05-11-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना शांती आणि सुखाचा वारसा देण्यासाठी, तुमचा
स्वधर्म शांत आहे म्हणून तुम्ही शांतीसाठी भटकत नाहीत"
प्रश्न:-
आता तुम्ही
मुलं २१ जन्मासाठी अखुट खजान्या मध्ये वजन करण्याच्या योग्य बनतात, का?
उत्तर:-
कारण बाबा जेव्हा नवीन सृष्टीची स्थापना करतात, तेव्हा तुम्ही मुलं त्यांचे मदतगार
बनतात. आपले सर्व काही त्यांच्या कार्यामध्ये सफल करतात, म्हणून बाबा त्याच्या
मोबदल्यात २१ जन्मासाठी तुम्हाला अखुट खजान्या मध्ये असे वजन करतात, जे कधीच धनाची
कमी पडत नाही, दुःख पण नसते, अचानक मृत्यू कधी होत नाही.
गीत:-
मुझको सहारा
देने वाले तेरा शुक्रिया. .
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांना ओम चा अर्थ तर ऐकवला आहे. काही जण फक्त ओम म्हणतात, परंतु
ओम शांती म्हणायला पाहिजे. फक्त ओमचा अर्थ निघतो ओम भगवान. ओम शांती चा अर्थ मी
शांत स्वरूप आत्मा आहे. आम्ही आत्मा आहोत आणि माझे हे शरीर आहे. प्रथम आत्मा आहे
नंतर शरीर आहे. आत्मा शांत स्वरूप असून त्याचे निवासस्थान शांतीधाम आहे. बाकी कोणी
जंगलामध्ये गेल्यामुळे खरी शांती मिळत नाही. खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा घरी
जातात. दुसरे शांतीची इच्छा करतात, जेव्हा अशांती असते. हे अशांतीच्या दुखधामचा
विनाश होऊन परत शांती होईल. तुम्हा मुलांना शांतीचा वारसा मिळेल. येथे घरांमध्ये,
बाहेर, राजधानीमध्ये अशांती आहे. स्वर्गामध्ये न घरामध्ये, न बाहेर, न राजधानी मध्ये
अशांती असते. त्याला म्हटले जाते शांतीचे राज्य. येथे अशांतीचे राज्य आहे, कारण
रावणाचे राज्य आहे. ईश्वराने स्थापन केलेले राज्य आहे, परत द्वापरनंतर आसुरी राज्य
होते. आसुरांना कधी शांती मिळत नाही. घरामध्ये, दुकानांमध्ये, जिथे-तिथे अशांतीच
अशांती आहे. पाच विकार रुपी रावण अशांती पसरवतात. रावण काय गोष्ट आहे, हे कोणीही
विद्वान पंडित इत्यादी जाणत नाहीत. ते समजत नाहीत की आम्ही वर्ष-वर्ष रावणाला का
जळतो? सतयुग-त्रेता मध्ये, हा रावण नसतो. ते दैवी राज्य आहे. ईश्वर बाबा, दैवी
राज्याची स्थापना तुमच्या द्वारे करतात. एकटे तर करत नाही ना. तुम्ही गोड गोड मुलं
ईश्वराचे मदतगार आहात. अगोदर रावणाचे मदतगार होते. आत्ता ईश्र्वर येऊन सर्वांची
सद्गती करत आहेत. पवित्रता सुख शांती ची स्थापना करत आहेत. तुम्हा मुलांना आत्ता
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. सतयुगामध्ये दुःखाची गोष्टच नसते. कोणी निंदा
इत्यादी करत नाहीत. खराब गोष्टी, खराब भोजन करत नाहीत. येथे तर काही पण खात राहतात.
