा ही चढत नाही, धारणा होत नाही. त्यामुळे इतरांनाही सांगू शकत नाहीत. खूप मुली येतात, ज्यांची कुठेतरी सेवा करावी अशी इच्छा असते परंतु छोटी-छोटी मुले आहेत. बाबा म्हणतात मुलांना सांभाळण्यासाठी एखादी माई ठेवा. आता या मातांना कलश दिला आहे ना. नशा खूप राहायला पाहिजे. पुढे जाऊन असे होईल पुरुष पाहतील की आमच्या स्त्रीने तर संन्याशांच्या वरतीही विजय मिळवला आहे. या माता लौकिक, पारलौकिक चे नाव प्रसिद्ध करून दाखवतील. अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादांची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. तुम्हाला बुद्धी द्वारे सर्व काही विसरायचे आहे. ज्या गोष्टींमुळे वेळ वाया जातो, त्या ऐकण्याची आणि ऐकवण्याची गरज नाही.

2. शिकत असताना बुद्धी योग एक बाबांशी लागून रहावा, कुठेही बुद्धी भटकायला नको निराकार पिता आम्हाला शिकवत आहे, या नशेमध्ये राहायचे आहे.

वरदान:-
बेहदच्या स्थितीमध्ये स्थिर राहून, सेवेच्या लगावा पासून अनासक्त आणि प्रिय, विश्व सेवाधारी भव

विश्व सेवाधारी अर्थात बेहदच्या स्थितीमध्ये स्थिर राहणारे. असे सेवाधारी सेवा करत असतानाही अनासक्त आणि सदैव बाबांचे प्रिय राहतात. सेवेच्या लगावामध्ये येत नाहीत कारण की सेवेचा लगाव सुद्धा सोन्याची साखळी आहे. हे बंधन बेहद मधून हद मध्ये घेऊन येते म्हणून देहाच्या स्मृती पासून, ईश्वरीय संबंधापासून, सेवेच्या साधनांच्या लगावापासून अनासक्त आणि बाबांचे प्रिय बना तर विश्व सेवाधारी चे वरदान प्राप्त होईल आणि सदैव सफलता मिळत राहील.

बोधवाक्य:-
व्यर्थ संकल्पांना एका सेकंदामध्ये थांबवण्याचा अभ्यास करा, तर शक्तिशाली बनाल.