असे दाखवतात कृष्णाला गायी खूप प्रिय होत्या. असे नाही कृष्ण कोणी गुराखी होते, गाई
राखत होते, नाही. स्वर्गा मधील गाई आणि येथील गाई मध्ये खूप फरक आहे. स्वर्गा मधील
गाई सतोप्रधान खूप सुंदर असतात. जसे सुंदर देवता असतात, तशाच गाई पण असतात, गाईंना
पाहिल्यानंतरच मन प्रसन्न होते. तो तर स्वर्गच आहे, हा तर नर्क आहे. सर्व स्वर्गाची
आठवण करतात. स्वर्ग आणि नर्कामध्ये, रात्रं- दिवसाचा फरक आहे. रात्र म्हणजे अज्ञान
रात्र, तर दिवस म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. ब्रह्माचा दिवस म्हणजे ब्रह्मावंशीचा पण
दिवस होतो. प्रथम तुम्ही घोर अंधकारा मध्ये, रात्रीमध्ये होते. यावेळेस भक्तीचा खूप
जोर आहे. महात्मा इत्यादींना पण सोन्यामध्ये वजन करत राहतात, कारण ग्रंथाचे खूप
विद्वान आहेत. त्यांचा प्रभाव इतका का आहे, हे पण बाबांनी समजले आहे. झाडांमध्ये
नवीन नवीन पाने निघतात. , तर ते सतोप्रधान असतात. परधाम वरून नवीन आत्मे येथे येतात,
तर जरूर त्यांचा प्रभाव अल्पकाळासाठी राहतो ना. सोन्यामध्ये किंवा हिऱ्यांमध्ये वजन
करतात परंतु हे तर सर्व नष्ट होणार आहे. मनुष्यां जवळ लाखांची घरं आहेत, तर ते
समजतात, आम्ही तर खूप सावकार आहोत. तुम्ही मुलं जाणता, ही सावकारी बाकी थोड्या
वेळांसाठी आहे. हे सर्व मातीमध्ये मिसळून जाईल. कोणाची माती मध्ये मिसळून जाईल,
कुणाचे चोर लुटतील, कोणाचे राजा खातील, कोणाचे अग्नी जाळून टाकेल. बाबा स्वर्गाची
स्थापना करतात, त्यामध्ये जे यज्ञामध्ये सफल करतात, त्यांना २१ जन्मासाठी हिरे
जवाहरातांचे महल मिळतात. येथे तर एका जन्मासाठी मिळते. तेथे तर तुमचे २१ जन्म चालेल.
या डोळ्याद्वारे जे पाहता, ते सर्व नष्ट होणार आहे. तुम्हा मुलांना दिव्यदृष्टी
द्वारे साक्षात्कार पण होतो. विनाश होईल परत या लक्ष्मी नारायणचे राज्य असेल. तुम्ही
जाणता आम्ही आपले राज्यभाग्य परत स्थापन करत आहोत. २१ पिढी राज्य केले, परत रावणाचे
राज्य चालते. आता परत बाबा आले आहेत. भक्तिमार्गा मध्ये, सर्व बाबांची च आठवण करतात.
गायन पण आहे दुःखामध्ये स्मरण सर्व करतात. बाबा सुखाचा वारसा देतात, परत आठवण
करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मात पिता. . आत्ता हे तर आपल्या मुलांचे मातापिता
असतील. ही तर पारलौकिक पित्याची गोष्ट आहे. आता तुम्ही लक्ष्मीनारायण बनण्यासाठी
शिकत आहात. शाळेमध्ये मुलं चांगल्या मार्काने पास होतात, तर शिक्षकाला बक्षीस देतात.
आता तुम्ही त्यांना काय बक्षीस देणार. जादुगरी द्वारे, तुम्ही तर त्यांना आपला मुलगा
बनवतात. असे दाखवतात, कृष्णाच्या मुखामध्ये माताने लोण्याचा गोळा पाहिला. आता
कृष्णाने जन्म तर सतयुगामध्ये घेतला होता. ते तर लोणी इत्यादी खाणार नाहीत. ते तर
विश्वाचे मालक आहेत. तर ही कधीची गोष्ट आहे, ही आत्ता संगम युगाची गोष्ट आहे. तुम्ही
जाणतात आम्ही हे शरीर सोडून लहान मुलगा बनू, विश्वाचे मालक बनू. दोन्ही ख्रिश्चन
आपसामध्ये लढतात आणि लोणी तुम्हा मुलांना मिळते. राजाई मिळते ना. जसे ते लोक भारताला
आपसात लढवून, लोणी स्वतः खातात खातात. ख्रिश्चनांची राजाई तर ७५ टक्के भूभागावर
म्हणजे या दुनियेत होती, नंतर हळूहळू कमी होत गेली. संपूर्ण विश्वावर तुमच्या शिवाय
कोणी राज्य करू शकत नाही. तुम्ही आता ईश्वरीय संतान बनले आहात. तुम्ही ब्रह्मांड आणि
विश्वाचे मालक बनतात. विश्वामध्ये ब्रह्मांड येत नाही. सूक्ष्मवतन मध्ये राजाई नसते.
येथेच म्हणजेच स्थुल वतन मध्ये राजाई असते. ध्यानामध्ये आत्मा कुठे जात नाही. आत्मा
निघून जाईल तर शरीरच नष्ट होऊन जाईल. हे सर्व साक्षात्कार रिद्धी-सिद्धी द्वारे होत
राहतात. असे पण साक्षात्कार होतात, जेथे बसून परदेशा मधील लोकसभा पाहू शकतात.
बाबांच्या हातामध्ये दिव्यदृष्टीची चावी आहे. तुम्ही इथे बसून लंडन पाहू शकतात.
कोणतेही साधन इत्यादी काहीच खरेदी करावे लागत नाही. वैश्विक नाटकानुसार हे सर्व
साक्षात्कार होत राहतात, नाटकांमध्ये अगोदरच नोंदलेले आहे. जसे दाखवतात भगवंतांनी
अर्जुनाला साक्षात्कार केला. वैश्विक नाटका नुसार त्यांना साक्षात्कार होणार होता,
ही पण नाटकांमध्ये नोंद आहे. त्याच्यात काहीही मोठेपणा नाही. हे सर्व वैश्विक नाटका
नुसारच होत आहे. कृष्ण विश्वाचे राजकुमार बनतात, म्हणजेच लोणी मिळते. हे पण कोणी
जाणत नाही कि, विश्व कशाला आणि ब्रह्मांड कशाला म्हटले जाते. ब्रह्मांडामध्ये तुम्ही
आत्मे निवास करतात. सूक्ष्मवतन मध्ये येणे-जाणे साक्षात्कार इत्यादि या वेळेतच होत
राहतात. परत पाच हजारवर्ष सूक्ष्मवतनचे नाव राहत नाही. असे म्हटले जाते ब्रह्मा
देवताय नमः परत शिव परमात्माए नमः: म्हणतात. तर सर्वात उच्च झाले ना, त्यांना भगवान
म्हटले जाते. ते देवता पण मनुष्य आहेत परंतु दैवी गुण असणारे आहेत. बाकी चार भुजा
असणारे मनुष्य नसतात. स्वर्गात पण दोन भुजा असणारेच मनुष्य असतात, परंतु ते संपूर्ण
पवित्र असतात. अपवित्रतेची गोष्टच नाही, अचानक मृत्यू कधी होत नाही. तर तुम्हा
मुलांना खूप आनंद राहायला पाहिजे. आम्ही आत्मा या शरीरा द्वारे बाबांना तर पाहू. तसे
तर दिसण्या मध्ये शरीर येते. परमात्मा किंवा आत्मा दिसून येत नाही, त्यांना तर
जाणायचे असते. दिसण्यासाठी परत दिव्यदृष्टी मिळते. बाकी सर्व गोष्टी दिव्यदृष्टी
द्वारे मोठ्या दिसून येतात. राजधानी पण मोठी दिसून येते. आत्मा तर बिंदू आहेना,
बिंदू पाहिल्यामुळे तुम्ही काहीच समजू शकणार नाहीत. आत्मा तर खूप सुक्ष्म आहे, अनेक
डॉक्टर्सनी आत्म्याला पाहण्यासाठी किंवा पकडण्यासाठी प्रयत्न केले. कोणालाही माहिती
होत नाही. ते लोक तर सोन्या हिऱ्यामध्ये वजन करतात. तुम्ही तर जन्म जन्मानंतर पदमपती
बनतात. तुमचा बाहेरचा दिखावा जरा पण नाही. साधारण प्रकारे, या रथामध्ये विराजमान
होऊन शिकवत आहेत, त्यांचे नाव भागीरथ आहे. हे पतित जुना रथ आहे, ज्यामध्ये बाबा
येऊन उच्च ते उच्च सेवा करत आहेत. बाबा म्हणतात मला तर, स्वत:चे शरीर नाही. मी जो
ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर इत्यादी आहे, तर तुम्हाला वारसा कसा देऊ. परमधाम वरून
तर देणार नाही ना? काय प्रेरणा द्वारे शिकवण्यासाठी येऊ. जरूर यावे तर लागेल ना.
भक्तिमार्गा मध्ये माझी पूजा करतात, सर्वांना प्रिय वाटतो ना. गांधी-नेहरूंचे चित्र
पण प्रिय वाटतात. त्यांच्या शरीराची आठवण करतात. आत्मा जो अविनाशी आहे, त्यांनी तर
जाऊन दुसरा जन्म घेतला. बाकी विनाशी चित्राची सर्व आठवण करतात. तर भूत पूजा झाली
ना. समाधी बनवून त्याच्यावरती फुले इत्यादी अर्पण करतात. हे स्मृतिस्थळ आहे. शिवाची
तर अनेक मंदिरं आहेत. सर्वात मोठे सोमनाथच्या मंदिराचे गायन आहे. मोहम्मद गजनवीने
येऊन अनेक वेळेस लुटले. तुमच्याजवळ खूप धन होते. बाबा तुम्हा मुलांना हिऱ्यामध्ये
वजन करतात. स्वतःचे वजन करवत नाहीत. मी इतका धनवान बनत नाही. तुम्हालाच धनवान बनवतो.
त्यांचे तर आज वजन केले, उद्या मरुन जातील. धन काहीच कामात येणार नाही. तुम्हाला तर
बाबा अखूट खजान्यामध्ये अशाप्रकारे वजन करतात, जे २१ जन्म सोबत राहिल. जर श्रीमता
वर चालतील तर. स्वर्गामध्ये दुःखाचे नाव नसते, कधी अचानक मृत्यू होत नाही. मृत्युला
कोणी घाबरत नाहीत. येथे तर मनुष्य मृत्यूला खूप घाबरतात, रडतात. स्वर्गामध्ये तर
आनंद होतो. हे शरीर सोडून आम्ही राजकुमार बनू. जादूगर, सौदागर, रत्नाकर परमात्म्याला
म्हटले जाते. तुम्हालापण साक्षात्कार करवतात, असे राजकुमार बनू. बाबांनी आत्ता
साक्षात्कारची भूमिका बंद केली आहे, त्यामुळे नुकसान होते. आता बाबा ज्ञानाद्वारे
तुमची सद्गती करतात. तुम्ही प्रथम सुखधाम मध्ये जाल, आता तर दुखधाम आहे. तुम्ही
जाणतात, आत्माच ज्ञान धारण करते म्हणून बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा.
आत्म्यामध्येच चांगले किंवा वाईट संस्कार असतात. जर संस्कार शरीरामध्ये असते, तर
शरीरा सोबतच नष्ट झाले असते. तुम्ही म्हणतात, शिवबाबा आम्ही या शरीरा द्वारे शिकत
आहोत. ही तर नवीन गोष्ट आहे ना. आम्हा आत्म्याला शिवबाबा शिकवतात. हे तर चांगल्या
प्रकारे आठवणीत ठेवा. आम्हा सर्व आत्म्यांचे पिता आहेत, शिक्षक पण आहेत. बाबा
म्हणतात मला स्वतःचे शरीर नाही. मी पण आत्मा आहे, परंतु मला परमात्मा म्हणतात.
आत्माच सर्वकाही करते, बाकी शरीराचे नाव तर बदलत राहते. आत्मा तर आत्माच आहे. मी
परमात्मा तुमच्यासारखा पुनर्जन्म घेत नाही. माझी वैश्विक नाटकांमध्ये अशीच भूमिका
आहे, जे मी यांच्या मध्ये प्रवेश करून तुम्हाला ज्ञान ऐकवतो, म्हणून ब्रह्माला
भाग्यशाली रथ म्हटले जाते. यांना जुनी चप्पल पण म्हटले जाते. शिवबाबांनी जुना मोठा
बूट घेतला आहे ना. बाबा म्हणतात मी यांच्या अनेक जन्माच्या अंतकाळात प्रवेश केला आहे.
प्रथम हे नारायण बनतात, परत तुम्ही पण तसेच बनतात. बाबा म्हणतात तुम्ही तर जवान
आहात. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शिकून उच्चपद द्यायला पाहिजे परंतु माझ्यासोबत बाबा
आहेत, तर मला त्यांची सारखी आठवण येते. बाबा माझा शृंगार करू शकत नाहीत, परंतू
तुम्हाला सुंदर बनवतात, तुम्ही भाग्यशाली आहात ना. शिव बाबांनी जे हे शरीर घेतले आहे,
तुम्ही त्याला सुंदर बनवू शकतात. मी कसा श्रृंगार करु. माझ्या तर नशिबात हे नाही,
तुम्हा भाग्यशाली ताऱ्यांचे गायन आहे. मुलं नेहमी भाग्यशाली असतात, पिता मुलांना
पैसे देतात, तर तुम्ही भाग्यशाली तारे झाले ना. शिव बाबा पण म्हणतात तुम्ही
माझ्यापेक्षा भाग्यशाली आहात, तुम्हाला शिकवून विश्वाचे मालक बनवतो. मी थोडेच
विश्वाचे मालक बनतो. तुम्ही ब्रह्मांडचे पण मालक बनता. बाकी माझ्या जवळ
दिव्यदृष्टीची चावी आहे. मी ज्ञानाचा सागर आहे, तुम्हाला पण मास्टर ज्ञानाचा सागर
बनवतो. तुम्ही या चक्राला जाणून, चक्रवर्ती महाराजा महाराणी बनतात, मी थोडेच बनतो.
पिता वृधद झाल्यानंतर मुलांना सर्व काही देऊन स्वतः वानप्रस्थ मध्ये जातात. अगोदर
असे होत होते. आज काल तर मुलांमध्ये खूप मोह आहे. पारलौकिक पिता म्हणतात मी
यांच्यामध्ये प्रवेश करून, तुम्हा मुलांना, काट्या पासून फुल बनवून विश्वाचे मालक
बनवतो, अर्ध्या कल्पासाठी नेहमी सुखी बनवून मी वानप्रस्थ मध्ये बसतो. या सर्व गोष्टी
ग्रंथांमध्ये थोड्याच आहेत. संन्यासी उदासी ग्रंथाच्या गोष्टी ऐकवत राहतात. बाबा
ज्ञानाचे सागर आहेत ना, ते स्वतः म्हणतात हे वेद ग्रंथ इत्यादी सर्व भक्तीमार्गाची
सामग्री आहे. ज्ञान सागर तर मीच आहे ना, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) या
डोळ्याद्वारे, शरीरा सहीत जे काही दिसते, हे सर्व नष्ट होणार आहे, म्हणून आपले सर्व
काही सफल करायचे आहे.
(२) बाबा पासून पूर्ण वारसा घेण्यासाठी हे ज्ञान घ्यायचे आहे. नेहमी आपल्या भाग्याला
स्मृतीमध्ये ठेवून, ब्रह्मांड आणि विश्वाचे मालक बनायचे आहे.
वरदान:-
मायेच्या
फसव्या रूपाच्या बंधनापासून मुक्त, विश्वजीत, जगतजीत भव.
माझा पुरुषार्थ, माझे
संशोधन, माझी सेवा, माझे गुण चांगले आहेत, माझी निर्णय शक्ती खूप चांगली आहे, हा
माझे पणाच, मायेचे फसवे रूप आहे. माया असा जादू मंत्र करते, जे तुझ्या ला पण
माझ्यामध्ये बनवते, म्हणून आत्ता अशा अनेक बंधनापासून मुक्त बनून, एक बाबाच्या
संबंधांमध्ये या, तर मायाजीत बनाल. मायाजीतच प्रकृतीजीत, विश्वजीत, जगतजीत बनतात.
तेच एका सेकंदाच्या अशरीरी भवच्या सुचनेला, सहज आणि स्वत: कार्यामध्ये लावू शकतात.
बोधवाक्य:-
विश्व
परिवर्तक तेच आहेत, जे कोणाच्याही नकारात्मकतेला, सकारात्मकते मध्ये बदलू शकतात.